Saturday, May 23, 2026

पाभे की बात नं ८

पाभे की बात नं ८

मितरों,  

आता इथेनॉलचा नवा जोर चाललाय! सरकार म्हणतंय – पेट्रोलात इथेनॉल मिक्स करा, जास्त करा, E30 पर्यंत करा, शेवटी E100 करा! म्हणजे १००% इथेनॉल. गडकरी साहेब म्हणतात, “पेट्रोल सोडा, इथेनॉल प्या... अरे म्हणजे गाडीत घाला!”  

मिटरों, मी तर लगेच माझ्या गाडीत E100 भरलं. आता गाडी चालते आहे, पण सुंगध येतोय ती देशी दारूची! शेजारचा पोलिस म्हणाला, “साहेब, हा ब्रेथ ॲनालायझर कशाला घेतलाय आम्ही? त्याचेशिवायही वास येतोय.”  

आता प्लॅन असा आहे –  
- पेट्रोल महाग? इथेनॉल घाला.  
- मायलेज कमी? म्हणजे कमी फिरा, पर्यावरण वाचवा.
- गाडी बिघडते आहे? गॅरेजमध्ये न्या. 
- गाडी बंद पडली? शेतकऱ्यांना धन्यवाद द्या, त्यांचा उसाचा रस चालवताय!  

मितरों, लवकरच गाड्या धान्यावर चालतील. फक्त एक सल्ला – E100 भरताना गाडीला “नॉन-व्हेज” स्टिकर लावा!

आणि हो, एक सांगायचे राहीले. इथेनॉल मिक्स करण्याचा धसका इराण, सौदी, रशीया, अमेरीका इत्यादी तेल पुरवठादार देशांनी घेतला आहे. आता त्यांचे हक्काचे गिर्हाईक गेले समजा. 

हा एक मास्टरस्ट्रोक आहे.  

भेपुपाकीबा त.  

#पाभे_की_बात

Thursday, May 21, 2026

पाभे की बात©® नं ७

पाभे की बात©® नं ७ 

मितरों, 

गेल्या काही दिवसांत एक फसलेली पत्रकार परिषद बघितलीत का? माइक चालत नव्हता, टेलीप्रॉम्टरवर अक्षरे दिसत नव्हती,  प्रश्न विचारणारा पत्रकार हरवला, आणि उत्तर देणार्या आय ए एस साहेबाचा घसा बसला अन “आमच्या देशाने पूर्वी...” म्हणताच टेबलावरची फाइल पडली. एकदम फोटोजेनीक अगदी आपल्या ठरवून काढलेल्या फोटोंसारखे! 

मग काय, आता सरकारने नवीन नियम काढला आहे – फसलेल्या पत्रकार परिषदेला “क्रिएटिव्ह प्रेस ब्रीफ” म्हणायचं. ज्यांना काही समजलं नाही त्यांना “डीप स्टेट” समजावं. आणि जे काही चुकीचं बोलले गेलं त्याला “कॉन्टेक्स्ट” म्हणायचं. 

मिटरों, 

गलगोटीया युनिव्हर्सिटीने या अशा प्रकारच्या पत्रकार परिषद घेण्यावर एक अभ्यासक्रम सुरू केला आहे. प्राध्यापिका आहेत - ओरीऑन रोबोटच्या नेहा सिंघ. आपण सर्वांनी या कोर्सचा फायदा घेतला पाहीजे. 

मिटरों, 

मागच्या काही पाभे की बातेंवर काही मंडळींच्या हुरूप वाढवणार्या प्रतिक्रिया आल्या आहेत. मिपा नावाच्या गावातील एक सदस्य सुक्या यांनी "पाभे की बातें" चे हजारो एपीसोड करण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. त्यांना "मेलोडी" चॉकलेटचे एक पाकीट पाठवले जाईल.

तेथीलच दुसरे सदस्य विजुभाऊ यांचे या बातें ऐकाव्यात की नको याबाबत बहूदा दुमत होते आहे. त्यांनी पायओढू सदस्यांचे न ऐकता त्यांच्या मन की बातेंचे एकले पाहीजे. 

खरे तर पाभे की बातें तली मते बहूतेक सदस्यांना मान्य असतात किंवा ते त्यावर मार्मीक हसत असतात. पण येथे प्रतिक्रिया देतांना त्यांना त्यांचा इगो आडवा येतो. मी मोठा आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, प्राध्यापक आहे, वेब डिजायनर आहे, प्रोग्रामर आहे, प्राध्यापक डॉक्टर आहे, प्रोग्रामर आहे, डेव्हलेपर आहे, कवी आहे, लेखक आहे, तर मग मला ही बाते मान्य असूनही मी तेथे प्रतिक्रिया का द्यावी? हा कोण मोठा तत्वज्ञ वाया चाललाय? असे त्यांना वाटत असते. पण मितरों, आपण कमीतकमी १० हजार करोड एपीसोड पूर्ण करणार किंवा १ रुपयाला १ डॉलर किंमत मिळेपर्यंत आपण पाभे की बाते लिहीत राहणार. श्वान भुंकत असूनही रस्त्याने हत्ती चालतच असतो. त्याच न्यायाने कोणी कितीही आरडाओरड केली तरी आपण बातें करतच राहणार. 

देशासाठी काहीतरी करायचे म्हटले तर केवळ मनीपुरकडेच लक्ष देणे (मणीपुर नव्हे) महत्वाचे नसते. 

असो. 

तर पुन्हा पत्रकार परिषद या विषयावर येतो. वरील नव्या तंत्राने आता प्रत्येक परिषद यशस्वी ठरेल. फक्त माइक बंद ठेवा, प्रश्न विचारू नका, उत्तर देऊ नका – पूर्ण यश!


भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात ६

पाभे की बात ६ 

माझ्या प्रिय देशवासीयांनो, 

मागच्या बातेनंतर आपली भेट आमच्या पाच देशांच्या भेटीमुळे होऊ शकली नाही. त्यामुळे विमानातूनच आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत. 

देश भयंकर संकटातून जात आहे. सरकारी उपक्रमातल्या कंपन्यांचे उद्योग खाजगी कंपन्यांना विकल्याने सरकारकडे पैसा जमा झाला आहे ही सुखाची बाब आहे. तसेच इलेक्षन बॉन्ड हे जेम्स बॉन्ड सारखे धावत असून भरपूर पैसा त्यातून सरकारला मिळाला आहे. यातून हे जागतीक संकट आपण पेलू शकू. 

आम्ही बॅंकानाही काटकसर करण्याचा सल्ला दिला आहे. बॅंलातले काऊंटरवर ठेवण्यात येणारे पेन आता आपण नाही ठेवणार. त्यामुळे सर्व देशात मिळून चक्क एकूण रुपये ८६५४/- बचत होणार आहे. बॅंकात पिण्याचे पाणी आणि टॉयलेटचे पाणी आपले आपण घरूनच आणायचे आहे. 

रुपया या चलनाची व्याख्या आज रात्री बारा वाजेपासून Relation Under Paisa And Young Adult = Rupaya
अशी असणार आहे. बदलत्या व्याख्येनुसार रुपया हा तरूणांमध्ये जास्त खेळता राहणार आहे. यातूनच देशाच्या तरूणांना पैशाच्या खेळाचा रोजगार मिळणार आहे. 

अजून बरेच काही बोलायचे आहे. पण ते आमचा परदेश दौरा संपल्यानंतरच. 

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात ५

पाभे की बात ५

मिटरों,

उन्हाळ्याच्या नावाखाली पुरूष मंडळी अगदी अंडरपॅंटला देखील लाजवेल अशी चड्डी घालत आहेत. घालणाऱ्याला लाज वाटत नाही, पण पाहणाऱ्याला लाज वाटते.

अशा लोकांना मोदी सरकारच्या वतीने इस्रायलला पाठवण्यात येणार आहे.

भेपुपाकीबा त.

पाभे की बात ४

पाभे की बात ४ 

मिटरों, 

मागच्या दोन बातांमध्ये आमचे मित्र विजूभाऊ यांनी परीक्षेचे पेपर फुटल्याने अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळते तसेच कडक उन्हात शर्टच्या खिशात धुण्याची पावडर ठेवून शर्ट आपोआप धुवून निघेल अशी कल्पना दिली. त्यांचे आभार. 

तर मिटरों, 

येणार्‍या आर्थिक संकटाशी लढण्यासाठी आपण संसदेच्या कॅन्टीनमधल्या थाळीत केवळ पंचवीस पदार्थ देणार आहोत. या आधीच्या थाळीतले आपण पाच पदार्थ कमी केले आहेत जसे की एक्स्ट्रा मिठ, एक्ट्रा मिनरल पाणी, एक्ट्रा चटणी, एक्ट्रा पापड, एक्ट्रा कोशंबीर इत्यादी. 

तसेच सदर थाळीची किंमत महागाईशी लढण्यासाठी आपण तब्बल १०० रुपयांनी कमी केली आहे याची नोंद घ्यावी. 

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात ३

पाभे की बात

मितरों, 

परिक्षेचे पेपर फुटले तर त्याच्या उडणार्या तुकड्यांनी विद्यार्थी जखमी होतात. 


त्यामुळे पेपर फुटण्यापेक्षा लीक झाले तर चालेल, त्यात ते कुणाला लागून जखमी होण्यासारखे नुकसान नाही होत. 

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात २

पाभे की बात २

मितरों,

सूर्य अकाशातून आगीचे गोळे फेकतो आहे. तापमान असह्य झाले आहे. का नाही या संधीचा फायदा घ्यावा? (क्यूं न इस मौके का फायदा उठाया जाय?)

रस्त्याने जातांना प्रत्येकाने छत्री घ्यावी. म्हणजे उन्हापासून संरक्षणही होईल आणि उन्हात फिरण्याचा आनंदही घेता येईल. वाहन न वापरल्याने देशाचे इंधन आणि पैसा वाचेल तो अजून एक फायदा आहेच.

भेटूया पुढील "पाभे की बात" मध्ये.

#पाभे_की_बात


पाभे की बात १

पाभे की बात १

मितरों,

कालच मी जवळपास एक किलो च्या आसपास सोने घेण्यास भाजीच्या पिशवीसहीत निघालो​ होतो. आपण बाबा पर्यावरण, देश, प्रदूषण इत्यादी बाबतीत फार जागरूक असतो. बिअरच्या बाटल्याही हॉटेलातून घरी घेऊन सकाळी भंगारात देतो. एकदम पर्टीक्यूलर बाबा आपण.

तर तेवढयात पंतप्रधानांनी पेट्रोल वाचवा, सोने घेऊ नका असा उपदेश केला. मग काय, आपण तर पंप्रनांचे एकदम भक्त. सोने घेणे कॅन्सल केले.

तेवढयाच किंमतीची चांदी घेतली अन घरी आलो. भाजी देखील त्याच पिशवीतून आणली.

आपण तर एकदम पर्टीक्यूलर रे बाबा.

भेटूया पुढल्या पाभे की बातेत. 

#पाभे_की_बात 

Tuesday, May 19, 2026

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||ध्रू||

जवा येईल तवा आणीन पेट्रोल डिजेलला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||१||

सैपाक करत होती तवाच सिलेंडर संपला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||२||

साडी चोळी नको, नको घेऊ माळ तू मला
एकडाव पेट्रोलची टाकी भरून दे गाडीला ||३||

कोबीची भाजी करपली, मासे नाही भाजीला
डोनाल्ड अन बेंजामीनचा मुडदा बशिवला ||४||

राकेल नाय मिळत, झाडं नाय सरपणणाला
लवकर ये घराला, काळजी लागली मला ||५||

- पाभे
१८/०४/२०२६

पाषाणभेद चुल, स्टोव्ह प्रशिक्षण, विक्री, दुरूस्ती, सुट्टे भाग विक्री केंद्र

 May be an image of text

"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम

"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम (सदर कथेमध्ये मानवी मनाच्या कल्पनेचा विस्तार केला आहे. सदर कथेमध्ये कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीचा, देशाचा, संस्थेचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. सदर कथा काल्पनिक आहे. वाचकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने लिखाण केले आहे.) 

२१ व्या शतकाच्या मध्यावर जग एका विचित्र टप्प्यावर येऊन ठेपले होते. विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली होती; पण मानवाचे जुने स्वभाव सत्ता, भीती आणि वर्चस्व अजूनही तसेच होते. या पार्श्वभूमीवर राण नावाच्या छोट्या पण हट्टी देशाने इतिहासात नोंद होईल अशी लढाई लढली. राण हा भूगोलाने लहान पण मनाने मोठा देश होता. डोंगर, दऱ्या, जंगले आणि कठीण हवामान यामुळे त्याची जमीन जिंकणे कधीच सोपे नव्हते. लोक साधे, मेहनती आणि स्वाभिमानी होते. त्यांच्या संस्कृतीत स्वातंत्र्याला देवासारखे स्थान होते. 

पण जगाच्या राजकारणात मोठा खेळ सुरू झाला. महासत्ता मानले जाणारे दोन मित्रदेश इस्त्रा आणि मेरीका यांनी एकत्र येऊन राणवर दबाव टाकायला सुरुवात केली. त्यांना राणच्या पर्वतरांगांमध्ये सापडलेल्या दुर्मिळ ऊर्जा खनिजावर नियंत्रण हवे होते. त्या खनिजामुळे पुढील पिढीची ऊर्जा तंत्रज्ञान क्रांती घडणार होती. इस्त्रा आणि मेरीका तंत्रज्ञानात अत्यंत पुढे होते. त्यांच्या सैन्याकडे स्वयंचलित ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्तेने चालणारे युद्धरोबोट, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आणि अवकाशातून माहिती देणारे उपग्रह होते. युद्ध सुरू होण्याआधीच जगातील बहुतेक विश्लेषकांनी निकाल लावला होता “राण काही दिवसांत शरण येईल.” पण इतिहास नेहमी गणिताप्रमाणे चालत नाही. युद्धाचा पहिला दिवस आला तेव्हा इस्त्रा-मेरीकाच्या आकाशात ड्रोनची काळी सावली पसरली. त्यांच्या स्मार्ट क्षेपणास्त्रांनी राणच्या अनेक सैनिकी तळांवर अचूक हल्ले केले. उपग्रहांमधून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती. 

तरीही राणचे सैनिक मागे हटले नाहीत. राणच्या सैन्याकडे फारशी आधुनिक साधने नव्हती; पण त्यांच्याकडे होते भूभागाचे ज्ञान, स्थानिक लोकांचे समर्थन आणि एक जिद्द: “जमीन गमावली तरी चालेल, स्वाभिमान नाही.” डोंगरातील बोगदे, जंगलातील लपवलेल्या मार्ग आणि छोट्या मोबाइल तुकड्यांच्या मदतीने त्यांनी गुरिल्ला युद्ध सुरू केले. रात्री अचानक हल्ले, दिवसाढवळ्या अदृश्य होणे हे त्यांचे तंत्र होते. त्यांनी इस्त्रा-मेरीकाच्या महागड्या ड्रोनना साध्या इलेक्ट्रॉनिक जॅमिंग उपकरणांनी गोंधळात टाकले. काही ठिकाणी गावकऱ्यांनी स्वतःचे नेटवर्क तयार करून शत्रूच्या हालचालींची माहिती सैन्याला दिली. जगभरातील लोकांना आश्चर्य वाटू लागले. तंत्रज्ञानाने भरलेली मोठी सैन्ये एका छोट्या देशासमोर अडकली होती. महिने गेले. युद्ध लांबत गेले. इस्त्रा आणि मेरीकाच्या अर्थव्यवस्थेवरही ताण येऊ लागला. प्रत्येक दिवसाच्या युद्धखर्चाने त्यांच्या लोकांमध्ये प्रश्न निर्माण होऊ लागले “इतक्या छोट्या देशासाठी आपण इतके का लढतो आहोत?” राण मात्र अजूनही उभा होता. शेवटी एक गोष्ट स्पष्ट झाली: युद्ध केवळ मशीन जिंकत नाहीत. मानवाची इच्छाशक्ती, जमीनाशी असलेले नाते आणि स्वातंत्र्याची भूक हे कधी कधी अत्याधुनिक तंत्रज्ञानालाही थांबवू शकतात. आणि म्हणूनच इतिहासात त्या संघर्षाला नंतर एक नाव दिले गेले “द जिद्द ऑफ राण”. 

राण-इस्त्रा-मेरीका युद्ध सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच त्याचे परिणाम संपूर्ण जगावर दिसू लागले. ऊर्जा पुरवठा खंडित झाला, व्यापारमार्ग विस्कळीत झाले आणि जागतिक अर्थव्यवस्था डगमगली. पण या सगळ्यात सर्वात जास्त उलथापालथ झाली ती भार देशात. भार हा मोठा, लोकसंख्येने प्रचंड आणि विविधतेने भरलेला देश होता. पण युद्धकाळात त्याची व्यवस्था ढासळू लागली. इंधनटंचाई इतकी वाढली की शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर दोन-दोन दिवस रांगा लागत. अन्नधान्याच्या गोदामांवर ताबा मिळवण्यासाठी काही ठिकाणी लोकांनी दरोडे टाकले. बेरोजगारी वाढली आणि कारखाने बंद पडू लागले. 

या काळात सत्तेत होते दाम सरकार. त्या पक्षाची एक विचित्र परंपरा होती.जो कोणी प्रधानसेवक असे, त्याच्याच नावाने सरकार ओळखले जाई. त्यामुळे लोक सरकारपेक्षा व्यक्तीकडेच जास्त पाहत. पण परिस्थिती आणखी बिघडली जेव्हा प्रधानसेवकांचे नाव अचानक “पिस्टन कागदांमध्ये” समोर आले. त्या गुप्त कागदपत्रांमध्ये जगभरातील काही नेते आणि उद्योगपतींच्या आर्थिक व्यवहारांबद्दल गंभीर आरोप होते. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ही बातमी उचलून धरली आणि भारची प्रतिमा डळमळू लागली. देशात आधीच अस्वस्थता होती. लोकांच्या मनात प्रश्न उभे राहू लागले. “युद्धामुळे त्रास आहे की व्यवस्थेतील चुका?” “देश चालतोय का फक्त घोषणांनी?” 

दाम पक्षाचे सर्वेसर्वा दाम मात्र राजकारणाचे जुन्या पद्धतीचे पण चतुर खेळाडू होते. त्यांना माहीत होते की संकटाच्या वेळी लोकांचे लक्ष वळवणे, भावना पेटवणे आणि सामूहिक कृती निर्माण करणे ही एक राजकीय रणनीती असते. म्हणूनच त्यांनी काही प्रतीकात्मक उपक्रम जाहीर केले. पहिला उपक्रम होता २२ मार्च ३०२६. त्या दिवशी संध्याकाळी ठरावीक वेळी लोकांनी घराच्या बाल्कनीत उभे राहून टाळ्या आणि थाळ्या वाजवाव्यात असे आवाहन करण्यात आले. अधिकृत स्पष्टीकरण असे दिले गेले की संकटकाळात काम करणाऱ्या “नेते, राज्यपाल, पक्षप्रमुख, बुथप्रमुख आणि मातृसंस्था ‘राजा स्वयंभक्त संत’ (रास्वसं)” यांचे आभार मानायचे आहेत. 

सरकारी माध्यमांनी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर दाखवला. दूरचित्रवाणीवर सतत संदेश चालू होते. “एकता दाखवा.” “राष्ट्रासाठी आवाज करा.” “कृतज्ञता व्यक्त करा.” काही शहरांमध्ये लोकांनी खरोखर उत्साहाने थाळ्या वाजवल्या. काही ठिकाणी मात्र लोकांनी केवळ शांतपणे पाहिले. काहींनी तर उपहासाने रिकाम्या भांड्यांवर चमचे आपटले.जणू अन्नटंचाईचीच आठवण करून देत. पण दाम इथेच थांबले नाहीत. दुसरा उपक्रम जाहीर झाला ५ एप्रिल ३०२६ साठी. रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी सर्वांनी ८ मिनिटांसाठी दिवे बंद करून मेणबत्त्या, दिवे किंवा मोबाइल फ्लॅश लावावेत असे सांगितले गेले. त्यामागे अधिकृत कारण दिले गेले - युद्ध आणि टंचाईच्या काळात लोकांना मानसिक आधार देणे आणि “अंधारावर प्रकाशाचा विजय” दाखवणे. त्या रात्री भार देशातील अनेक शहरांमध्ये विचित्र दृश्य दिसले. उंच इमारतींच्या खिडक्यांतून लुकलुकणारे छोटे दिवे दिसत होते. काही ठिकाणी लोकांनी छपरांवर येऊन दिवे लावले, तर काही भाग पूर्ण अंधारातच राहिले. जगातील माध्यमांनी हे दृश्य दाखवले. “संकटात सापडलेला देश, पण प्रतीकात्मक एकता दाखवण्याचा प्रयत्न.” 

पण जमिनीवरची वास्तविकता वेगळीच होती. दिवसाढवळ्या रेशन दुकानांवर भांडणे होत होती. काही औद्योगिक शहरांत कारखाने बंद पडल्याने हजारो कामगार गावाकडे परतत होते. ग्रामीण भागात अन्नधान्य लपवून ठेवण्याच्या अफवा पसरत होत्या. शहरांमध्ये रात्री दरोड्यांचे प्रमाण वाढले. 

लोकांच्या मनात दोन भावना एकाच वेळी वाढत होत्या. एकीकडे थकवा आणि असुरक्षितता, आणि दुसरीकडे शांतपणे उगवणारा प्रश्न: “प्रतीकांनी देश वाचतो का?” इतिहासकार नंतर म्हणाले की त्या काळात भार देशात दोन वेगवेगळे वास्तव एकाच वेळी चालू होते. एक प्रकाश आणि घोषणांचे, आणि दुसरे टंचाई आणि अस्वस्थतेचे. आणि त्या दोन वास्तवांच्या मध्येच पुढील मोठ्या राजकीय वादळाची बीजे शांतपणे रुजत होती.

दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे

 दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे ||१|| 

किती घ्यावे पुण्य जळूनी पाप जाय ||२|| 

कृपानिधींचा आशीर्वाद सदा असे डोई ||३|| 

त्रैमूर्ती सदोदीत डोळ्यासमोरी राही ||४||

ब्लॅंकेट काढ, दुलई काढ

ती: खूप थंडी आहे यंदा. पांघरायला ब्लॅंकेट काढू का दुलई काढू? 

तो: ब्लॅंकेट काढ. 

ती: पण ब्लॅंकेट धुवायला लागते आधी. 

तो: मग दुलई काढ. 

दुलई फार हलकी आहे वजनाला. 

मग ब्लॅकेट काढ. 

ब्लॅंकेटने काय थंडी थांबते का? 

मग दुलई काढ. 

दुलई थोडी आपरी आहे. 

मग ब्लॅंकेट काढ. 

ब्लॅंकेट अंगाला टोचते. 

मग दुलई काढ. 

दुलई कॉटनच्या कापडाची नाही नं. 

मग ब्लॅंकेट काढ. 

ब्लॅंकेट लई महागाचं आहे नं. 

मग दुलई काढ. 

जाऊद्या, आपली गोधडीच बरी आहे.

रानफुले

असाच भटकत रानात असता
रानफुले समोर येती

नव्हता कसला गंध तयांना
रंगही नव्हते भरजरी 
 
विविध परी तयांत होती 
नक्षी बारीक नाजूक सुंदर 
 
कोमल पिवळे गेंद 
उन्हात चमके वार्यावरती 
 

वेड लागले मलाच तेथे 
दृष्य मनोरम खरोखर ते 
 
डोंगर उतार पठारावरती 
फुले पाहता लागली समाधी 
 
घोस तयांचे लेऊन घ्यावे 
वाटले तक्षणी अंगावरती 
 
एकरूप व्हावे, तेथेच रमावे 
परत न फिरावे घराप्रती 
 
बघतो जेव्हा अचानक 
रानफुले समोरी येती 
 
- पाभे (03/10/24) 
(काल डोंगर उतारावर पाहिलेले दृष्य)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट: लग्नातले उखाणे

 अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नात एकमेकांनी उखाणे कसे घेतले असतील? आपण कल्पना करू आणि तुमच्या कल्पनेतले उखाणे येथे टाका. 

लेक लाडकी मोठ्या घरची होणार सुन मी अंबाणीची 

मोबाईलचा बॅलंस आयुष्यभराचा टाकला अनंतरावांसारखा जोडीदार भेटला 

लग्नाला आले बॉलीवूड आणि हॉलीवूड अंनंतरावांचे नाव घेते स्पर्श करते टचवूड 

स्वप्नातला राजकूमार पाहीला होता सुखाने न्हाले मी अंनंतरावांसारखा पती मिळता.

भाकरीचे पीठ

कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते.

व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला सांगून आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. तान्याने त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला.

कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले.

बांधाला बांध लागून असलेच शेजारी शेतकरी सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.

- पाभे

बग आली माझ्या कोडा

धाव धाव टीम लिडरा
बग आली माझ्या कोडा

किती आता गुगलावे?
एआय मदतीला घ्यावे?

डेडालाईन मृत्यू भासे
चहा कॉफी नरडी डाचे

टेस्टर, क्यू.ए. इग्नोर करी
क्लायंटाला पटव भारी

एकच विनंती असे तुझीया ठाई
मी केवळ आयटी हमाल भार वाही

सुखरूप माझी असाईनमेंट पार कर
गो लाईव्ह जावूदे जोडतो दोन्ही कर

आता उद्धरण्या केवळ तूच येई
पाषाणाची चुकली नाव पार नेई 

- पाभे २६.०३.२०२४

Tuesday, March 19, 2024

ग बाई माझी करंगळी दुखावली

ग बाई माझी करंगळी दुखावली

(हा लेख मिसळपाव.कॉम या संकेतस्थळावर सन २०२३ च्या दिवाळी अंकात प्रकाशीत केला गेला आहे.‌)

वाहनांशी तसा माझा संबंध केवळ ती चालवण्यापुरता मर्यादीत आहे. असे असतांना गेल्या काही वर्षांपासून त्या वाहनांच्या कामगीरी, कारागीरी, त्यातील लहान मोठे दोष, उणीवा समजावून घेणे, त्यावर चर्चा करणे, रस्त्यावरील वाहतूकीचे नियम या विषयाला वाहिलेल्या आमच्या एका व्हाटसअ‍ॅपवरील गृपमधल्या चर्चांमध्ये मी नेहमी सहभागी होत असतो. त्यात जास्त लक्ष देण्यामुळे रस्त्यावरील चालणार्‍या वाहनांकडे आपसूक लक्ष जात राहते. त्यातून आपल्या वाहनातील दोष तसेच देखभालीकडेही लक्ष जाते. इतर वाहनांमधील तुलना मनात होवून काय योग्य अयोग्य आहे याबाबत मत पक्के होत जाते हा देखील एक फायदाच आहे.

असे करतांना आपसूक चारचाकी वाहनांमधील एसी ची तुलना करण्याची सवय लागली. ज्या ज्या चारचाकीमध्ये बसलो त्यातील एसी कसा काम करतो, हवा थंड आहे का? ती कितपत थंड आहे? इत्यादी बाबी लक्षात येऊ लागल्या. एकदा माझ्या मामेभावाच्या चारचाकीत एका गावाला सायंकाळी जाणे झाले. गाडीत आम्ही दोघेच असल्याने मी पुढच्याच सीटवर बसलो होतो. त्या गावी पोहोचेपर्यंत गाडीत मला विशेष त्रास जाणवला नाही. परततांना रात्र झाली होती. येतांना मला गाडीत चक्कर आल्यासारखे वाटू लागले. त्यानंतर मळमळ किंवा उलटीचीही भावना होऊ लागली. समोरील काच वायपरने घासल्या गेली होती. काचेवरील अर्धवर्तूळूकार ओरखड्यांमुळे समोरील वाहनांचा येणारा प्रकाश मला त्रासदायक ठरू लागला होता. काचेतून पाहून त्रास अधीक वाटत असल्याने माझी नजर मी इतरत्र वळवली. परतत असतांना थोडा पाऊस लागला. खिडक्यांतून पाऊस लागू नये म्हणून खिडक्या बंद केल्या व गाडीतील एसी सुरू केला. एसीच्या कोंदट हवेमुळे मला होणार्‍या त्रासात अधीकच भर पडली.

मला माझ्या स्वःताच्या गाडीतील एसीची सवय असल्याने इतरांच्या एसीच्या हवेतील फरक लगेचच जाणवतो. काही एसी देखभाल न केल्याने एक वेगळाच दर्प असलेली हवा बाहेर टाकतात. हवेतील नैसर्गीक ताजेपणा, उल्हासीतपणा त्या एसीच्या हवेत नसतो. त्यातच काही वाहनचालक नशा आणणारे तंबाखूयुक्त पदार्थ, सुगंधीत पदार्थ, गुटका इत्यादी खात असतात, किंवा त्या वाहनांत तसे पदार्थ सेवन करणारे प्रवासी प्रवास करतात किंवा या आधी तसले प्रवासी त्या वाहनांत बसलेले असतात. त्यामुळेदेखील गाडीत तो वास भारलेला असतो. गाडीचे इंटेरीअर, कुशन, कारमधले पायपुसणे इत्यादींनी तो वास शोषलेला असतो. गाडीच्या काचा बंद केल्या व एसी सुरू केला की गाडीच्या आतील हवा थंड होवून गाडीत तिच हवा पसरली जाते. माझासारखे या दर्पाला जास्त सजग असणार्‍यांना या वासाचा त्रास होतो.

वर उल्लेखलेल्या प्रवासात आमच्या परतीचे ठिकाण लवकर आल्याने मला उलटी वगैरे काही झाली नाही. मामेभावाला त्याच्या गाडीच्या एसी बद्दल तक्रार केली तर तो थोडा नाराज झाला.
असल्याच प्रकारचा त्रास मला माझ्या जवळच्या एका नातेवाईकांच्या वाहनातून प्रवास करतांना नेहमी होतो. अगदी जवळचे नाते असल्याने मला त्यांच्याच वाहनातून एकत्र प्रवास टाळणे शक्य नसते. तरी देखील दोन तिन वेळा मला त्यांचा चारचाकीत असल्याच एसीच्या वासाने हैराण केले आहे. एकतर त्यांना सुगंधीत पान खाण्याची सवय आहे. उद्या पहाटे जर प्रवासाला निघायचे असल्यास रात्रीच ते पानांचा साठा त्या ठरलेल्या पानवाल्याकडून तयार करून घेतात इतकी वाहन चालवतांना पान खाण्याची सवय त्यांना आहे. एकदा तर त्यांच्या वाहनांत ते नातेवाईक नव्हते तर बदली ड्रायव्हर होता. तो काही खाणारा नव्हता तरीदेखील मला त्या वाहनात उलटीची भावना, मळमळ होणे असा त्रास झाला तो झालाच. सुदैवाने प्रवासाचे ठिकाण जवळच असल्याने इतर काही प्रकार झाला नाही.

एका नातेवाईकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या मोठ्या ट्रकमधून नाही पण त्यांच्या खाजगी चारचाकीत एकदोन वेळा मला गावातल्या गावात प्रवास घडला. त्या वाहनांत उलटी, मळमळ असे काही झाले नाही पण ते गाडीतला एसी अयोग्य पद्धतीने वापरत असल्याचे पाहून मी आश्चर्यचकीत झालो. त्यांच्या गाडीत बसल्यावर त्यांनी एसी सुरू केला तेव्हा नैसर्गीक थंड हवेचा झोत काही जाणवला नाही. मी काही बोललो नाही पण लक्ष आपसूक एसी कंट्रोल पॅनलवर गेले. तेथला एअर सर्क्यूलेटींग चा लिव्हर बाहेरील हवा आत घेण्याच्या बाजूला होता. मी तो बंद केला व त्यांना तो लिव्हर मी सेट केला तसाच योग्य आहे असे सांगीतले. त्यानंतर त्यांनी मीच कसा अयोग्य आहे हे सांगीतले, पण मी त्यांना त्या लिव्हरची तांत्रीक बाजू, त्याचा वापर समजावून दिले मग त्यांना थोडे पटल्यासारखे झाले. त्यांनी त्याचा कितपत वापर नंतर केला हे काही समजले नाही कारण नंतर त्यांच्या गाडीत कधी बसण्याचा योग आला नाही.

माझे एक नातेवाईक असे आहेत की ते स्व:त वाहन कधीही चालवत नाहीत. चारचाकी वाहन चालवण्याचा त्यांनी क्लासवगैरे लावूनही त्यांच्यात वाहन चालविण्याचे धैर्य काही आले नाही. बाहेरगावी जाण्यासाठी ते ड्रायव्हर घेऊन जातात. आपले वाहन इतरांच्या ताब्यात दिल्यावर जे व्हायचे ते होते. बाहेरून किंवा आतून त्यांचे वाहन चांगले जरी असले तरी मला त्यांच्या वाहनात कोंदट वास जाणवतोच. बहूदा त्यांचे निरनिराळे ड्रायव्हर्स पान तंबाखूचे शौकीन असावेत.

इतरांच्या वाहनांतील वास व त्याचा एसी हवेशी, एसी च्या देखभालीच्या स्थितीबाबत जाणून घेण्याची व त्याचा त्या वाहनधारक किंवा वाहनचालक यांच्या मनस्थिती ताडून पाहण्याची माझी सवय एकदा माझ्या अंगाशी आली होती. झाले असे की गेल्या महीन्यात मी मोटरसायकलने हायवेने शहरात प्रवेश करत होतो. बाजूलाच सर्वीस रोड समांतर जात होता. एका चौफुलीवर स्पीड ब्रेकर असल्याने माझी मोटरसायकल मी अगदी हळू करून त्या स्पीड ब्रेकरच्या अगदी डाव्या हाताला ठेवली जेणेकरून तेथे त्या ब्रेकरचा उंचसखलपणा कमी असावा. त्याच वेळी एक पॅसेंजर कार माझ्या उजव्या बाजूने जात होती. त्या कारमधून प्रवाशाला त्या चौफूलीवर उतरायचे असल्याने तिचा वेग काही जास्त नव्हता. त्या कारच्या खिडक्यांच्या काचा खालीच होत्या. ज्यावेळी ती कार माझ्या जवळून गेली त्यावेळी त्या कारमधून मला त्रासदायक ठरणारा गुटकामिश्रीत वास माझ्या नाकाला झोंबला. एवीतेवी कार हळू झालेली होतीच त्यातून ती थांबण्याच्या बेतात होती. मी त्या कारच्या डावीकडे थोडे अंतर राखून स्पीडब्रेकरवर होतो. तो वास नक्की त्याच कारमधून व त्या गुटख्याच्याच कारणामुळे येतो आहे हे मला ताडून पाहण्याची उर्मी मला स्वस्थ बसू देत नव्हती. स्पीड ब्रेकर संपल्या संपल्या मी त्या कारच्या डाव्या बाजूच्या मागच्या दरवाजाजवळ थांबलो. त्या वाहनधारकाला प्रवासी उतरवून देऊन चौफूलीवरून सरळ न जाता डाव्या रस्त्याला जायचे असल्याने त्याने त्याची कार त्याच दिशेने वळवून माझ्या मोटरसायकलच्या अगदी जवळ आणून ठेवली. माझ्या डाव्या बाजूने सर्वीस रोडची ट्राफीक वेगात जात असल्याने मला त्या कारपासून जास्त अंतरही थांबता येत नव्हते. तेवढ्यात कारमधून मागील दरवाजा उघडून एक महिला प्रवासी त्यातून उतरली. त्या कारचा दरवाजा माझ्या मोटरसायकलच्या एक्स्लरेटच्या लिव्हरला लागला व त्या दरम्यान माझ्या उजव्या हाताच्या करंगळीला इजा पोहोचली. दरवाजा हळू आदळल्याने काही गंभीर दुखापत न होता केवळ खरचटले व दोन दिवस करंगळी सरळ करता येत नव्हती. त्या कारचालकाने व त्या महिला प्रवाशाने झाल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त केली. तेव्हढ्या वेळेत मला कारच्या उघड्या काचेतून मला त्रासदायक ठराणारा तंबाखू-गुटखामिश्रीत वास आला व माझ्या मनात जे होते त्याला एकप्रकारे पुष्टी मिळाली.

- पाषाणभेद
२४/०२/०२३

Friday, October 21, 2022

शहरातले गाव

रस्त्याने जातांना अचानक
उंच इमारती डोंगर होतात
त्यावरील काचेची तावदाने
डोंगरावरील हिरवळ होते
रस्त्यांच्या नद्या होतात
त्यातून रहदारीचे पाणी वाहते
जाणारी वाहने होड्या होतात
बाजूची घरे शेतातली झाडे होतात


त्यावेळी मात्र मी
शहरातल्या गर्दीपासून दूर गावात पोहोचतो

- पाभे
२१/१०/२०२२

Wednesday, September 14, 2022

गडकरींनी पुण्यात केले 'हे' वक्तव्य... खड्ड्यात वाहन गेले की...

 



Primary tabs

पुणे वार्ताहर: दि. १४ सप्टेंबर.

रस्त्यातील असलेले खड्डे दुरुस्ती करणे किंवा त्या जागी नवे रस्ते करणे सरकारला लगेचच अशक्य आहे. भारतावर चीन ने राज्य केले तरच ते शक्य आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांत असलेले खड्डेच वाहनचालकांच्या मदतीस येतील, कारण असल्या खड्ड्यांतूनच वीजनिर्मिती भविष्यात करू अशी घोषणा रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांनी काल पुण्यात केली. गणपती विसर्जन झाल्यानंतर आलेल्या पावसाच्या पुराची पाहणी पुण्यात केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ही परिषद रात्री ११ वाजता शासकीय विश्रामगृहात झाली.

गडकरी पुढे म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे हे आपले मित्रच आहेत. त्यांना वैरी संबोधू नका. असल्या खड्ड्यांतून वाहने गेली की खड्यांत बसवलेल्या सेंसर्स व इलेक्ट्रॉनिक सर्कीटमुळे विद्यूतजनित्र चालू होईल व त्याद्वारे वीजनिर्मिती होईल. ही निर्माण होणारी वीज त्याच रस्त्याच्या वरती असलेल्या ग्रीडमध्ये जाईल व त्या ग्रीडमधली वीज वाहने खेचतील व त्यावर वाहने चालतील ही घोषणा तर आधीच केली आहे, याची आठवण त्यांनी पत्रकारांना करून दिली.

पुणे शहरात हा पायलट प्रोजेट सध्या कात्रज, भोसरी, तळेगाव व पंढरपूर रोड येथे उभारण्यात येईल. त्यानंतर असले प्रकल्प गुजरात व उत्तर प्रदेश येथे राबविण्यात येईल.

गडकरी पुढे असेही म्हणाले की, खड्यांत जनित्र व इलेक्ट्रॉनिक सर्कीट बसवण्यासाठी ते खड्डे पुरेसे मोठे व योग्य आकारात पाडण्याची जबाबदारी तेथील स्थानिक नागरीक, महानगरपालिका व कंत्राटदारांची असेल. केंद्र शासन खड्डे निर्माण करणार्या अशा महानगरपालिकांना योग्य ते अनुदानही देणार आहे. अशी विजनिर्मीती झाली तर वीज महामंडळांवरील भारही काहीसा हलका होईल अशी आशा गडकरींनी व्यक्त केली.

'पुण्यात बसेस हवेत उडतील' या आधीच्या घोषणेबाबत पत्रकारांनी गडकरींना छेडले असता त्यांनी हसून तो प्रश्न उडवला. उडत्या बस ऐवजी उडते ड्रोन मात्र चाकणच्या कंपनीने आधीच तयार केले आहे व त्याद्वारे एक व्यक्ती प्रवास करू शकतो हे त्यांनी सुचीत केले. असले ड्रोन पुण्याच्या पीएमपीएमएल द्वारे हडपसर गाडीतळावरून उडतील असे ते म्हणाले. हे वक्तव्य करतांना गडकरी जास्त उत्साहात दिसले.

पत्रकारांबरोबर रात्रीचे जेवण घेतांना अनौपचारिक गप्पांमध्ये गडकरी असेही बोलले की, आताच्या भाजपाच्या केंद्रसरकारने रस्ते कोंडी व पडणारे खड्डे यावर सखोल विचार केला आहे. आगामी काळात भारतात लोह व जस्त युक्त रस्ते निर्मीण्याचा विचारही बोलून दाखवला. या विषयीचे व खड्ड्यांतून वीजनिर्मिती असले दोन शंशोधने व स्वतंत्र पेटंट भारतीय रोड काँग्रेसने २०१९ सालीच घेतलेले आहे. या आधीच्या सरकारने जर सरकारी अधिकार्यांना कामाला लावले असते तर हे संशोधन व पेटंट आधीच घेतले गेले असते, पण आधीच्या सरकारची काम करण्याची इच्छाच नव्हती, असे ताशेरे त्यांनी आधीच्या काँग्रेस सरकारवर वाजवले.

टोलमुक्त रस्त्यांबाबत ते काहीसे नाराज दिसले. सरकार रस्ते निर्मीतीतून पैसे निर्माण करत असते. टोल टाळले तर नवे रस्ते कसे तयार होतील असा उलट प्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला. नवे वाहन घेतांनाच पूर्ण आयुष्याचा टोल आधीच घ्यायचा असला विचार चालू असल्याचे ते बोलले. त्यात वाहनाच्या किंमतीत केवळ ५०% मामूली किरकोळ वाढ अपेक्षित असल्याचे ते बोलले.

चालकांच्या कमरेचा पट्टा हाच सिटबेल्ट म्हणून वापरता येईल का या बाबत संशोधन पुण्यातील शासकीय एआरएआय भोसरी, या संस्थेत चालू असल्याचे त्यांनी सांगितले. महीलांच्या कमरेच्या साखळ्या सीटबेल्ट मानावा असा कायदा संसदेच्या पटलावर असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. रिक्षातून शाळेत जाणारी मुले, जेष्ठ नागरीकांना व जेष्ठ महीलांना सिटबेल्ट वापरण्यात त्यांनी सुट दिल्याचे सांगितले.

जे चालक सीटबेल्ट लावणार नाहीत त्यांना दंड तर केला जाईलच पण त्यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांचे वाहन रस्ते निर्मीती करण्यात कामाला लावावे, प्रसंगी त्यातून सिमेंट वाहतूक करावी अशी सुचना त्यांनी पोलीसांना केली.

Sunday, August 21, 2022

मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२

 मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२

<iframe src="https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fpashanbhed%2Fposts%2Fpfbid0qCnCnisJ7PvnuUFnrPQynACYzwDYXbYKEg4pdMmcxShGETsb9PG8FNpnrpa8Mgrkl&show_text=true&width=500" width="500" height="219" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowfullscreen="true" allow="autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share"></iframe>

http://www.misalpav.com/node/50590


मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२
मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे भेट व सह्याद्री फार्म हा कारखाना पाहणी.

ठरल्याप्रमाणे मिपाकट्टा अर्थात पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ रोजी संपन्न झाला. 

मिपाकर पिंगू व वहिनी नव्या मुंबईतून नाशिकला आले. मयुरेश पालकर आधीच आले होते. त्यांची गाडी खराब झाल्याने ते उशीरा जॉईन होणार होते. 

मी, माझी पत्नी व माझी मुलगी तसेच पिंगू व वहिनी मोहाडी येथे दुपारी१२ च्या सुमारास पोहोचलो. आजूबाजूला अतिशय रम्य व हिरवागार परिसर आहे. डाळींबांच्या बागा, पेरू, द्राक्षांच्या बागा, ऊस व भाजीपाला यांची हिरवी शेते यामुळे पावसाळ्यात हा प्रदेश नयनरम्य दिसत होता. 

मोहाडी गावातील खालील ठिकाणे पाहिली. 

<img src="https://scontent.fnag6-3.fna.fbcdn.net/v/t39.30808-6/300248341_5277379952311916_1505253774932598123_n.jpg?stp=dst-jpg_p118x90&_nc_cat=110&ccb=1-7&_nc_sid=dbeb18&_nc_ohc=VBfdXoDK7ZMAX91S6Y9&_nc_ht=scontent.fnag6-3.fna&oh=00_AT8IuSqZ4iMKV7MpI3xvaylnDRvzCZTML7W79j1qrYdQXw&oe=63066628" alt="Ashtabahu mandir" /> 

अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (जुनी बांधणीचे दुमजली लाकडी बांधकामातील मंदीर. रंगकाम सुरेख)

<img src="https://scontent.fnag6-2.fna.fbcdn.net/v/t39.30808-6/300573691_5277385578978020_5919585894345469881_n.jpg?_nc_cat=105&ccb=1-7&_nc_sid=dbeb18&_nc_ohc=-ucIRW7BO-sAX9lHdfS&_nc_oc=AQnr6xCxtCMLWULpe8rI-goDDWUmjGJR7sNaIMyUkDTnonsg75b2rTc0YUdH8xYc3PI&_nc_ht=scontent.fnag6-2.fna&oh=00_AT_FO8ZGeL5zBZhKte5gKxaTq0clFdWQj2bZmen0lYbIaw&oe=63071AAB" alt="Board" />

गोसावी समाज साधू मंदीर
नवनाथ मंदीर
मोहाडेश्वर मंदीर

<img src="https://scontent.fnag6-1.fna.fbcdn.net/v/t39.30808-6/300372996_5277405638976014_4520969102662771969_n.jpg?stp=dst-jpg_p118x90&_nc_cat=107&ccb=1-7&_nc_sid=dbeb18&_nc_ohc=1gCmpCSyDoAAX_DpZ3t&_nc_ht=scontent.fnag6-1.fna&oh=00_AT-aFN0ZrwsYLJd4A7OpwcMmTJJtUnEOIpfKOBMmFMzmAg&oe=6306F34D" alt="barav" />

अहिल्यादेवी बारव
मोहाडमल्ल देवस्थान

<img src="https://scontent.fnag6-3.fna.fbcdn.net/v/t39.30808-6/300215017_5277352085648036_804545264554639319_n.jpg?stp=dst-jpg_p160x160&_nc_cat=100&ccb=1-7&_nc_sid=dbeb18&_nc_ohc=Gwxr0pcVgtoAX8mMuYB&_nc_ht=scontent.fnag6-3.fna&oh=00_AT_BleDrmilLieauQl-uFOvtaNIKAIiplEViawnOTwpcVw&oe=63067D4F" alt="Somavanshi Wada" />

सोमवंशी वाडा

त्यानंतर सह्याद्री फार्म कारखाना येथे गेलो. जेवणाची वेळ झाल्याने प्रथम कारखान्याच्या कॅन्टीनमध्ये जेवण केले.

सह्याद्री फार्म हा शेतीमाल प्रोसेस करणारा कारखाना आहे. येथे फळे व भाज्या पॅकींग, कोल्ड स्टोरेज करणे, जॅम, जेली, सॉसेस बनवणे इत्यादी कामे चालतात. 

पर्यटकांना बॅचेसमध्ये कारखाना दाखवला जातो. १५ ऑगस्ट असल्याने कारखान्यात वर्कर्स नव्हते. त्यामुळे वर्कींग पाहता आले नाही. इतर सर्व विभाग गॅलरीतून दाखवतात. परिसर खूप मोठा आहे. सह्याद्री फार्मच्या कार्पोरेट कार्यालयापुढे अतिशय उंच उभारलेला १५ ऑगस्टचा झेंडा फडकत होता. पाऊस अधून मधून सुरूच होता. 

तशाच वातावरणात पुन्हा नाशिकला प्रयाण झाले.

पुढील कट्टा असाच गर्दी नसलेल्या निसर्गरम्य ठिकाणी ठरवू या अन तेथे भेटूया.