Wednesday, April 15, 2009

राज ठाकरेंनी नाशिक मुक्कामी मराठी माणसांसाठी हाक मारली

राज ठाकरेंनी नाशिक मुक्कमी मराठी माणसांसाठी हाक मारली
raaj in nashik

नाशिक दि. १३ एप्रिल ०९ (मि.पा. विशेष प्रतिनिधी ) : तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करण्यासाठी मनसे ला आपले मत द्या असे अवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केले.मनसेच्या नाशकातील उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पवननगर - नाशिक येथील मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीकास्र सोडले.

शरद पवारांना हि निवडणुक लढवायची नव्हती. पण ते कार्यकर्त म्हणतात म्हणुन निवडणुक निवडणुक लढवायची आहे असे सांगत आहेत. शरद पवार व शिवसेनेची युती आहे. जेथे जेथे राष्ट्र्वादीचा बलाढ्य उमेदवार उभा आहे तेथे तेथे शिवसेनेने आपला कमकुवत उमेदवार उभा केला आहे. शरद पवारांना एकेकाळी नाशिक जिल्ह्याने चौदाच्या चौदा आमदार निवडून दिले होते. या जिल्ह्याने पवारांवर भरभरून प्रेम केले. त्यावेळी पवार म्हणाले होते की, मी नाशिकचा पालकमंत्री बनून काम करेन. पण तुम्ही बारामतीचा विकास बघा आणि नाशिककडे बघा, असे ते म्हणाले.

मागच्या मनसे च्या आंदोलनात पोलीसांनी मराठीच माणसांवर अत्याचार केले. मालेगावात तर तुरूंगात मनसेंच्या कार्यकर्त्यांना लघवीतुन रक्त येईपर्यंत मारले. तेव्हा ग्रुहमंत्री मराठीच होता. मराठी मंत्र्यांनी मराठी माणसांसाठी काहीच केले नाही. मागील वर्षात रेल्वे ने २७०० लोकांना नोकर्‍या दिल्या. त्यात मराठी मुले किती? फक्त २७. तिकडे लालू पाटण्याहुन प्रत्येक ठिकाणी जाणारी रेल्वे सुरु करतो. तुमच्या नाशिक मधुन किती रेल्वे गाड्या चालू झाल्या? माहित नाही.

मला लाल दिव्याच्या गाडीचे आकर्षण नाही. असे त्यांनी प्रतिपादन केले. मराठी माणसाच्या कल्याणासाठी तुम्ही रेल्वे ईंजीनावर शिक्का मारुन मनसेचे उमेदवार विजयी करा असे आवाहन केले.

सभेच्या समोरील पाण्याच्या टाकीवरील एक माणुस 'राज ठाकरे झिंदाबाद', असे ओरडला असता, 'अरे, हा तर धर्मेंद्र दिसतोय' असे बोलुन त्यांनी हशा घेतला.

व्यासपीठावर सर्वश्री. वसंत गीते, उत्तरा खेर, अतुल चांडक, नितीन नाना भोसले, सुहास आण्णा कांदे, मोहन आण्णा मोरे, प्रकाश भालके, ज्योतीताई शिंदे, हिरे ताई, सुजाता डेरे, गोरख बोडखे, नितीन माळी व उमेदवार हेमंत गोडसे उपस्थीत होते. सभेस तोबा गर्दी असल्याने मैदान छोटे पडल्याने लोकानी रस्त्यावर, बाजुच्या इमारतींच्या छतांवर उभे राहुन सभेचा आनंद घेतला.

(खाली काही सभेतील फोटो व व्हि.डि.ओ. क्लिप्स आहेत. बघा.)

राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा.

राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा.

राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा.

राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा.

राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा.

राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा व्हि.डि.ओ. क्लिप्स १

राज ठाकरेंची नाशिक - पवननगर येथील सभा व्हि.डि.ओ. क्लिप्स २

पुणे युनिर्व्हसिटी - अजब कारभार -सत्यघटना

(पुणे युनिर्व्हसिटीच्या अजब कारभाराची खालील घटना माझ्या सोबत घडलेली सत्यघटना. वाचा.)

माझ्या एका नातेवाईकाने पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी पुणे युनिर्व्हसिटी गेल्या जुन ०८ मध्ये सोडली. नातेवाईक नाशिक सोडुन दुसर्‍या गावी कॉलेजला निघुन गेला. जातांना त्याने पुणे युनिर्व्हसिटीतून मायग्रेशन सर्टीफिकीटासाठी अर्ज करायला सांगीतला.

नियमाप्रमाणे मी मायग्रेशन साठी अर्ज नाशिक विभागीय कार्यालयातुन रु. २०/- ला विकत घेतला. तो एक्सर्टनला (बहीस्थ) होता म्हणुन त्याला टी.सी. साठी सुद्धा अर्ज करावा लागेल असे विभागीय कार्यालयातुन कळाल्याने तो अर्ज रु. २०/- ला घेतला. (रेगुलर विद्यार्थ्यांचा टी.सी. साठीचा अर्ज कॉलेजकडुन जातो व विद्यार्थ्यांला टी.सी. हातात मिळत नाही. फक्त मायग्रेशन सर्टीफिकीट नंतर अर्जदाराच्या घरी पुणे युनिर्व्हसिटी पोस्टाने २ महिन्यात पाठवते. )

दोन्ही अर्जांसोबत प्रत्येकी रु. १५०/- चे डि.डि. (२ वेगवेगळे डि.डि. पण एकूण रु. ३००/-)"रजिस्टार, पुणे युनिर्व्हसिटी " ह्या नावाने काढावे लागतील असे विभागीय कार्यालयातुन सांगण्यात आले.

मी ते दोन्ही अर्ज (मायग्रेशन सर्टीफिकीट व टी.सी. साठी) व्यवस्थीत भरले. (अर्जातील नियम तर विरोधाभासी आणि विनोदी होते.काहींचा अर्थ लागतच नव्हता. विस्तारभयास्तव येथे देत नाही.) दोन्ही अर्जांसोबत प्रत्येकी रु. १५०/- चे डि.डि. २ वेगवेगळे डि.डि. ,"रजिस्टार, पुणे युनिर्व्हसिटी " ह्या नावाने काढले.

मला पुणे युनिर्व्हसिटीच्या कारभाराची कल्पना असल्याने (मागील एक घटना) मी प्रत्येक गोष्टीत काळजी घेत होतो. डि.डि.ज च्या मागे नातेवाईकाचे नाव, PR No. (Permeant Registration No.), त्याचा पत्ता, फोन नं. लिहिले. त्यांच्या झेरॉक्स काढल्या व माझ्याकडे ठेवल्या. अगदी बँकेचे डि.डि. चे चलन पण जपून ठेवले.प्रत्येक अर्जात मोकळ्या जागी, "मी मायग्रेशन सर्टीफिकीट व टी.सी. दोन्हीसाठी अर्ज करत आहे. मायग्रेशन सर्टीफिकीट सोबत रजीस्टर पोस्टाची तिकिटे लावलेल्या पाकीटात पाठवणे " असे पेन्सीलीने लिहीले. सोबत दोन रजीस्टर पोस्टाची तिकिटे लावलेल्या पाकीटे जोडली. (खरे ते एकच आवश्यक असते. विद्यार्थ्यांला टी.सी. हातात मिळत नाही. फक्त मायग्रेशन सर्टीफिकीट नंतर अर्जदाराच्या घरी पुणे युनिर्व्हसिटी पोस्टाने पाठवते. ) तरी पण मी २५ -३० रुपयांकडे पाहीले नाही.

जुलै, ऑगस्ट गेला. नातेवाईक मायग्रेशन सर्टीफिकीटासाठी विचारत होता. ते दुसर्‍या युनिर्व्हसिटीत वेळेत दिले नाही तर प्रवेश रद्द होतो. मी मिळेल असे सांगत होतो. सप्टेंबर महिन्यात मी पुणे युनिर्व्हसिटीच्या मायग्रेशन डिपार्टमेंटला फोन लावु लागलो. निट उत्तरे मिळत नव्हती. मी सर्व डिटेल्स देत होतो. पण काम कुठे रेंगाळत नव्हते तेच समजत नव्हते. शेवटी मी मायग्रेशन डिपार्टमेंट च्या हेड चे नाव विचारले. ते मोरे म्हणुन ग्रहस्थ होते. (नाव खरेच लिहीले आहे.) त्यांच्याकडून पण काही समजत नव्हते.

शेवटी मी तेथे स्वता: येवू का असे विचारले तर या म्हणाले. मी बाहेरगावाहून येणार तर किती वेळ लागेल ते सांगा? तर ते म्हणाले की लवकर काम होईल.

दोन दिवसांनी मी सकाळी ११:३० वाजता सगळी कागदपत्रे घेवुन मी पुणे युनिर्व्हसिटीच्या मायग्रेशन डिपार्टमेंटला ला पोहोचलो. अजुन मोरे यायचे होते. तो पर्यंत मी ईतरांकडे माझा अर्ज आला का? हे विचारत होतो. सगळे जण एकमेकांकडे बोटे दाखवत होते. इनवर्ड - आउटवर्ड रजीस्टर मेंटेन नव्हते. कामे करणारे सगळे तरूण पोरे- पोरी होत्या. अगदी १८-१९ वयाचे. अर्थातच ते शिकाउ होते हे मी जाणले. एक परमनंट बाई कॉम्पुटर वर सॉलीटेर खेळत होती. बाकी परमनंट लोक गप्पा मारत होते. शिकाऊ पोरे कॉम्पुटर वर गाणे वाजवत होते. एकमेकांना 'हे गाणे लाव, ते गाणे लाव' सांगत होते. आनंदी आनंद होता सगळा.

बेलेकर नावाच्या (नाव खरेच लिहीले आहे) कारकुनाकडे (संताप येतो आहे) पोस्टाने मायग्रेशन सर्टीफिकीट पाठवल्याची यादी आहे ते समजले. त्या यादीतपण नातेवाईकाचे नाव नव्हते. नाव कॉम्पुटर वरील प्रोग्राम मध्ये देखील शोधून सापडले नाही. (Permeant Registration No. असतांना देखील साला प्रोग्राम मराठी आडनावावर यादी सॉर्ट करत होता. (विचार करा डाटा एंट्री करणारे शिकाऊ पोरगा काय नावाने मराठी नावे ईंग्रजीत कन्व्हर्ट करत असेल? ) शिमगा सगळा.

तो पर्यंत माझ्यासारखीच लोकांची गर्दी वाढत होती. कमीत कमी ७५ अर्जदार लोक (बाई मुलगी असेल तर तिच्याबरोबर कमीतकमी १ माणुस तो वेगळा काउंट करा.) तेथे आलेले होते. सगळ्या टेबलांवर कचर्‍यासारखे अर्ज पडलेले होते. काल येथे येवून गेलेले सगळ्या टेबलांवर आपआपले अर्ज शोधत होते. त्यांचे पाहून मी पण माझा अर्ज शोधु लागलो. तेथे सगळ्या टेबलांवर कमीतकमी ४०-५० हजारांवर तरी अर्ज होते. त्या अर्जांमध्येच काही टि.सी. पण होते. आता प्रत्येक टेबलामधून अर्ज शोधणे म्हणजे गंजीतुन सुई शोधणे होते. तेवढ्यात मोरे आले. परत सगळी गर्दी तेथे जमली.

परत सकाळची कहाणी त्यांच्यापुढे झाली. त्यांनी शोधल्यासारखे केले. आणि दुपारी बघू सांगीतले. माझी खात्री झाली की येथे आपला अर्ज भेटणे शक्य नाही. मी एका परमनंट मुलीला भेटलो. (जुनी धेंडे काही कामाची नव्हती.) तीला ताई-बाई करून येथल्या कामाची माहीती करुन घेतली. मिळालेली माहीती धक्कादायक होती. तिने सांगीतले की गेल्या २ महिन्यापासुन येथे दररोज हाच सिन रिपीट होतो. लोक येतात काहींचे अर्ज सापडतात त्यांचेच मायग्रेशन तयार होते. दिवसभरात १५ ते १८ अर्ज सापडतात. आणि ते अर्ज स्वता: अर्जदारच शोधत होते. मायग्रेशन डिपार्टमेंट काहीच हालचाल करत नव्हते हे दिसत होते. त्या मुलीने सांगीतले की तुम्ही तुमचा टि.सी . येथे टि.सी . डिपार्टमेंटने पाठवला आहे का ? ते पाहुन यायला सांगीतले. च्यायला अशी प्रोसीजर होती तर. म्हणुनच मायग्रेशन अर्जांमध्ये मधुन मधुन काही टि.सी . दिसत होते तर.

मी तडक टि.सी . डिपार्टमेंटला गेलो. (उन्हात दुसरी इमारत शोधत शोधत) ते डिपार्टमेंट फारच ऍक्टीव्ह होते. ते म्हटले की, "आमच्याकडे काहीच पेंडींग नाही. हा पहा, या या क्रमांकाचा टि.सी . आम्ही या या तारखेला काढुन मायग्रेशन डिपार्टमेंट ला पाठवला आहे. मायग्रेशन डिपार्टमेंट काहीच कामे करत नाही. नुसता बाजार मांडला आहे त्यांनी. "

मी टि.सी . क्रमांक लिहुन घेतला. स्वारी परत मायग्रेशन डिपार्टमेंट ला आली. आता मी थोडे डोके लावले. पहिल्यांदा मी टि.सी . शोधण्याचा निर्णय घेतला.मी गवताच्या गंजीतुन टि.सी . शोधु लागलो. कान मोरे, बेलेकर आणि इतर अर्जदारांकडे होते. कोणी मुंबई, कोल्हापूर, चंद्रपूर, मालेगाव, जळगाव येथून आले होते. पेठ तालुक्यातुन एकुण १५ जण आले होते. खुद्द पुण्याचे लोकांना "मायग्रेशन लवकरच घरी येईल तुम्ही जा" सांगत मोरे कटवत होते.

वाशी चा एकजण रडत होता. मायग्रेशन न मिळाल्याने त्याचे मागच्या वर्षीचे ऍडमीशन कॅन्सल झाले होते. त्याने १ वर्ष मुंबई विद्यापिठाला रोखुन धरले होते. मी फारच सावध झालो. पटापट माझा मायग्रेशन / मायग्रेशन अर्ज - जे काही सापडेल ते शोधू लागलो. तेवढ्यात एका गठ्यात मला माझ्या नातेवाईकाचा मायग्रेशन सापडला. मी लगेच तो घेवुन मोरे ला भेटलो. त्याला सगळे कागदपत्रे दाखवले. डि. डि. च्या झेरॉक्स दाखवल्या. मिळालेले टि. सी. दाखवले. रजीस्टर पोस्टाची विद्यापिठाच्या शिक्क्याची एकनॉलेजमेंट दाखवली.

माझी अर्धी लढाई झाली होती. एका बाईकडे डि. डि. च्या झेरॉक्स नव्हत्या. ती बँकेच्या रिसीट दाखवु लागे. मोरे ते नाकारे. माझी बाजू आता वरचढ झाली होती. मी मोरेंना म्हटले, "माझे सगळी कागदपत्रे आहेत. डि. डि. , अर्ज, मार्कशीट, पाकीट तुम्ही शोधा. एवढ्या उकीरड्यात मी शोधत नाही. तुम्ही मला मायग्रेशन देउन टाका. "

माझा वार वर्मी लागला होती.

मोरे: "तु तुझा टी. सी. *** यांच्याकडे दे, मी सांगतो त्यांना मायग्रेशन तयार करायला."

त्यानी माझे नाव ईतर अर्ज सापडलेल्यांच्यबरोबर घ्यायला सांगीतले.

मी सावधगीरीने टी. सी. जमा केला नाही.

मी त्या *** ला (नाव विसरलो.) पुन्हा पुन्हा खात्रीसाठी विचारू लागलो. तो म्हणाला, "ए पांढरा शर्ट, डोके नको खाऊ, तु जेवण करुन ये, तुझे मायग्रेशन ४ वाजता भेटेल. " मी जेवण करायला कँपस मधल्या कँन्टीन कडे निघालो. खाली मी टी. सी. च्या २/३ झेरॉक्स काढल्या. मी आता निश्चींत झालो होतो. मी टि.सी. जमा केलेला नव्हता.

कँन्टीन मध्ये काहीतरी बकाबका खाल्ले आणि थम्स अप घेतेले. परत मायग्रेशन डिपार्टमेंटला आलो. तिथे गर्दीत चाळा म्हणुन, मायग्रेशन अर्ज सापडला तर सापडला म्हणुन मी मायग्रेशन अर्ज शोधू लागलो. तेव्हा मोरे / बेलेकर मंडळी इतर अर्जदारांवर खेकसत होते, काम टाळत होते.

ते बघुन डोक्यात तिडीक गेली. आपण काय शोधतो ते डिपार्टमेंटवाले कोणीच बघत नव्हते. सगळा उदास कारभार होता. समोर अर्जदारांचे डि.डि. होते. त्यात काही नाशिकचे पण डि.डि. होते. मायग्रेशन डिपार्टमेंट चा कारभार लक्षात आला होता. तो उघडकीला आणायची डोक्यात आयडीया आली. मेव्हणे पत्रकार होतेच. त्यासाठी डि.डि. ढापण्याची आयडीया आली. पण विचार केला एवढा निच विचार करू नये. ईतरांचे नुकसान करू नये. त्यातच एक जण नाशिकचा भेटला. त्याचेही माझ्यासारखे निम्मे काम झाले होते. मग आमची जोडी जमली. मी कमीतकमी पुरावा म्हणुन ३ तिकीटे लावलेली पाकीटे उचलली आणि बॅगेत टाकली.

माझे काम मायग्रेशन चे काम प्रगतीपथावर होते. *** ना परत परत विचारत होतो. ते म्हणत , "तु येथुन जा, डोके नको खाऊ." मी मजा घेत होतो.

ईतर लोक मात्र काम होत नाही म्हणुन भडकत होते. आम्ही दोघांनी पेठ च्या १५ जणांना "माहीतीचा अधीकार " येथे वापरण्यास सांगीतले. ईतरांना अर्ज शोधण्यासाठी मदत करू लागलो.

लोक आता जाम भडकले होते. आम्ही दोघे मग मेन रजिस्टार कडे काम होत नाही हे जावुन सांगीतले. त्यांनी मोरे ला त्यांच्या रुम मध्ये बोलावले. बहूतेक झापले असेल. पण मोरे आल्यानंतर त्याने बेलेकरला अर्ज शोधायला लावले. ते काम बेलेकराच्या बापानेपण झाले नसते. तो पेशवेपण उपभोगत होता. त्याने सरळ मोरे ला (डिपार्टमेंट हेड) सांगीतले की, "माझे काम आउटवर्ड चे आहे. तेच मी करणार. तुम्हाला काय करायचे ते करा. मी अर्ज शोधणार नाही. " आणि तो तयार न झालेले मायग्रेशन ची वाट बघत रिकामा बसला.

थोड्या वेळाने *** ने ५ /६ मायग्रेशन सर्टी. तयार केले. त्यात माझे मायग्रेशन सर्टी. पण होते याची खात्री केली. तो गठ्ठा एका साहेबाकडे सह्या करुन आला. तो गठ्ठा आता बेलेकर कडे आला डिसपॅचसाठी. बेलेकर बोलायला लागला, "मी हे मायग्रेशन सर्टी. कोणालाही हातात देणार नाही. मी पोस्टातच टाकेल. " माझे डोके सटकले. त्याला झापायचे ठरवले.

माझे मायग्रेशन सर्टी. तयार झाले होते. पण आउट करायचे बाकी होते. आणि बेलेकर पेशवेगीरी करत होता. आम्ही त्याला बाबा-पुता केले आणि त्याने मायग्रेशन सर्टी. हातात दिले.

माझे काम झाले होते. मायग्रेशन सर्टी. आणि टि.सी. (टि.सी. कुणालाच भेटत नाही. ) माझ्या हातात होते.

मी आणि नाशिकच्या मुलाने बेलेकरला डोस दिला. असे करणे शोभते का ? काम करत जा वैगेरे. पण तो गेंड्याच्या कातडीचा निघाला. मला परत निघायचे होते म्हणुन मी तेथुन बाहेर पडलो.

नंतर कामाच्या गडबडीत माझ्या या स्ट्रिंग ऑपरेशनचे पत्रकार मेहूणे यांना सांगणे राहून गेले. आणि आपण सारे एका अनुभवाला मुकलो.

हे कधीचे लिहायचे होते पण राहुन जात होते. आज ते पुर्ण केले.

आपणास पुणे युनिर्व्हसिटीतुन मायग्रेशन सर्टीफिकेट काढायचे असेल तर २ दिवसांच्या तयारीने स्वता: जा आणि मायग्रेशन सर्टीफिकेट हातात घेवुनच बाहेर पडा.

शेतीविषयक सल्ला :- कपाशीवरील बोंड अळी -लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय

शेतकरी बंधूंनो पाषाणभेद चा नमस्कार.

आज आपण 'आपली माणसं व त्यांची माती ' या कार्यक्रमात "कपाशीवरील बोंड अळी -लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय" याविषयावर तांबडवाडीचे प्रगतीशील शेतकरी श्री. भाऊराव गव्हाणे यांचे विचार एकणार आहोत.

पाषाणभेद: नमस्कार भाऊराव.

भाऊराव: रामराम.

पाषाणभेद: भाऊराव, आपण उस ह्या पिकाबरोबरच कपाशी हे मुख्य नगदी पिक घेतात. आपल्या भागात कपाशीवरील रोगांमध्ये 'कपाशीवरील बोंड अळी' ह्या रोगाची समस्या फार मोठ्या प्रमाणात उद्धभवते. याविषयी आपण काय सांगाल?

भाऊराव: कपाशीवर पाने खाणारी अळी, मर रोग, मावा, तुडतूडे, खोड पोखरणारे भुंगे तसेच बोंड अळी या रोगांचा प्रार्दुभाव होतो. त्यापैकी बोंड अळी ही फारच किचकट असते. जेव्हा पिक हाताशी येत असते त्या वेळेसच हिचा प्रार्दुभाव होतो. शेतकरी बांधवांनी वेळीच उपाययोजना केली नाही तर पिक हातचे जाते.

पाषाणभेद: आता ह्या अळीची लागण झाली हे कसे कळते?

भाऊराव: कपाशी साधारणता: ७० दिवसांची झाली की सुरवातीस पानांवर खसखशीसारखे दाणे दिसतात. त्यावर दुर्लक्ष झाले की ते दाणे ४ दिवसात फुगतात. नंतर त्यातुन बारीक किडे बाहेर पडतात.हे किड नंतर अळीत रुपांतरीत होते. कपाशीचे पाने खावुन ही अळी मोठी होते. ती पुन्हा अंडी देते. तो पर्यंत कपाशी नाश झालेली असते.

******************** कर्मशियल ब्रेक ************************
टिंग. टिंग.तो: आगं, सगुने, आवंदा ज्वारी तर लई झ्याक झाली पध.
ती: तर ओ धनी, आपन आवंदा शेवंता-१ बी.टी. ज्वारी पेरली नव्ह का?
टिंग. टिंग. डि. डिंग.
*********************************************************

पाषाणभेद: अशा ह्या नुकसानकारक अळीचे नियंत्रण केव्हा आणि कसे करावे?

भाऊराव: मागे सांगीतल्याप्रमाणे कपाशी साधारणता: ७० दिवसांची झाली की सुरवातीस पानांवर खसखशीसारखे दाणे दिसतात. याच वेळेस अळीचे नियंत्रण करणे शक्य असते. काही कारणामुळे त्यावर दुर्लक्ष झाले की मग त्यावर उपाय कठीण असतो.

पानांवर खसखशीसारखे दाणे दिसताच किडग्रस्त पाने काढून जमीनीत पुरुन टाकावीत. पाण्यात विद्राव्य असणारे मोनोक्रोटोफॉस्ट २३%, ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातुन हे़क्टरी ८० लिटर, २ दिवसांच्या अंतराने फवारावे.

पाषाणभेद: बर, आता वेळीच उपाययोजना न झाल्यास काय उपाय आहेत?

भाऊराव: वेळीच उपाययोजना न झाल्यास अंड्यांतुन अळी बाहेर पडुन पाने खावु लागते. बोंड अळी च्या नियंत्रणासाठी, निंड्रॉजेन-५०, 10 लिटर पाण्यात 10 मिली आणि मॅलेथिऑन ३% (वरील 10 लिटर पाण्यात ५ मिली ), किंवा बेंन्झोट -पी ३५%, २० लिटर पाण्यात विरघळुन हेक्टरी ७० लिटर, १ दिवसाआड, सकाळच्या वेळी फवारावे. रोगाच्या नियंत्रणास कार्बारील २०% वापरु नये.

१० दिवसाच्या अंतराने हिच उपाययोजना ४ दिवसाआड करावी.

पुढील कपाशीच्या पिकात बोंड अळी चा प्रार्दुभाव होउ नये म्हणुन या हंगामानंतर जमीनीत शेवग्याची लागवड करावी.

पाषाणभेद: भाऊराव, आपल्या शेतकरी बाधवांना आपण 'कपाशीवरील बोंड अळी च्या नियंत्रणाची' फार मोलाची माहीती दिली त्याबद्दल मी **शवाणीच्या तर्फे आभारी आहे.धन्यवाद.

भाऊराव: धन्यवाद.

(वरील मुलाखत दि. १७ मार्च सायंकाळी ७:३५ वाजता **शवाणी च्या *** केंद्रावरून प्रसारीत झाली होती. )

Monday, April 13, 2009

नाशिक जवळची पांडवलेणी

नाशिक जवळ असलेली पांडवलेण्यांचे छायाचित्रण.Photographs of Pandavleni - Pandav Caves at Nashik, Maharashtra, India

छा.१ लेण्याच्या पायथ्याशी असणारी पाटी. Pic. 1. Board at the foot of Pandav Caves.

छा. २ पांडवलेण्यांची माहिती असणारी पाटी. Pic. 2. Information Bord at the Pandav caves.

छा. ३ मुख्य लेणी. या लेण्यात खुप मोठी सपाट लादी आहे. याचा वापर प्रार्थनेसाठी होत असावा. Pic. 3. This cave has large floor to sit and to pray.

छा. ४ लेणी क्र. ४. Pic. 4. Cave No. 4

छा. ५ लेणी क्र. ४ च्या स्तंभावरील कोरीव काम. Pic. 5. Carvings on the column of 4th caves at Pandav Caves, Nashik.

छा. ६ लेणी क्र. ४ च्या स्तंभावरील कोरीव काम. Pic. 6. Carvings on the column of 4th caves at Pandav Caves, Nashik.

छा. ७ मोठे स्तंभ असलेली लेणी. खांब सपाट असल्याचा अचुक उपयोग काही महाभागांनी केलेला दिसतोय. Pic. 8. Caves of large column. Some naughty used bad mind on it.

छा. ८ Pic.8

छा. ९ Pic. 9

छा. १० Pic. 10

छा. ११ लेण्यांवर फुललेला चाफा. Pic.11 Chapha Tree

छा. १२ लेण्यांवरून दिसणारे 'दादासाहेब फाळके' स्मारकातील संगीत कारंजे. हे रात्री प्रकाशमान होते. Pic. 12 Music Fountain seen in 'Dadasaheb Phalke Memorial', from Pandav Caves. This fountain starts at evening. You can see movie songs on the screen on the wall.

छा. १३ लेण्यांवरून दिसणारे नाशिक शहर. Pic. 13 Nashik city from Pandav Caves.

छा. १४ लेण्यांवरून दिसणारी अंबड MIDC ची वसाहत. Pic 14. MIDC Ambad, Nashik. One of the Industrial Area of Nashik.

Friday, April 10, 2009

(बुरुंडीतला जालिंदर) - विडंबन

(आधार : दिव्यातला राक्षस )

आणखी एक जाळिंदरली

जुना प्रसिद्ध दुवा मिळाला
काळजीपुर्वक बघता दुव्यामधुनी
जालिंदरजी हो निघाला
लिही लिही लिही....
पिवळे हास्य करुन म्हणाला
बोल मेरे बगलबच्चे,
कोण बनवू तुला
फुटकळ लेखक कधीच झालो
शोधतो संस्थळात नव्या कंपुला
कंपु शोधणे झाले मुश्किल
'जाज' जी, आता तुमचा हवाला
बेरकी हसले, हळुच म्हणाले
ले(ख)को, जुना जमाना गेला
असते जर सोपे शोधणे
आजकाल प्रामाणिक कंपुला
गुरु तुझा हा असा
असता का अफ़्रिकातील बुरुंडीत राहीला
मुंबै, पुणे नाहीतर
गेलाबाजार एखादा ठाण्याला
ए वन सर्व्हर (मराठी साईट होष्ट करायला) नसता का पाहिला।

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (राजेंनी बहाल केलेले नाव)

अवांतरः " लिहिते व्हा.." पुस्तक भेटले तर सांगा.

Thursday, April 9, 2009

मि.पा. ला जालिंदर जलालाबादींच्या विरोधकांचा विळखा...

गेले आठ दिवस मी मि.पा. चे संकेतस्थळ पाहतोय. नवीन सदस्य या स्तंभात सतत तेचतेच पाच नविन सदस्यांचीच नावे दिसत आहेत. (GAURIBHADE, असुगो, अल्पना, सचिन घुले, मंजुश्री अशोक बनकर)
त्यामुळे मि.पा. च्या कार्यप्रणाली मध्ये काहीतरी बदल झालेला दिसतोय. नाहितर आठ दिवसात एकही नविन सदस्य नोंदणी करु शकत नाही असे होउ शकत नाही. यामागे विद्रोही साहित्यिक 'जालिंदर जलालाबादी' यांचे विरोधक सिएरा-लिओन,घाना,बोट्स्वाना इथल्या मंडळांचा हात दिसतोय.
यामागे जालिंदर जलालाबादी यांचा नुसता वैयक्तीक द्वेश नसुन त्यांच्या जन्मस्थानातील मराठीतले सगळी संस्थळे व त्यांचा विषेश उल्लेख असणारे मिसळपाव.कॉम हे संस्थळ बळजबरीने अधिग्रहित करण्याचा सिएरा-लिओन,घाना,बोट्स्वाना इथल्या मंडळांचा कुटिल डाव आहे.
तसा जालिंदर जलालाबादी या नावात व आडनावातच आंतरजाळाचा संशय येतो. ( (कंस सुरुवात) बघा: जालिंदर शब्दाची उत्पत्ती: जालिंदर हा शब्द जाळिंद्र असा आहे. (जसे जितेंद्र, महेंद्र, योगेंद्र इ.) उत्तरेतील पंजाब राज्यातील लोकांना (काही लोक यांना सरदारजी म्हणतात. (हा काही विनोद नाही.)) जोड शब्द जोर लावुन उच्चार करता येत नाही. या लोकांत उत्तर प्रदेस (खरा उच्चार प्रदेश) व बिहार या राज्यांतील लोकांचादेखील समावेश होतो. (राज ठाकरे यांचा विजय असो.) असो. (अजुन कंस पुर्ण झाला नाही.) म्हणुन जाळिंद्र ---> जाळिंदर. आणि हिंदीत 'ळ ' हे अक्षर नाही. (हिंदी भाषकांना मराठीचे वावडे आहे या राज ठाकरेंच्या विधानाला पुष्टी मिळते. ) (राज ठाकरे यांचा विजय असो.) (आता बास. नाहितर कानाखाली जाळ (बघा पुन्हा जाळ शब्द आला ) निघेल. असो. ) तर ळ चा उच्चार हिंदीत 'ल ' होतो. म्हणुन जाळिंद्र ---> जाळिंदर ---> जालिंदर. (कंस पुर्ण) )
तसेच जालिंदरजी चे पुर्वज अफ़गाणिस्तानचे. पुर्वी अफ़गाणिस्तान भारतातच होता. नंतर एवढा मोठा देश काय करायचा म्हणुन तो आपण वेगळा केला. (आपले सरकारच म्हणते: छोटे कुटूंब, सुखी कुटूंब) आताच्या पंजाब राज्याच्या (भारताच्या व पाक च्या. ( पाक आधी भारतातच होता.)) जवळ अफ़गाणिस्तान आहे. भारताच्या पंजाब राज्यात जालंधर गाव आहे. म्हणुनच जालिंदरजी चे पुर्वज अफ़गाणिस्तानचे नसुन जालंधर चे असावे असा संशय घेता येतो. (जाळधर ----> जालधर ---> जालंधर --->जालिंदर )
जी शब्द उत्पत्ती जालिंदरची तशीच जलालाबादी या शब्दाची. जालालाबाद हे पुर्व अफ़गाणिस्तानमधील शहर. (पहा: संदर्भ) (जळाळाबाद --->जलालाबाद (संदर्भः अफ़गाणिस्तान च्या सध्याच्या बातम्या. तेथे कायम दंगे धोपे होतात. त्यात जाळपोळ (बघा पुन्हा जाळ शब्द आला) होते.))
असो.
सबब विद्रोही साहित्यिक 'जालिंदर जलालाबादी' यांचे विरोधक सिएरा-लिओन,घाना,बोट्स्वाना इथल्या साहित्तीक मंडळांनी आधुनीक आय. टी. तल्या लोकांना हाताशी धरुन मराठी जाळावरील (बघा पुन्हा जाळ शब्द आला) संस्थळे हॅक करण्याचा घाट घातलेला दिसतोय. यात मि.पा. विरुद्ध असलेले लोकही असु शकतात. (हा आपला खाजगी संशय)
तरी मराठी संस्थळचालक- मालक (रिक्षा चालक-मालक च्या चालीवर बोलावे. ) याचा विचार करुन काहीतरी सुरक्षा उपाययोजना करतील अशी आशा आहे. आम्ही तसे सावधगिरिसाठी तात्या, अदितीतै, निलकांत, राजे यांना व्य. नी. केला आहे.
आपलेही मराठी संस्थळ असेल तर काळजी घ्या.

Tuesday, April 7, 2009

आपणांस खालील पुस्तक माहीत आहे काय?

गेल्या मासाच्या अंतीम आठवड्यात कचेरीतील मार्च शेवटाच्या कामामुळे काही वेगळे करण्याचा विचारसुद्धा करवत नव्हता. त्या वेळी अचानक भाचीच्या बालभारती (शासकीय) पुस्तकातील सरस्वती देवी च्या चित्रावर आस्मादिकांची द्रुष्टी गेली. देवीच्या करातील पुस्तक एखाद्या ग्रंथासम आणि हातातील मोत्यांची माळ जणू काव्यमोती सम मज भासू लागले. ही काहीतरी नव उर्मी आहे की काय अशी अंतस्थ शंका मनी दाटुन आली. तसे मी काही लेखक किंवा कवी नव्हे. आपले कचेरीत मान मोडून लिहीत बसावे हाच काय तो लेखणीशी संबंध. तरीही काहीतरी लिखाण प्रसवले पाहीजे असे राहुराहून वाटू लागले. परंतू नक्की काय करावे असा पेच पडला.
मासाच्या शेवटल्या दिशी तर कचेरीत माझ्या हातून बर्‍याच चुका घडल्या. त्या चुका स्वतः मामलतदार साहेबांनी दाखवल्यानंतर आम्ही ताळ्यावर आलो. त्यांची दुरस्ती करण्यासाठी आम्हास जादा तासाचे काम करणे भाग पडले. आता त्या जादा वेळेचे पैसे मिळतील हा भाग निराळा. पण माझ्यासारखा जबाबदारीने काम करणारा सुद्धा अशी चुक करतो हे बघून आमचे मुख्य कारकून सो. श्री. रानवेडे यांनीपण सखेद मह्दआश्च्रर्य व्यक्त केले. त्यादिवशी ते पण माझ्यासाठी जादा वेळ थांबले होते. केवढी हि आपल्या कर्मचार्‍याची काळजी. ते बघून माझे मन भरून आले. जास्तच वेळ होते आहे ते पाहून साहेबांनी शिपायास सांगुन स्वत: जेवण मागावले. जेवण घेउन आलेल्या पोर्‍यास जेवणाचे पैसे कचेरीच्या खात्यावर टाकण्यास पर्मावीले.
दुसर्‍या दिशी नवीन मास चालु झाला. पहिल्या आठवड्यात गुरूवारी आंतरजाळावर भटकत असता मिसळपाव या संकेतस्थळावर आमची स्वारी येवुन थडकली आणि आज आपण जेवणाचा डबा सखाराम शिपायास द्यावा आणि स्वत: भगवती हाटेलाची मिसळ चापण्यास जावे असा साक्षातकार मला व माझ्या टेबलाच्या पुढयात बसलेल्या व नदितील वाळू काढण्याचे टेंडर नेण्यासाठी आलेल्या श्री. गोमाडे- वाळू पुरवठा करणार्‍यांकडुन आलेल्या माणसास एकदम व्हावा यात आर्श्चय वैगेरे काही नव्हते हे आपणास एव्हाना ध्यानात आलेच असेल. अहो, मिसळपाव संकेतस्थळावर वापरायचे आणि मिसळपाव चापायची नाही म्हणजे घोर अपराधच. आणि आम्ही तो सहसा समोर कुणी कामासाठी आलेला माणुस असतांना करीत नाही. समोरचा आग्रहाने सांगत असतांना तो आग्रह मोडवत नाही हो.
त्यानंतर दुपारी निवांतपणे मिसळपाव धुंडाळतांना अचानक श्रीयूत. भडकमकर मास्तरांचा महान साहित्यिक जालिंदरजींविषयीचा लेख वाचण्यात आला. आजकाल साहित्यसंमेलनात जे काही घडते ते प्रत्यक्शात करणारे साहित्यिक श्री. जालिंदरजी आहेत हे पाहून मनास उभारी आली. त्यांची ग्रंथसंपदा पाहून अभीमान वाटला. मराठीविषयीचा आत्मविश्वास दुणावला. आपणही फुल ना फुलाची पाकळी लिहिले पाहिजे असे वाटू लागले.
सदरहू लेखात उल्लेख असणारे "लिहिते व्हा.." हे संदेशात्मक लिखाणाचे पुस्तकही नुकतेच बाजारात आले आहे हे ही समजले. आपण काही लेखक नाही पण हे पुस्तक आपणापाशी असले म्हणजे ते वाचून व त्या पासून काही स्फूर्ती घेउन आपणही काहीतरी लिहू शकू असे अंत:प्रेरणा सांगु लागली. यास्तव आम्ही कचेरीतुनच बर्‍याच पुस्तकालयांना दुरध्वनी केले. पण कोठेही काही माहीती मिळू शकली नाही.
हे पुस्तक नविन असल्याकारणाने असे व्हावे असे वाटते. नाहीतरी आपणाकडे वस्तू जुनी झाली की मोल कळते. पुस्तकाविषयीची नकारघंटा एकुन आपण लिहू शकत नाही ही कल्पना करवत नव्हती. मनाचा निर्णय घेतला आणि ठरवीले की या विषयी आपणालाच विचारावे. आपणापैकी कुणाला या पुस्तकाविषयी / त्याच्या उपलब्भतेविषयी जास्त माहीती असेल तर मला कळवावे. मी ते पुस्तक वाचू ईच्छीतो. पुस्तक मिळाल्यास मी ते वाचून परत करीन असे सांगू ईच्छीतो. पुस्तक वाचण्यास देण्याची इच्छा नसल्यास ते कोठे उपलब्भ होईल ते क्रुपया सांगावे. मराठी चा झेंडा आशियापार नेणार्‍या श्री. जालिंदर यांना सादर प्रणाम.

Friday, April 3, 2009

दोन राज्यांचे रेल्वे स्टेशन - Railway Station of two States

नवापुर - (हो तेच ते बर्ड फ्लू वाले) हे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याच्या हद्दीवर वसलेले तालूक्याचे ठिकाण आहे. येथूनच राष्ट्रीय महामार्ग ६ (नागपूर- सुरत) जातो. ते नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात मोडते. स्वतंत्र महाराष्ट्र होण्यापुर्वी हे गाव गुजरात मध्ये जाणार होते. त्या वेळी तेथील लोकांनी ठराव करून हे गाव महाराष्ट्रात आणले. (गुजरात मधील सुब्बत्ता बघुन त्यांचे आत्मे आता पस्तावत असतील.) या गावात मराठी तसेच गुजराथी लोक गुण्यागोवींदाने राहतात. शहरात नगरपालिका स्वच्छ्तेची विषेश काळजी घेते असे दिसले।

Navapur is a taluka place in tribal Nandurbar District, situated on the National Highway No. 6, and it is the last town on the Maharashtra border. Gujarat state Border starts after 1 KM from this city. Marathi as well as Gujarati community lives here. In the year of 2006 Bird Flew hits Navapur poultry industry badly.

गाव उकाई धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याच्या (मराठीत आपले 'बॅक वॉटर' हो)जवळ आहे. निसर्गाने या तालूक्याला भरभरून दान दिले आहे. या तालुक्यात सागाची भरपूर वने आहेत. पावसाळ्यात येथे जातांना चरणमाळ आणि कोंडाईबारी या घाटांमध्ये असलेल्या जंगलातले द्रुष्य तर मनोरम असते.
येथील आदिवासी रहीवासी कष्टाळू आहे. शासनाच्या क्रुपेमुळे (!!) त्यांची आर्थीक परीस्थीती चांगली आहे.
या ठिकाणी लाकूड कताई / लाकूड काम फार मोठ्या प्रमाणात चालते. सुतार लोक प्रामाणीक आहेत. गिर्‍हाईकाकडुन योग्य मोबदला घेवुन सागवानी ला़कडाचे सामान बनवून दिले जाते.

This town is on the banks of Ukai Dam. There is lots of Jungle having many trees of Sag.While going Navapur during rainy season, The Ghats of Charanmal and Kondai Bari looks fabulous.

या गावाच्या परीसरात बर्ड फ्लू च्या साथीने कोंबड्या मरण्यापुर्वी (२००६) कोंबड्याची शेते (पोल्र्ट्री फार्म) फार मोठ्याप्रमाणात होती. इतकी की, गाव ५-६ कि.मी. वर असतांना कोंबड्यांच्या शेतांमधुन विशीष्ट वास येई. आता ते प्रमाण फारच कमी झाले आहे.
या गावाची भौगोलीक रचना काहीतरी वेगळी असल्याने येथील हवा कोरडी असुनसूद्धा फार गरम होते. थंड वारे सहसा वाहतच नाही. बारोमास तुम्ही पंख्याशीवाय राहूच शकत नाही. (१ कि.मी. च्या फरकाने हेच गाव गुजराथ मध्ये असले असते. गुजरात मध्ये भारनियमन नाही. )सुरत, बारडोली, बडोदा सारखे मोठे शहरे जवळ असूनही येथील MIDC नावालाच आहे. ("गुजरात मधील सुब्बत्ता बघुन ..." ह्या वाक्याचा संदर्भ आत्ता तुमच्या लक्षात आला असेल.) असो. कालाय तस्मै नमः

The tribal community here is very hardworking community.
You can found lots of wood cutting / wood working mills here. The carpenters are the good worker and they make the wooden furniture of Sag wood due to plenty supply of Sag trees.
Due to geographical situation here, you can't live here without electric fan. Even though the air is dry and trees as well as jungle around here, there is always a hot air during a year.

आता या लेखाच्या मुख्य शीर्षकाबद्दल्...नवापुर रेल्वे स्टेशन हे पश्चिम रेल्वे च्या सुरत-जळगाव या मार्गात येते. येथे जो रेल्वे फलाट आहे तो अक्षरशा: निम्मा महाराष्ट्रात आणि निम्मा गुजरात राज्यात येतो.
The uniqueness of Navapur's railway station is its railway platform is exactly half in Maharashtra and half in Gujarat.
जसा:===========गुजरात हद्द [ नवापुर रेल्वे फलाट ] महाराष्ट्र हद्द============
Navapur RS1
छायाचित्र क्रमांक १. विकीमॅपीयावरील नवापुर रेल्वे स्टेशनचे छायाचित्रछायाचित्रात जी लाल रेषा आहे त्या ठिकाणी दोन्ही राज्याची हद्द सुरु होते (किंवा संपते). (मी जसे काही वाघा बॉर्डर वर उभा आहे असे सांगतो आहे. )
Photo. 1. This photo is taken from Wikimapia. The read line divides the Navapur railway platform in to half in Maharashtra and half in Gujarat. This photograph shows exact border of these states.

Navapur RS2छायाचित्र क्रमांक २. आस्मादिकांचे चिरंजीव महाराष्ट्रात तर भाचेराव फुटभर लांब असलेल्या गुजरातेत उभे!
Photo 2. This photo shows the monument on the Navapur railway platform. The boy who salutes is my son who is in Maharashtra and nephew stands in Gujarat, a few feet apart.


Swarali at a Navapur Railway Station: A Railway Station of Two States - Maharashtra and Gujrat
स्वराली नवापुर रेल्वे स्थानकावर, नवापुर रेल्वे स्थानक महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर आहे.
 
ह्या फलाटावर तिकीट देणारा कारकून हा महाराष्ट्रात बसतो (छायाचित्रात पत्रे टाकलेली जागा जरा बारकाईने बघा); आणि तिकीट घेणारा पासिंजर हा गुजरातेत उभा असतो (आग विझवणार्‍या बादल्या / सिमेंटची जाळी या मागे). पासिंजरचा खांदा गुजरातेत आणि पैसे घेतलेला हाताचा पंजा महाराष्ट्रात असतो.

The ticket booking clerk sits in Maharashtra (behind the roofing sheets) and the passenger stands in Gujarat (behind the fire sand buckets).

Navapur RS3छायाचित्र क्रमांक ३. नवापुर रेल्वे स्टेशनची पाटी
Photo 3. Navapur railway Station Board.
The ticket booking clerk sits in Maharashtra (behind the roofing sheets) and the passenger stands in Gujarat (behind the fire sand buckets).

Navapur Co-op. Sugar Factoryछायाचित्र क्रमांक ४. डोकारे (नवापुर) येथील सहकारी साखर कारखाना
Photo 4. Dokare (Tal. Navapur) Adivasi Co-operative Sugar Factory

आम्ही गेलो तेव्हा उसासाठी मारामार चालु होती. त्यामुळे कारखाना बघण्यासाठी थोडे थांबावे लागले. नंतर कारखान्याच्या कार्यस्थळापासुन जवळच असलेल्या गावी एका लाकुड काम करणार्‍या सुताराच्या वर्कशॉप ला भेट दिली।
We have to wait for a while we visited Sugar Factory as there is shortage of sugarcane. After that we visited a carpenter's workshop.