Showing posts with label बातमी. Show all posts
Showing posts with label बातमी. Show all posts

Monday, June 01, 2026

पाभे की बात क्र. १०

पाभे की बात क्र. १०  

माझ्या प्रिय मित्रांनो, नमस्कार!

पाभे की बात मधून तुम्हा सर्वांना भेटून मला खूप आनंद होतो आहे. जगातल्या सगळ्या भागातून रिल्सच्या माध्यमांतून आपल्या देशाचे नागरीक त्यांचे कलागुण दाखवत आहेत आणि ते पाहून आपल्यालाही प्रेरणा मिळत आहे. 

मितरों,

आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे. यावेळी आपल्या देशातल्या काहीच ठिकाणी उन्हाळा जाणवत आहे. उन्हाळ्यात बिअर सारखे पेय नाही. बिअर वेगवेगळ्या प्रकारात मिळते. 

मितरों, बिअर फक्त प्यायची नसते... बिअर अनुभवायची असते!

का म्हणून?

 कारण बिअर प्यायला गेल्यावर माणूस शांत होतो. शांत माणूस रागवत नाही. राग नसला की भांडण होत नाही. भांडण नसला की घरात शांती. घरात शांती असली की देशात शांती!

पेट्रोल वाचवा म्हणून मागेच सांगितलं, सोनं विकत घेऊ नका म्हणून सांगितलं... पण बिअरबद्दल काहीच बोलल्या गेलं नाही. बिअर ही राष्ट्रीय शांती अभियान आहे!

एक बिअर प्यायला गेल्यावर:

  • तणाव कमी होतो
  • भूक वाढते (म्हणजे स्वदेशी खाद्यपदार्थ खाल्ले जातात)
  • मित्र वाढतात
  • आणि सर्वात महत्वाचं — राजकारण विसरलं जातं!

मितरों, म्हणूनच मी म्हणतो — बिअर = शांती जास्त बिअर = जास्त शांती

फक्त एक सावधगिरी — दोन बिअरनंतर “विकसित विकास” दिसू लागतो, पण तीननंतर “विकसित” शब्दही विसरून जाता!

मितरों,

परीक्षेचे पेपर वितरीत करण्यासाठी आपण आता एअर फोर्स चा वापर करणार आहोत. यामुळे वेगवान पद्धतीने पेपर दिल्या जातील. इंटरनेटच्या युगात असा प्रयोग इतर देशांनी केलेला आढळत नाही. पुढे पुढे या अनुभवाचा उपयोग आपले दररोजचे वर्तमानपत्रे, पोस्ट ऑफीसातली पत्र इत्यादी देखील आपण एअर फोर्स कडून वितरीत करून घेणार आहोत. एअर फोर्स ला आपण कुरीअर पोहचवण्यासही सांगणार आहोत. यामुळे रिकामे असलेले सैन्या कामाला येईल. असेही एअर फोर्स रिकामे विमान उडवत असतात त्यामुळे इंधन नष्ट होते. या कुरीअर सर्वीस मुळे वाया जाणाऱ्या इंधनाचा उपयोग होणार आहे. 

मितरों,

गेल्या आठवड्यात National Testing Agony (NTA) यांचेकडून घेतल्या गेलेल्या एनसीईआरटी परीक्षेत सर्वर्स डाऊन झाले होते. त्यामुळे काही विद्यार्थीं नाराज झाले. पण काळजी करू नका. आता आपण ऑनलाईन परीक्षा बंद करणार आहोत. सर्व विद्यार्थी पेन आणि कागद वापरून परीक्षा देतील. कॉम्पूटरमुळे खर्च वाढत असल्याने हा कागदांचा पर्याय आपण स्विकारलेला आहे. निवडणूका मात्र बॅलेटपेपर, कागदांवर न होता ईव्हीएम मशीन वापरूनच होतील. कारण यंत्र कधीच चुकत नाही. 

मितरों,

ज्ञान वाटप अभियानांतर्गत, छप्पनगढ (गुजरात) मध्ये सुमारे ११०० ते १२०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ सुवर्णपट सापडले आहेत. आपला देश किती प्रगत आणि महान होता ते यातून दिसून येते. हे सुवर्णपट आपण फादरलॅंड या देशाला सप्रेम भेट देणार आहोत.

पुढील पाभे की बात मध्ये आणखी काही प्रेरक गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येईल.

खूप-खूप धन्यवाद. नमस्कार.

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात
 

 

Saturday, May 23, 2026

पाभे की बात नं ८

पाभे की बात नं ८

मितरों,  

आता इथेनॉलचा नवा जोर चाललाय! सरकार म्हणतंय – पेट्रोलात इथेनॉल मिक्स करा, जास्त करा, E30 पर्यंत करा, शेवटी E100 करा! म्हणजे १००% इथेनॉल. गडकरी साहेब म्हणतात, “पेट्रोल सोडा, इथेनॉल प्या... अरे म्हणजे गाडीत घाला!”  

मिटरों, मी तर लगेच माझ्या गाडीत E100 भरलं. आता गाडी चालते आहे, पण सुंगध येतोय ती देशी दारूची! शेजारचा पोलिस म्हणाला, “साहेब, हा ब्रेथ ॲनालायझर कशाला घेतलाय आम्ही? त्याचेशिवायही वास येतोय.”  

आता प्लॅन असा आहे –  
- पेट्रोल महाग? इथेनॉल घाला.  
- मायलेज कमी? म्हणजे कमी फिरा, पर्यावरण वाचवा.
- गाडी बिघडते आहे? गॅरेजमध्ये न्या. 
- गाडी बंद पडली? शेतकऱ्यांना धन्यवाद द्या, त्यांचा उसाचा रस चालवताय!  

मितरों, लवकरच गाड्या धान्यावर चालतील. फक्त एक सल्ला – E100 भरताना गाडीला “नॉन-व्हेज” स्टिकर लावा!

आणि हो, एक सांगायचे राहीले. इथेनॉल मिक्स करण्याचा धसका इराण, सौदी, रशीया, अमेरीका इत्यादी तेल पुरवठादार देशांनी घेतला आहे. आता त्यांचे हक्काचे गिर्हाईक गेले समजा. 

हा एक मास्टरस्ट्रोक आहे.  

भेपुपाकीबा त.  

#पाभे_की_बात

Saturday, October 16, 2010

बेळगावी मराठी बांधवांवर हल्ला: सीमावासीयांनो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे

काल दि. १२ जुलै २०१० रोजी बेळगाव शहरात सीमावासीयांनी मराठीचा झेंडा फडकावत बेळगावात उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चावर कर्नाटक सरकारने अमानुष लाठीमार केला. शांततेने चालणार्‍या मोर्चावर अचानक लाठीमार करून सीमावासीयांच्या भावना कर्नाटकी सरकारने पायदळी तुडवल्या. म्हातार्‍या कोतार्‍या माणसांनाही पोलीसांनी सोडले नाही. केंद्रसरकारला अजून किती वेळा लाठीमार व सीमावासीयांचे बळी हवेत? न्याय्य मागण्यांना न्याय मिळेल की नाही? सीमाबांधवांनो, तुम्ही एकटे समजू नका. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे.

http://www.saamana.com/2010/July/13/Link/Main1.htm
http://72.78.249.124/esakal/20100712/4667969515589123216.htm
http://epaper.pudhari.com/epapermain.aspx
http://epaper.prahaar.in/
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6161109.cms
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=853...
http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/MainEditio...

Wednesday, March 31, 2010

दै. सामना चे नाव कान्तिपूर झाले?

दै. सामना चे नाव कान्तिपूर झाले?

आजचा दै. सामना ची ऑनलाईन आवृत्ती बघीतली असता खालील प्रमाणे दिसली.

saamana ya kaantipur?
सामना या कान्तिपूर??
(वरील फोटोत कोणत्याही इमेज प्रोसेसींग सॉफ्टवेअरची मदत घेतलेली नाही. तुम्ही दै. सामनाच्या ई ईडिशनवर बघू शकतात.) वेळ सकाळची ९:०० वाजता.

कान्तिपूर हे नेपाळ मधले वृत्तपत्र आहे.
हे सामनाचे असे दिसणे म्हणजे दै. सामना एका अर्थाने खरेखूरे "हिंदू आदमीका खुदका वार्तापत्र" आहे हे साबीत झाले.

तुम्ही ऑनलाईन आवृत्ती बघेपर्यंत कदाचीत या संकेतस्थळाची व्यवस्था पहाणारे तुमच्या माझ्यासारखे व्यवसायबंधू झोपेतून जागे झाले असावे अन तुम्हाला नेहमीचा सामना दिसायला लागलेला असावा.

Saturday, February 27, 2010

डोक्याला ताप नाही

डोक्याला ताप नाही
आपण पैसे देवून वर्तमानपत्र खरेदी करतो ते काही आपल्याला मानसीक त्रास व्हावा म्हणून नाही. अगदी महत्वाच्या बातम्या देवून कोणाचे भले झाले आहे? सकाळमध्ये असल्या बातम्या वरचेवर यायला लागल्या आहे. वाचा : नितीशकुमारही बनले मांसाहारी. मागेही त्याने (सकाळने) 'लालू मांसाहारी बनले', राहूल गांधीने ईडली सांबर खाल्ले असल्या (बीपी न वाढवणार्‍या बातम्या) दिल्या होतात. आपल्या आरोग्याची काळजी करणारे आता फार वृतपत्रे (सकाळच नाही तर इतरही. सकाळ हे प्रातिनीघीक नाव येथे आले.) निर्माण होत आहेत ही चांगली बातमी आहे, नाही?

सकाळसारख्या वृतपत्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अवांतर: बिहार मधल्या वृतपत्रांत महाराष्ट्राच्या पुढारी फाडार्‍यांविषयी असल्या पांचट बातम्या येत असतील काय?

नव्या विधानसभेच्या अधिवेशनातील दुसरा दिवस

नव्या विधानसभेच्या अधिवेशनातील दुसरा दिवस कसा साजरा झाला?

नव्या विधानसभेच्या अधिवेशनातील पहिल्याच दिवशी अबू मुळे जे रामायण घडले त्या रामायणाचे मुळ 'शपथ हिंदी भाषेत घेणे' हे होते. असे असतांना विधानसभेच्या अधिवेशनातील दुसर्‍या दिवशी कोणकोणत्या आमदारांनी मराठी सोडून (हिंदीत) शपथ घेतली हे कळाले तर कोणकोणते आमदार मराठीद्वेशी आहेत ते समजेल. त्यातल्या त्यात कलिना (मुंबई) तून विजयी झालेले कृपाशंकरसिंह यांनी कोणत्या भाषेत शपथ घेतली?

अबू आजमी ची मनसेच्या आमदारांना धक्काबुक्की; मनसेचे बाणेदार प्रत्यूत्तर

अबू आजमी ची मनसेच्या आमदारांना धक्काबुक्की; मनसेचे बाणेदार प्रत्यूत्तर

आंतरजाल प्रतिनिघी: (ता. ०९ डिसेंबर २००९) आज महाराष्ट्र विधानसभेत नवनिर्वाचीत आमदारांचा शपथविधी चालू होता. अबू आजमी शपथ घेण्यासाठी व्यासपिठावर चढला. त्याने मनसेच्या आमदारांकडे वाकड्यानजरेने पाहत शपथ घेणे चालू केल्यानंतर मनसेचे आमदार शिषीर शिंदे यांनी त्यास मराठीतच शपथ घेण्याचे आवाहन करणारे पत्रक दर्शविले असतांना त्याने त्या पत्रकाकडे पाहत हातवारे दाखवले. संतापाच्या भरात खडकवासल्याचे आमदार वांजळे यांनी शपथ ही मराठीतच घेण्याचे आवाहन करण्यासाठी व्यासपिठाकडे गेले असता अबू समर्थक आमदारांनी त्यांना शिवीगाळ केली. त्याचा राग येवून आमदार वांजळे यांनी अबू समोरचा माईकच उखडून टाकला. झाल्या प्रकाराने संतापून अबू ने आमदार शिषीर शिंदेंना धक्काबूक्की केली. त्यानंतर मनसेच्या आमदारांनी अबूला गराडा घालून याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी अबू आजमीची मनसेच्या आमदारांच्या गराड्यातून सुटका केली.

विधानसभेत नवनिर्वाचीत आमदारांचा शपथविधी होण्याआधी सर्व आमदारांना मनसेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरेंनी राज्यभाषा 'मराठीतून'च शपथ घेण्याचे आवाहन करणारे पत्र लिहीले होते. त्यावर अबू ने 'मी राष्ट्रभाषा' हिंदीतच शपथ घेईल' असे वक्तव्य केले होते. भारतीय घटनेतही भारताची 'राष्ट्रभाषा' हिंदी आहे असा कोठेही उल्लेख नाही हे उल्लेखनीय.

झाल्या प्रकारानंतर काही पत्रकारांनी अबूला मराठीत प्रश्न विचारले असता त्याने त्यांना उत्तरे दिलीत. म्हणजेच त्यास मराठी समजते. हिंदी व मराठी भाषेची लिपी देवनागरीच आहे. असे असतांना तो शपथ मराठीत वाचू शकत होता.

Tuesday, August 25, 2009

महाभयंकर सत्य

पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/8401

सगळ्या जगाचा प्राण आहे असे वाटणारे ईंधन आता लवकरच संपणार. लवकरच म्हणजे किती ? अहो आपण किंवा आपली मुलं किंवा अगदी फार फार तर आपली नातवंडं जग बघू शकतील. हे काही तथाकथीत भविष्य नव्हे तर ते एक सप्रमाण सिद्ध केले जाणारे भाकीत आहे. ते लोकप्रभात मांडलय मिलिंद जोशींनी. सगळ्यांना माहीत व्हावे हा या दोन ओळींच्या माहितीचा हेतू.

Wednesday, April 15, 2009

पुणे युनिर्व्हसिटी - अजब कारभार -सत्यघटना

(पुणे युनिर्व्हसिटीच्या अजब कारभाराची खालील घटना माझ्या सोबत घडलेली सत्यघटना. वाचा.)

माझ्या एका नातेवाईकाने पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी पुणे युनिर्व्हसिटी गेल्या जुन ०८ मध्ये सोडली. नातेवाईक नाशिक सोडुन दुसर्‍या गावी कॉलेजला निघुन गेला. जातांना त्याने पुणे युनिर्व्हसिटीतून मायग्रेशन सर्टीफिकीटासाठी अर्ज करायला सांगीतला.

नियमाप्रमाणे मी मायग्रेशन साठी अर्ज नाशिक विभागीय कार्यालयातुन रु. २०/- ला विकत घेतला. तो एक्सर्टनला (बहीस्थ) होता म्हणुन त्याला टी.सी. साठी सुद्धा अर्ज करावा लागेल असे विभागीय कार्यालयातुन कळाल्याने तो अर्ज रु. २०/- ला घेतला. (रेगुलर विद्यार्थ्यांचा टी.सी. साठीचा अर्ज कॉलेजकडुन जातो व विद्यार्थ्यांला टी.सी. हातात मिळत नाही. फक्त मायग्रेशन सर्टीफिकीट नंतर अर्जदाराच्या घरी पुणे युनिर्व्हसिटी पोस्टाने २ महिन्यात पाठवते. )

दोन्ही अर्जांसोबत प्रत्येकी रु. १५०/- चे डि.डि. (२ वेगवेगळे डि.डि. पण एकूण रु. ३००/-)"रजिस्टार, पुणे युनिर्व्हसिटी " ह्या नावाने काढावे लागतील असे विभागीय कार्यालयातुन सांगण्यात आले.

मी ते दोन्ही अर्ज (मायग्रेशन सर्टीफिकीट व टी.सी. साठी) व्यवस्थीत भरले. (अर्जातील नियम तर विरोधाभासी आणि विनोदी होते.काहींचा अर्थ लागतच नव्हता. विस्तारभयास्तव येथे देत नाही.) दोन्ही अर्जांसोबत प्रत्येकी रु. १५०/- चे डि.डि. २ वेगवेगळे डि.डि. ,"रजिस्टार, पुणे युनिर्व्हसिटी " ह्या नावाने काढले.

मला पुणे युनिर्व्हसिटीच्या कारभाराची कल्पना असल्याने (मागील एक घटना) मी प्रत्येक गोष्टीत काळजी घेत होतो. डि.डि.ज च्या मागे नातेवाईकाचे नाव, PR No. (Permeant Registration No.), त्याचा पत्ता, फोन नं. लिहिले. त्यांच्या झेरॉक्स काढल्या व माझ्याकडे ठेवल्या. अगदी बँकेचे डि.डि. चे चलन पण जपून ठेवले.प्रत्येक अर्जात मोकळ्या जागी, "मी मायग्रेशन सर्टीफिकीट व टी.सी. दोन्हीसाठी अर्ज करत आहे. मायग्रेशन सर्टीफिकीट सोबत रजीस्टर पोस्टाची तिकिटे लावलेल्या पाकीटात पाठवणे " असे पेन्सीलीने लिहीले. सोबत दोन रजीस्टर पोस्टाची तिकिटे लावलेल्या पाकीटे जोडली. (खरे ते एकच आवश्यक असते. विद्यार्थ्यांला टी.सी. हातात मिळत नाही. फक्त मायग्रेशन सर्टीफिकीट नंतर अर्जदाराच्या घरी पुणे युनिर्व्हसिटी पोस्टाने पाठवते. ) तरी पण मी २५ -३० रुपयांकडे पाहीले नाही.

जुलै, ऑगस्ट गेला. नातेवाईक मायग्रेशन सर्टीफिकीटासाठी विचारत होता. ते दुसर्‍या युनिर्व्हसिटीत वेळेत दिले नाही तर प्रवेश रद्द होतो. मी मिळेल असे सांगत होतो. सप्टेंबर महिन्यात मी पुणे युनिर्व्हसिटीच्या मायग्रेशन डिपार्टमेंटला फोन लावु लागलो. निट उत्तरे मिळत नव्हती. मी सर्व डिटेल्स देत होतो. पण काम कुठे रेंगाळत नव्हते तेच समजत नव्हते. शेवटी मी मायग्रेशन डिपार्टमेंट च्या हेड चे नाव विचारले. ते मोरे म्हणुन ग्रहस्थ होते. (नाव खरेच लिहीले आहे.) त्यांच्याकडून पण काही समजत नव्हते.

शेवटी मी तेथे स्वता: येवू का असे विचारले तर या म्हणाले. मी बाहेरगावाहून येणार तर किती वेळ लागेल ते सांगा? तर ते म्हणाले की लवकर काम होईल.

दोन दिवसांनी मी सकाळी ११:३० वाजता सगळी कागदपत्रे घेवुन मी पुणे युनिर्व्हसिटीच्या मायग्रेशन डिपार्टमेंटला ला पोहोचलो. अजुन मोरे यायचे होते. तो पर्यंत मी ईतरांकडे माझा अर्ज आला का? हे विचारत होतो. सगळे जण एकमेकांकडे बोटे दाखवत होते. इनवर्ड - आउटवर्ड रजीस्टर मेंटेन नव्हते. कामे करणारे सगळे तरूण पोरे- पोरी होत्या. अगदी १८-१९ वयाचे. अर्थातच ते शिकाउ होते हे मी जाणले. एक परमनंट बाई कॉम्पुटर वर सॉलीटेर खेळत होती. बाकी परमनंट लोक गप्पा मारत होते. शिकाऊ पोरे कॉम्पुटर वर गाणे वाजवत होते. एकमेकांना 'हे गाणे लाव, ते गाणे लाव' सांगत होते. आनंदी आनंद होता सगळा.

बेलेकर नावाच्या (नाव खरेच लिहीले आहे) कारकुनाकडे (संताप येतो आहे) पोस्टाने मायग्रेशन सर्टीफिकीट पाठवल्याची यादी आहे ते समजले. त्या यादीतपण नातेवाईकाचे नाव नव्हते. नाव कॉम्पुटर वरील प्रोग्राम मध्ये देखील शोधून सापडले नाही. (Permeant Registration No. असतांना देखील साला प्रोग्राम मराठी आडनावावर यादी सॉर्ट करत होता. (विचार करा डाटा एंट्री करणारे शिकाऊ पोरगा काय नावाने मराठी नावे ईंग्रजीत कन्व्हर्ट करत असेल? ) शिमगा सगळा.

तो पर्यंत माझ्यासारखीच लोकांची गर्दी वाढत होती. कमीत कमी ७५ अर्जदार लोक (बाई मुलगी असेल तर तिच्याबरोबर कमीतकमी १ माणुस तो वेगळा काउंट करा.) तेथे आलेले होते. सगळ्या टेबलांवर कचर्‍यासारखे अर्ज पडलेले होते. काल येथे येवून गेलेले सगळ्या टेबलांवर आपआपले अर्ज शोधत होते. त्यांचे पाहून मी पण माझा अर्ज शोधु लागलो. तेथे सगळ्या टेबलांवर कमीतकमी ४०-५० हजारांवर तरी अर्ज होते. त्या अर्जांमध्येच काही टि.सी. पण होते. आता प्रत्येक टेबलामधून अर्ज शोधणे म्हणजे गंजीतुन सुई शोधणे होते. तेवढ्यात मोरे आले. परत सगळी गर्दी तेथे जमली.

परत सकाळची कहाणी त्यांच्यापुढे झाली. त्यांनी शोधल्यासारखे केले. आणि दुपारी बघू सांगीतले. माझी खात्री झाली की येथे आपला अर्ज भेटणे शक्य नाही. मी एका परमनंट मुलीला भेटलो. (जुनी धेंडे काही कामाची नव्हती.) तीला ताई-बाई करून येथल्या कामाची माहीती करुन घेतली. मिळालेली माहीती धक्कादायक होती. तिने सांगीतले की गेल्या २ महिन्यापासुन येथे दररोज हाच सिन रिपीट होतो. लोक येतात काहींचे अर्ज सापडतात त्यांचेच मायग्रेशन तयार होते. दिवसभरात १५ ते १८ अर्ज सापडतात. आणि ते अर्ज स्वता: अर्जदारच शोधत होते. मायग्रेशन डिपार्टमेंट काहीच हालचाल करत नव्हते हे दिसत होते. त्या मुलीने सांगीतले की तुम्ही तुमचा टि.सी . येथे टि.सी . डिपार्टमेंटने पाठवला आहे का ? ते पाहुन यायला सांगीतले. च्यायला अशी प्रोसीजर होती तर. म्हणुनच मायग्रेशन अर्जांमध्ये मधुन मधुन काही टि.सी . दिसत होते तर.

मी तडक टि.सी . डिपार्टमेंटला गेलो. (उन्हात दुसरी इमारत शोधत शोधत) ते डिपार्टमेंट फारच ऍक्टीव्ह होते. ते म्हटले की, "आमच्याकडे काहीच पेंडींग नाही. हा पहा, या या क्रमांकाचा टि.सी . आम्ही या या तारखेला काढुन मायग्रेशन डिपार्टमेंट ला पाठवला आहे. मायग्रेशन डिपार्टमेंट काहीच कामे करत नाही. नुसता बाजार मांडला आहे त्यांनी. "

मी टि.सी . क्रमांक लिहुन घेतला. स्वारी परत मायग्रेशन डिपार्टमेंट ला आली. आता मी थोडे डोके लावले. पहिल्यांदा मी टि.सी . शोधण्याचा निर्णय घेतला.मी गवताच्या गंजीतुन टि.सी . शोधु लागलो. कान मोरे, बेलेकर आणि इतर अर्जदारांकडे होते. कोणी मुंबई, कोल्हापूर, चंद्रपूर, मालेगाव, जळगाव येथून आले होते. पेठ तालुक्यातुन एकुण १५ जण आले होते. खुद्द पुण्याचे लोकांना "मायग्रेशन लवकरच घरी येईल तुम्ही जा" सांगत मोरे कटवत होते.

वाशी चा एकजण रडत होता. मायग्रेशन न मिळाल्याने त्याचे मागच्या वर्षीचे ऍडमीशन कॅन्सल झाले होते. त्याने १ वर्ष मुंबई विद्यापिठाला रोखुन धरले होते. मी फारच सावध झालो. पटापट माझा मायग्रेशन / मायग्रेशन अर्ज - जे काही सापडेल ते शोधू लागलो. तेवढ्यात एका गठ्यात मला माझ्या नातेवाईकाचा मायग्रेशन सापडला. मी लगेच तो घेवुन मोरे ला भेटलो. त्याला सगळे कागदपत्रे दाखवले. डि. डि. च्या झेरॉक्स दाखवल्या. मिळालेले टि. सी. दाखवले. रजीस्टर पोस्टाची विद्यापिठाच्या शिक्क्याची एकनॉलेजमेंट दाखवली.

माझी अर्धी लढाई झाली होती. एका बाईकडे डि. डि. च्या झेरॉक्स नव्हत्या. ती बँकेच्या रिसीट दाखवु लागे. मोरे ते नाकारे. माझी बाजू आता वरचढ झाली होती. मी मोरेंना म्हटले, "माझे सगळी कागदपत्रे आहेत. डि. डि. , अर्ज, मार्कशीट, पाकीट तुम्ही शोधा. एवढ्या उकीरड्यात मी शोधत नाही. तुम्ही मला मायग्रेशन देउन टाका. "

माझा वार वर्मी लागला होती.

मोरे: "तु तुझा टी. सी. *** यांच्याकडे दे, मी सांगतो त्यांना मायग्रेशन तयार करायला."

त्यानी माझे नाव ईतर अर्ज सापडलेल्यांच्यबरोबर घ्यायला सांगीतले.

मी सावधगीरीने टी. सी. जमा केला नाही.

मी त्या *** ला (नाव विसरलो.) पुन्हा पुन्हा खात्रीसाठी विचारू लागलो. तो म्हणाला, "ए पांढरा शर्ट, डोके नको खाऊ, तु जेवण करुन ये, तुझे मायग्रेशन ४ वाजता भेटेल. " मी जेवण करायला कँपस मधल्या कँन्टीन कडे निघालो. खाली मी टी. सी. च्या २/३ झेरॉक्स काढल्या. मी आता निश्चींत झालो होतो. मी टि.सी. जमा केलेला नव्हता.

कँन्टीन मध्ये काहीतरी बकाबका खाल्ले आणि थम्स अप घेतेले. परत मायग्रेशन डिपार्टमेंटला आलो. तिथे गर्दीत चाळा म्हणुन, मायग्रेशन अर्ज सापडला तर सापडला म्हणुन मी मायग्रेशन अर्ज शोधू लागलो. तेव्हा मोरे / बेलेकर मंडळी इतर अर्जदारांवर खेकसत होते, काम टाळत होते.

ते बघुन डोक्यात तिडीक गेली. आपण काय शोधतो ते डिपार्टमेंटवाले कोणीच बघत नव्हते. सगळा उदास कारभार होता. समोर अर्जदारांचे डि.डि. होते. त्यात काही नाशिकचे पण डि.डि. होते. मायग्रेशन डिपार्टमेंट चा कारभार लक्षात आला होता. तो उघडकीला आणायची डोक्यात आयडीया आली. मेव्हणे पत्रकार होतेच. त्यासाठी डि.डि. ढापण्याची आयडीया आली. पण विचार केला एवढा निच विचार करू नये. ईतरांचे नुकसान करू नये. त्यातच एक जण नाशिकचा भेटला. त्याचेही माझ्यासारखे निम्मे काम झाले होते. मग आमची जोडी जमली. मी कमीतकमी पुरावा म्हणुन ३ तिकीटे लावलेली पाकीटे उचलली आणि बॅगेत टाकली.

माझे काम मायग्रेशन चे काम प्रगतीपथावर होते. *** ना परत परत विचारत होतो. ते म्हणत , "तु येथुन जा, डोके नको खाऊ." मी मजा घेत होतो.

ईतर लोक मात्र काम होत नाही म्हणुन भडकत होते. आम्ही दोघांनी पेठ च्या १५ जणांना "माहीतीचा अधीकार " येथे वापरण्यास सांगीतले. ईतरांना अर्ज शोधण्यासाठी मदत करू लागलो.

लोक आता जाम भडकले होते. आम्ही दोघे मग मेन रजिस्टार कडे काम होत नाही हे जावुन सांगीतले. त्यांनी मोरे ला त्यांच्या रुम मध्ये बोलावले. बहूतेक झापले असेल. पण मोरे आल्यानंतर त्याने बेलेकरला अर्ज शोधायला लावले. ते काम बेलेकराच्या बापानेपण झाले नसते. तो पेशवेपण उपभोगत होता. त्याने सरळ मोरे ला (डिपार्टमेंट हेड) सांगीतले की, "माझे काम आउटवर्ड चे आहे. तेच मी करणार. तुम्हाला काय करायचे ते करा. मी अर्ज शोधणार नाही. " आणि तो तयार न झालेले मायग्रेशन ची वाट बघत रिकामा बसला.

थोड्या वेळाने *** ने ५ /६ मायग्रेशन सर्टी. तयार केले. त्यात माझे मायग्रेशन सर्टी. पण होते याची खात्री केली. तो गठ्ठा एका साहेबाकडे सह्या करुन आला. तो गठ्ठा आता बेलेकर कडे आला डिसपॅचसाठी. बेलेकर बोलायला लागला, "मी हे मायग्रेशन सर्टी. कोणालाही हातात देणार नाही. मी पोस्टातच टाकेल. " माझे डोके सटकले. त्याला झापायचे ठरवले.

माझे मायग्रेशन सर्टी. तयार झाले होते. पण आउट करायचे बाकी होते. आणि बेलेकर पेशवेगीरी करत होता. आम्ही त्याला बाबा-पुता केले आणि त्याने मायग्रेशन सर्टी. हातात दिले.

माझे काम झाले होते. मायग्रेशन सर्टी. आणि टि.सी. (टि.सी. कुणालाच भेटत नाही. ) माझ्या हातात होते.

मी आणि नाशिकच्या मुलाने बेलेकरला डोस दिला. असे करणे शोभते का ? काम करत जा वैगेरे. पण तो गेंड्याच्या कातडीचा निघाला. मला परत निघायचे होते म्हणुन मी तेथुन बाहेर पडलो.

नंतर कामाच्या गडबडीत माझ्या या स्ट्रिंग ऑपरेशनचे पत्रकार मेहूणे यांना सांगणे राहून गेले. आणि आपण सारे एका अनुभवाला मुकलो.

हे कधीचे लिहायचे होते पण राहुन जात होते. आज ते पुर्ण केले.

आपणास पुणे युनिर्व्हसिटीतुन मायग्रेशन सर्टीफिकेट काढायचे असेल तर २ दिवसांच्या तयारीने स्वता: जा आणि मायग्रेशन सर्टीफिकेट हातात घेवुनच बाहेर पडा.

Friday, April 03, 2009

दोन राज्यांचे रेल्वे स्टेशन - Railway Station of two States

नवापुर - (हो तेच ते बर्ड फ्लू वाले) हे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याच्या हद्दीवर वसलेले तालूक्याचे ठिकाण आहे. येथूनच राष्ट्रीय महामार्ग ६ (नागपूर- सुरत) जातो. ते नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात मोडते. स्वतंत्र महाराष्ट्र होण्यापुर्वी हे गाव गुजरात मध्ये जाणार होते. त्या वेळी तेथील लोकांनी ठराव करून हे गाव महाराष्ट्रात आणले. (गुजरात मधील सुब्बत्ता बघुन त्यांचे आत्मे आता पस्तावत असतील.) या गावात मराठी तसेच गुजराथी लोक गुण्यागोवींदाने राहतात. शहरात नगरपालिका स्वच्छ्तेची विषेश काळजी घेते असे दिसले।

Navapur is a taluka place in tribal Nandurbar District, situated on the National Highway No. 6, and it is the last town on the Maharashtra border. Gujarat state Border starts after 1 KM from this city. Marathi as well as Gujarati community lives here. In the year of 2006 Bird Flew hits Navapur poultry industry badly.

गाव उकाई धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याच्या (मराठीत आपले 'बॅक वॉटर' हो)जवळ आहे. निसर्गाने या तालूक्याला भरभरून दान दिले आहे. या तालुक्यात सागाची भरपूर वने आहेत. पावसाळ्यात येथे जातांना चरणमाळ आणि कोंडाईबारी या घाटांमध्ये असलेल्या जंगलातले द्रुष्य तर मनोरम असते.
येथील आदिवासी रहीवासी कष्टाळू आहे. शासनाच्या क्रुपेमुळे (!!) त्यांची आर्थीक परीस्थीती चांगली आहे.
या ठिकाणी लाकूड कताई / लाकूड काम फार मोठ्या प्रमाणात चालते. सुतार लोक प्रामाणीक आहेत. गिर्‍हाईकाकडुन योग्य मोबदला घेवुन सागवानी ला़कडाचे सामान बनवून दिले जाते.

This town is on the banks of Ukai Dam. There is lots of Jungle having many trees of Sag.While going Navapur during rainy season, The Ghats of Charanmal and Kondai Bari looks fabulous.

या गावाच्या परीसरात बर्ड फ्लू च्या साथीने कोंबड्या मरण्यापुर्वी (२००६) कोंबड्याची शेते (पोल्र्ट्री फार्म) फार मोठ्याप्रमाणात होती. इतकी की, गाव ५-६ कि.मी. वर असतांना कोंबड्यांच्या शेतांमधुन विशीष्ट वास येई. आता ते प्रमाण फारच कमी झाले आहे.
या गावाची भौगोलीक रचना काहीतरी वेगळी असल्याने येथील हवा कोरडी असुनसूद्धा फार गरम होते. थंड वारे सहसा वाहतच नाही. बारोमास तुम्ही पंख्याशीवाय राहूच शकत नाही. (१ कि.मी. च्या फरकाने हेच गाव गुजराथ मध्ये असले असते. गुजरात मध्ये भारनियमन नाही. )सुरत, बारडोली, बडोदा सारखे मोठे शहरे जवळ असूनही येथील MIDC नावालाच आहे. ("गुजरात मधील सुब्बत्ता बघुन ..." ह्या वाक्याचा संदर्भ आत्ता तुमच्या लक्षात आला असेल.) असो. कालाय तस्मै नमः

The tribal community here is very hardworking community.
You can found lots of wood cutting / wood working mills here. The carpenters are the good worker and they make the wooden furniture of Sag wood due to plenty supply of Sag trees.
Due to geographical situation here, you can't live here without electric fan. Even though the air is dry and trees as well as jungle around here, there is always a hot air during a year.

आता या लेखाच्या मुख्य शीर्षकाबद्दल्...नवापुर रेल्वे स्टेशन हे पश्चिम रेल्वे च्या सुरत-जळगाव या मार्गात येते. येथे जो रेल्वे फलाट आहे तो अक्षरशा: निम्मा महाराष्ट्रात आणि निम्मा गुजरात राज्यात येतो.
The uniqueness of Navapur's railway station is its railway platform is exactly half in Maharashtra and half in Gujarat.
जसा:===========गुजरात हद्द [ नवापुर रेल्वे फलाट ] महाराष्ट्र हद्द============
Navapur RS1
छायाचित्र क्रमांक १. विकीमॅपीयावरील नवापुर रेल्वे स्टेशनचे छायाचित्रछायाचित्रात जी लाल रेषा आहे त्या ठिकाणी दोन्ही राज्याची हद्द सुरु होते (किंवा संपते). (मी जसे काही वाघा बॉर्डर वर उभा आहे असे सांगतो आहे. )
Photo. 1. This photo is taken from Wikimapia. The read line divides the Navapur railway platform in to half in Maharashtra and half in Gujarat. This photograph shows exact border of these states.

Navapur RS2छायाचित्र क्रमांक २. आस्मादिकांचे चिरंजीव महाराष्ट्रात तर भाचेराव फुटभर लांब असलेल्या गुजरातेत उभे!
Photo 2. This photo shows the monument on the Navapur railway platform. The boy who salutes is my son who is in Maharashtra and nephew stands in Gujarat, a few feet apart.


Swarali at a Navapur Railway Station: A Railway Station of Two States - Maharashtra and Gujrat
स्वराली नवापुर रेल्वे स्थानकावर, नवापुर रेल्वे स्थानक महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर आहे.
 
ह्या फलाटावर तिकीट देणारा कारकून हा महाराष्ट्रात बसतो (छायाचित्रात पत्रे टाकलेली जागा जरा बारकाईने बघा); आणि तिकीट घेणारा पासिंजर हा गुजरातेत उभा असतो (आग विझवणार्‍या बादल्या / सिमेंटची जाळी या मागे). पासिंजरचा खांदा गुजरातेत आणि पैसे घेतलेला हाताचा पंजा महाराष्ट्रात असतो.

The ticket booking clerk sits in Maharashtra (behind the roofing sheets) and the passenger stands in Gujarat (behind the fire sand buckets).

Navapur RS3छायाचित्र क्रमांक ३. नवापुर रेल्वे स्टेशनची पाटी
Photo 3. Navapur railway Station Board.
The ticket booking clerk sits in Maharashtra (behind the roofing sheets) and the passenger stands in Gujarat (behind the fire sand buckets).

Navapur Co-op. Sugar Factoryछायाचित्र क्रमांक ४. डोकारे (नवापुर) येथील सहकारी साखर कारखाना
Photo 4. Dokare (Tal. Navapur) Adivasi Co-operative Sugar Factory

आम्ही गेलो तेव्हा उसासाठी मारामार चालु होती. त्यामुळे कारखाना बघण्यासाठी थोडे थांबावे लागले. नंतर कारखान्याच्या कार्यस्थळापासुन जवळच असलेल्या गावी एका लाकुड काम करणार्‍या सुताराच्या वर्कशॉप ला भेट दिली।
We have to wait for a while we visited Sugar Factory as there is shortage of sugarcane. After that we visited a carpenter's workshop.