Friday, September 2, 2011

पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips)

पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips)

संदर्भ:

http://www.esakal.com/esakal/20110415/5193351932521427606.htm
http://www.youtube.com/watch?v=mDtN-4Bqbl0
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7995952.cms

१. पाणीपुरी हि विक्रेतीकडची असली पाहिजे. (विक्रेत्याकडची नको.)
२. पाणीपुरी विक्रेती मराठी असेल तर जास्त काळजी करण्याचे कारण नाही.
२. आधीचे गिर्‍हाईक तेथेच असले पाहीजे व त्याची पाणीपुरी (व तत्सम पदार्थ - {यापुढे फक्त पाणीपुरी असा उल्लेख राहील.}) खाल्लेली असली पाहीजे व फक्त पाणी पिणे बाकी असले पाहिजे. त्याने पाणी पिल्यानंतर सर्व काही ठिकठाक वाटल्यासच आपण ऑर्डर द्यावी.
३. जेथे जास्त गर्दी असते तेथेच जावे जेणेकरून जे काही दुष्परीणाम होईल ते जास्त प्रमाणातल्या लोकांत विभागून झाल्याने त्याची त्रीव्रता कमी होवू शकते.
४. पाणीपुरी खाण्यास जाण्याचेवेळी जमल्यास PH पेपर घेवून जावा जेणेकरून तेथील पाण्याची PH व्हॅल्यू पहाता येईल. "०" (शुन्य) PH युक्त पाणी असलेल्या पाणीपुरीला प्राधान्य द्यावे. (इतर व्हॅल्यू आल्याच तर आपापल्या मनाचा निर्णय घ्यावा.)
५. आपल्या घरचे पाणी व भांडे घेवून जावे.
६. सर्वात धोकेदायक नसलेला प्रकार म्हणजे घरच्या घरीच पाणीपुरी बनवाव्यात. आपण घरीच पाणीपुरी बनवली तर शेजार्‍यांनाही निमंत्रीत करावे म्हणजे 'शेजार्‍यांवर प्रेम करणे' हि उक्ती साध्य होईल.
७. तसेही पाणीपुरी, भेळपुरी, पॅटीस, शेवपुरी आदी पदार्थ परराज्यातील आहे. तसेच तेथील विक्रेत्यांची मानसीक स्थिती आपल्याला माहीत नसू शकते. तेथील (परराज्यातील) राहणीमान, वागणूक, परस्पर सामंजस्य, समाजाप्रती असलेले विचार व आपल्या राज्यातील परिस्थीती यात प्रचंड तफावत आहे. असले विक्रेते आर्थिक द्रुष्ट्या (व मानसिकही) मागासलेले असतात. (जगातल्या प्रत्येक परिस्थितीला अपवाद असतोच असतो.) त्यामुळे ते असले पदार्थ, (खाण्याव्यतिरीक्त इतर वस्तू सुद्धा) कमी प्रतीच्या वापरतात. त्यामुळे असले परराज्यीय पदार्थ शक्यतो न खाल्लेलेच बरे. (येथे प्रांतवाद हा प्रत्यय लावू नये.)
त्याचप्रमाणे (पोटाची) गरज असल्यास आपल्या महाराष्ट्रातील नाष्ट्याचे पदार्थ खावेत.

जाता जाता एक सांगावे वाटते:
हॉटेल मध्ये व हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्स मध्येही पंजाबी, साउथ ईंडीयन, नॉर्थ ईंडीयन, जैन- गुजराथी आदी पदार्थ अनुक्रमे मिळतात व शिकविले जातात.
महाराष्ट्राचे खाद्यपदार्थ असलेल्या 'महाराष्ट्रीय डीश' केव्हा (सगळ्याच) हॉटेलात मिळतील व हे आपले पदार्थ हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात अखिल भारतीय पातळीवर केव्हा शिकवीले जातील?

राज ठाकरेंना याविषयी आंदोलन करता येण्यासारखे आहे.

आपले काय मत आहे?

No comments: