भारतीय उपखंडात निरनिराळ्या आजारपणांचे प्रमाण वाढते आहे. त्यात मधुमेह, हॄदयरोग, स्थुलपणा आदी गृहीत धरा. वेगवेगळ्या संस्था याबाबत वेळोवेळी आकडेवारी प्रसृत करत असतात. जरी ती आकडेवारी आहे तितकी खरी मानली नाही तरीही वरील आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहेच. हे आजारपण वाढण्यामागे अनेक कारणे असतीलही - जसे बदलती जीवनशैली, आर्थीक स्थिती उंचावणे, अन्नघटकाचे पोषणमुल्ये, सुपोषण आदी. परंतु या सर्व कारणांमध्ये भारतीय अन्नाची चव व ते अन्न रूचीदार बनवणार्या गृहीणी किती कारणीभुत आहेत?
या गृहीतकामागे बर्याच घरांमध्ये भारतीय अन्नपुर्णा घरी अन्न बनवतात असे गृहीत धरलेले आहे. भारतीय पदार्थ चविष्ट असण्यामागे या अन्नपुर्णांचा हात स्पष्टपणे असतो. सढळ हाताने चमचमीत अन्नपदार्थ, मिठाया बनवण्यात सर्व जगात पहिल्या क्रमांकासाठी भारतीय उपखंडातल्या स्त्रीयांचा समावेश करावा लागेल. आपल्या उपखंडात मसाल्याचे पदार्थांचा मुबलक वापर केला जातो. हे फार पुर्वीपासून चालत आलेले आहे. त्याकाळातही असल्या आजारांचे प्रमाण येथल्या उपखंडात जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात याबाबतीत त्याकाळी शास्त्रशुद्ध अभ्यास नसल्यामुळे ती आकडेवारी मिळणार नाही.
भारतीय नारी ही घरातल्या व्यक्तीच्या खाण्याच्या आवडीनिवडीबाबत फारच जागरूक असते. पतीला ही भाजी आवडत नाही - नको डब्यात द्यायला, मुलाला डब्यात निरनिराळे पदार्थ देणे जेणेकरून तो शाळेत डबा संपवेल, असे तीचे चालू असते. अर्थात या सर्वांत त्या स्त्रीचे कुटूंबाप्रती असलेले प्रेमच निर्देशीत होत असते. असल्या कुटूंबवस्तल वृत्तीचा मला आदर आहेच, त्यात वाद नाही. एखादा पदार्थ जर चांगला झाला अन तो आग्रहपुर्वक वाढण्यात आला तर त्यास सहसा नकार न देता दोन घास जास्तीचे खाल्ले जातात हा अनुभव आपणास एकदातरी आलेला असेलच.
आणखी एक उपमुद्दा येथे येवू शकतो तो म्हणजे आपल्याकडचे सण-समारंभ आणि उत्सव. यांचेही प्रमाण इतर समाजात व भारतीय समाजात व्यस्त आहे. महिन्याकाठी एकतरी सण समारंभ आपल्या संस्कृतीत करण्याचे प्रमाण आहे. त्यावेळी काहीतरी गोडधोड, चमचमीत पदार्थ घरी केले जातात.
भारतीय समाजात वाढणारे आजारपणाची सामाजीक व्याप्तीला नवीन दिशा मिळण्याच्या हेतूने वरील सर्व मुद्दे लक्षात घेवून चर्चा अपेक्षीत आहे. (या चर्चेत अमेरीकन्स पण जाड होतायेत, पिझ्झा बर्गर यांची भारतातही चंगळ होते आहे हे टाळावे. संशोधन करणार्या बर्याचशा संस्था ह्या अमेरीकन (अभारतीय) असल्याने बहूतेक शारीरीक स्केल्स ह्या अमेरीकन/ ब्रिटीश लोकांनाच गृहीत धरून असतात. उदा. BMI, उंची/ वजन/ रक्तदाब यांचा रेशो आदी.
रामराम हो पाव्हणं! वाईच जरा बसा ईथं.
Showing posts with label वाद. Show all posts
Showing posts with label वाद. Show all posts
Sunday, October 16, 2011
Friday, September 2, 2011
लेखन व लेखकाचे बाह्यरुप
असे म्हणतात की आपण जे लिहीतो तसे आपले मन असते. आपल्या मनातले आहे ते कागदावर उमटते. थोडक्यात आपले लिखाण आपला स्वभाव, वागणूक दाखवते. या लेखनात कार्यालयात केले जाणारे लेखन, अनौपचारीक पत्रे येत नाहीत. जे ललीत आहे, जे लेखकाला आनंद देते व जे खरे आहे ते लेखन येथे अभिप्रेत आहे.
थोडक्यात केले जाणारे लेखन लेखकाच्या मनाचा आरसा असते. अशाच प्रकारच्या मनाच्या आरशातून त्या लेखकाचे बाह्यरुप देखील आजमावता येईल का? बाह्यरुप म्हणजे तो लेखक/ लेखिका कसा / कशी आहे? त्याला कोणत्या आवडीनिवडी आहेत? पुरूष लेखक असेल तर त्याला मिशा ठेवण्याची आवड आहे का? त्याला कोणते कपडे आवडत असतील? लांब बाह्यांचे सदरे की अर्धी बाही? त्याला कसले व्यसन आहे? नाही? डोळ्यांचा रंग / केसांची ठेवण कशी आहे? असे काही जाणता येते का?
लक्षात घ्या की येथे स्वभाव कसा आहे याची पडताळणी घ्यायची नाही. केवळ बाह्यरूप कसे असेल याचा धांडोळा घ्यायचा आहे. येथे असणार्या लेखकांच्या मनात काही प्रतीमा तयार झाल्यात. आपल्याही मनात असल्या काही प्रतीमा तयार झाल्या आहेत काय?
येथे कोणतेही भविष्य वर्तवण्याचा हेतू नाही. किंवा 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' वर्तवण्याचा हेतू नाही. कारण भविष्य व 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' असे काही असते यावर माझा विश्वास नाही.
माझे वरील लिखाण थोडे विस्कळीत वाटेल पण जे जाणकार आहेत त्यापर्यंत माझ्या मनाच्या भावना पोचल्या असतील. कोणी माझ्या मतांची त्यांच्याबद्दल खाजगीरीत्या मागणी केली तर मी माझे मत त्या पर्यंत पोचवू शकतो.
थोडक्यात केले जाणारे लेखन लेखकाच्या मनाचा आरसा असते. अशाच प्रकारच्या मनाच्या आरशातून त्या लेखकाचे बाह्यरुप देखील आजमावता येईल का? बाह्यरुप म्हणजे तो लेखक/ लेखिका कसा / कशी आहे? त्याला कोणत्या आवडीनिवडी आहेत? पुरूष लेखक असेल तर त्याला मिशा ठेवण्याची आवड आहे का? त्याला कोणते कपडे आवडत असतील? लांब बाह्यांचे सदरे की अर्धी बाही? त्याला कसले व्यसन आहे? नाही? डोळ्यांचा रंग / केसांची ठेवण कशी आहे? असे काही जाणता येते का?
लक्षात घ्या की येथे स्वभाव कसा आहे याची पडताळणी घ्यायची नाही. केवळ बाह्यरूप कसे असेल याचा धांडोळा घ्यायचा आहे. येथे असणार्या लेखकांच्या मनात काही प्रतीमा तयार झाल्यात. आपल्याही मनात असल्या काही प्रतीमा तयार झाल्या आहेत काय?
येथे कोणतेही भविष्य वर्तवण्याचा हेतू नाही. किंवा 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' वर्तवण्याचा हेतू नाही. कारण भविष्य व 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' असे काही असते यावर माझा विश्वास नाही.
माझे वरील लिखाण थोडे विस्कळीत वाटेल पण जे जाणकार आहेत त्यापर्यंत माझ्या मनाच्या भावना पोचल्या असतील. कोणी माझ्या मतांची त्यांच्याबद्दल खाजगीरीत्या मागणी केली तर मी माझे मत त्या पर्यंत पोचवू शकतो.
Sunday, June 20, 2010
ऑफिसातले गाणे
ऑफिसातले गाणे
जय महाराष्ट्र मंडळी!
आपण बहूतेक सगळेच नोकरदार मंडळी आहोत. कुठे ना कुठे कळफलक बडवतो, खर्डेघाशी करतो, हात काळे करतो. तर बहुतेक ठिकाणी (म्हणजे आय टी सेक्टर मध्ये) कामे करतांना गाणे ऐकणे आता सर्वसाधारण आहे. कुठे एका सेंट्रल स्पिकरवर गाणे वाजवले जाते. कुठे सेंट्रलाईझ म्यूझीक सिस्टीम असते. तर कोठे अशी व्यवस्था नसल्याने जो तो आपापला हेडफोन लावून गाणे ऐकत बसतो. आता आपण या 'ऑफिसात गाणे ऐकणे' या विषयावर जी चर्चा त्या अनूषंगाने जाणारे काही प्रश्न असे:
१) गाणे सेंट्रलाईज आहे का? म्हणजे एका ठिकाणी स्पिकर ठेवलेले आहेत अन कुणीतरी त्याच्या/ तिच्या आवडीचे गाणे वाजवतो.
२) त्या गाण्याचे ट्रॅक्स तुम्हाला नेहमीच आवडतात काय?
३) तुम्हाला तेथे तुमच्या आवडीचे गाणे वाजवता येते काय?
४) न वाजवता आल्यास अन दुसर्याच्या आवडीचे गाणे ऐकून कंटाळा, राग येतो काय? तो राग व्यक्त करता तेतो काय? राग आल्यास काही उपाय आहे काय?
५) चालू असलेले गाणे न आवडल्यास बंद करता येतो काय?
६) गाणे चालू असले म्हणजे कामात व्यत्यय येतो असे वाटते काय?
७) गाण्याचा व्हॉल्यूम कमी/ जास्त/ सहन करण्याईतपत/ बारीक/ जवळजवळ नाहीच असा असतो काय?
८) महाराष्ट्राबाहेर काम करत असतांना त्या त्या भाषेतले गाणे एकतांना कंटाळा, राग येतो काय? तो राग व्यक्त करता तेतो काय? राग आल्यास काही उपाय आहे काय?
९) "गाणे वाजवणे" या बाबत कंपनीची काही पॉलीसी आहे काय?
१०) गाण्याचा प्रकार कोणता: नेहमी शांत/ उल्हासीत करणारे/ क्लासिकल / इंन्स्ट्रूमेंटल/ आधूनिक सिनेमा संगीत / जुनी चित्रपट गीते/ इंग्रजी/ प्रादेशीक भाषेत आदी.
११) गाणे ऑनलाईन असते का? की कॉम्पूटरवर ? की सेंट्रल म्युझीक वर लागणारे?
१२) प्रत्येक जण त्याच्या त्याच्या सिस्टीम वर गाणे लावू शकतो काय?
१३) तुमचे या प्रकारामुळे वाद झालेला आहे काय?
१४) "गाणे वाजवणे " या प्रकारात केवळ एफ. एम. रेडीओच वाजवला जातो काय?
१५) तुम्हाला काम करतांना "गाणे वाजवणे " किंवा "गाणे ऐकणे "हा प्रकार आवडतो काय? हो/ नाही/ अजीबात नाही/ नकोच ते प्रकार
१६) ऑनलाईन गाणे हार्डडिस्कवर कॉपी करणे कॉपिराईट गुन्हा आहे हे तुम्हास/ तुमच्या मॅनेजमेंटला माहित आहे काय? त्या विरूद्ध काय पावले उचलली आहेत?
१७) ऑफिसची बँन्डविड्थ/ रिसोर्स वापरून ऑनलाईन गाणे डाउनलोड करणे/ शेअर करणे तुम्ही करता काय? ते योग्य वाटते काय? त्यात किती वेळ खर्ची जातो?
१८) नॉन आय टी नोकरी करणार्यांची काय मते/ अनुभव आहे?
१९) "ऑफीसात कामे करायला जातो. गाणे हे नकोच. मग चर्चा कशाला"
जय महाराष्ट्र मंडळी!
आपण बहूतेक सगळेच नोकरदार मंडळी आहोत. कुठे ना कुठे कळफलक बडवतो, खर्डेघाशी करतो, हात काळे करतो. तर बहुतेक ठिकाणी (म्हणजे आय टी सेक्टर मध्ये) कामे करतांना गाणे ऐकणे आता सर्वसाधारण आहे. कुठे एका सेंट्रल स्पिकरवर गाणे वाजवले जाते. कुठे सेंट्रलाईझ म्यूझीक सिस्टीम असते. तर कोठे अशी व्यवस्था नसल्याने जो तो आपापला हेडफोन लावून गाणे ऐकत बसतो. आता आपण या 'ऑफिसात गाणे ऐकणे' या विषयावर जी चर्चा त्या अनूषंगाने जाणारे काही प्रश्न असे:
१) गाणे सेंट्रलाईज आहे का? म्हणजे एका ठिकाणी स्पिकर ठेवलेले आहेत अन कुणीतरी त्याच्या/ तिच्या आवडीचे गाणे वाजवतो.
२) त्या गाण्याचे ट्रॅक्स तुम्हाला नेहमीच आवडतात काय?
३) तुम्हाला तेथे तुमच्या आवडीचे गाणे वाजवता येते काय?
४) न वाजवता आल्यास अन दुसर्याच्या आवडीचे गाणे ऐकून कंटाळा, राग येतो काय? तो राग व्यक्त करता तेतो काय? राग आल्यास काही उपाय आहे काय?
५) चालू असलेले गाणे न आवडल्यास बंद करता येतो काय?
६) गाणे चालू असले म्हणजे कामात व्यत्यय येतो असे वाटते काय?
७) गाण्याचा व्हॉल्यूम कमी/ जास्त/ सहन करण्याईतपत/ बारीक/ जवळजवळ नाहीच असा असतो काय?
८) महाराष्ट्राबाहेर काम करत असतांना त्या त्या भाषेतले गाणे एकतांना कंटाळा, राग येतो काय? तो राग व्यक्त करता तेतो काय? राग आल्यास काही उपाय आहे काय?
९) "गाणे वाजवणे" या बाबत कंपनीची काही पॉलीसी आहे काय?
१०) गाण्याचा प्रकार कोणता: नेहमी शांत/ उल्हासीत करणारे/ क्लासिकल / इंन्स्ट्रूमेंटल/ आधूनिक सिनेमा संगीत / जुनी चित्रपट गीते/ इंग्रजी/ प्रादेशीक भाषेत आदी.
११) गाणे ऑनलाईन असते का? की कॉम्पूटरवर ? की सेंट्रल म्युझीक वर लागणारे?
१२) प्रत्येक जण त्याच्या त्याच्या सिस्टीम वर गाणे लावू शकतो काय?
१३) तुमचे या प्रकारामुळे वाद झालेला आहे काय?
१४) "गाणे वाजवणे " या प्रकारात केवळ एफ. एम. रेडीओच वाजवला जातो काय?
१५) तुम्हाला काम करतांना "गाणे वाजवणे " किंवा "गाणे ऐकणे "हा प्रकार आवडतो काय? हो/ नाही/ अजीबात नाही/ नकोच ते प्रकार
१६) ऑनलाईन गाणे हार्डडिस्कवर कॉपी करणे कॉपिराईट गुन्हा आहे हे तुम्हास/ तुमच्या मॅनेजमेंटला माहित आहे काय? त्या विरूद्ध काय पावले उचलली आहेत?
१७) ऑफिसची बँन्डविड्थ/ रिसोर्स वापरून ऑनलाईन गाणे डाउनलोड करणे/ शेअर करणे तुम्ही करता काय? ते योग्य वाटते काय? त्यात किती वेळ खर्ची जातो?
१८) नॉन आय टी नोकरी करणार्यांची काय मते/ अनुभव आहे?
१९) "ऑफीसात कामे करायला जातो. गाणे हे नकोच. मग चर्चा कशाला"
Saturday, May 29, 2010
त्याचे तिचे प्रश्नोत्तरे
त्याचे तिचे प्रश्नोत्तरे
सिच्यूएशन: हिरो हिरवीनीची छेडाछेडी
चाल: थोडीशी सवाल जबाबासारखी
सिच्यूएशन: हिरो हिरवीनीची छेडाछेडी
चाल: थोडीशी सवाल जबाबासारखी
तो:
गोरा गोरा रंग अंगी चोळीही तंग
पदर कमरेला विळखा घाली
असती आपल्यातच दंग
चाल तुझी मोरावानी
हरणापरी चपळ अंग
कुठं जाशी कुठून येशी
सांग सांग सांग पोरी
सांग सांग सांग
ती:
गोरा गोरा रंग माझा नाही गर्वाने धुंद
शिंप्याची चुक झाली
केली चोळी त्याने तंग
मोर हरणावानी चाल चपळ
न्हाई तुझ्यागत फोपशी अंग
नसत्या चौकशा करू नगं
लांब लांब लांब हो पोरा
लांब लांब लांब
गोरा गोरा रंग माझा नाही गर्वाने धुंद
शिंप्याची चुक झाली
केली चोळी त्याने तंग
मोर हरणावानी चाल चपळ
न्हाई तुझ्यागत फोपशी अंग
नसत्या चौकशा करू नगं
लांब लांब लांब हो पोरा
लांब लांब लांब
तो:
कवळी कवळी काकडी पाहिली
कच्ची तोडावी का नको
पिकली तर जास्त चांगली
पर त्यात वेळ दवडाया नको
कोनतं फळ झाडाचं खरं
आसतं तोडायला बरं
सांग सांग सांग पोरी
सांग सांग सांग
कवळी कवळी काकडी पाहिली
कच्ची तोडावी का नको
पिकली तर जास्त चांगली
पर त्यात वेळ दवडाया नको
कोनतं फळ झाडाचं खरं
आसतं तोडायला बरं
सांग सांग सांग पोरी
सांग सांग सांग
ती:
फळ झाडाचं मुल आसतं
त्याचं त्याला प्यारं
कच्च अन पिकलेलं
काय भलं काय बुरं
जे बी फळ मिळतंया
आनंदानं खावून घे तू रं
जान जान जान पोरा
जान जान जान
फळ झाडाचं मुल आसतं
त्याचं त्याला प्यारं
कच्च अन पिकलेलं
काय भलं काय बुरं
जे बी फळ मिळतंया
आनंदानं खावून घे तू रं
जान जान जान पोरा
जान जान जान
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२९/०५/२०१०
२९/०५/२०१०
Friday, February 26, 2010
मनसे व सीमावाद धोरण
मनसे व सीमावाद धोरण
(डिस्केमर: इतर पक्षांबाबत काही ताशेरे येथे नाहीत पण उगाच वाद नको. इतर पक्षाच्या लोकांनी 'मनसे' ऐवजी त्यांच्या पक्षाचे नाव टाकावे व वाचल्यास हरकत नाही. 'मनसे' ही एक मानवी प्रवृत्ती आहे हे लक्षात घ्या.)
(शेवटी सीमावादातले लोकं मराठी आहेत ते महाराष्ट्रात आले पाहीजे. त्यासाठी पक्षविरहीत राजकारण व्हावे ही माझी ईच्छा. पण तसे होणे नाही. मनसेच्या नावातच 'महाराष्ट्र' आहे. म्हणून तो 'सीमावादाला' जवळचा आहे. असो.)
मनसे हा मराठी अस्मिता जपण्यासाठी तयार झालेला पक्ष आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत पक्ष या विचाराला ठिकून राहीलेला आहे. राजकिय पक्षाने काय करावे हा प्रश्न काही त्या त्या पक्षाचा खाजगी मामला होवू शकत नाही. तरीही काही काही लोकांना प्रत्येक राजकिय पक्षाने काय घ्येय्य घोरण अवलंबवावे त्या सुचना कराव्या वाटतात.
उदाहरणार्थ कुणाला भाववाढीच्या विरोधात कुणा पक्षाने काम करावे वाटते तर कुणाला एका धार्मिक जमातीला आधार द्यावा वाटतो. हे झाले ज्याचे त्याचे मत.
राजकिय पक्ष असे निर्ढावलेले आहेत की ते मतांसाठी, सत्तेसाठी वारा आले तसे पाठ फिरवतात. मनसे हा त्याला अपवाद ठरावा ही आपली ईच्छा आहे जेणे करून कमीतकमी मराठी मुद्याला योग्य न्याय मिळेल. (बघा- येथेही मी कमीतकमी अपेक्षा ठेवलेली आहे.) असो.
तर आजची बातमी. 'मराठी भाषकांच्या घरांवर कन्नडिगांकडून दगडफेक'
कन्नड लोकं नेहमी मराठी भाषकांची गळचेपी करत आलेले आहेत. महाराष्ट्र 'स्वतंत्र' झाल्यापासून असे होते आहे. सीमाभागात मराठी भाषीक जास्त आहेत हे कुणीही नाकारू शकत नाही. भाजपा-शिवसेनेची सत्ता असतांनासुद्धा या सीमाप्रश्नाबद्दल काही घडले नाही.
मनसे ह्या पक्षाने किरकोळ 'निष्फळ 'आंदोलने (उदा. सातबारा कोरा करा, जोडे मारा, कुलूप लावा, चपला घाला-चालू पडा, तोंडाला काळे फासा, बांगड्यांचा आहेर करा आदी.) न करता सीमाभागात जास्त लक्ष घालून या बाबत आपले धोरण सुस्पष्ट केले पाहीजे. पक्षाच्या ध्येय व धोरणात कोठेही या सीमाभागाबाबत उल्लेख नाही, किंवा राजसाहेब या सीमाभागातून वरीलप्रमाणे येणार्या बातम्यांबाबत बोलत नाही. याचा अर्थ त्यांचे याकडे लक्ष नाही असे नाही पण सीमाभागातल्या लोकांना धिर यावा म्हणून मनसेचे घोरण अधीक सुस्पष्ट हवे असे मला वाटते.
{मनसेचे "ध्येय आणि धोरण :- " मराठी संस्कृती विस्तार, मराठी भाषा विचार, मराठीमध्ये ज्ञानकक्षा रुंदावणे, भौतिक व सांस्कृतिक विकास करणे ह्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत.}
केवळ सीमावाद हा महाराष्ट्र कर्नाटक आहे असे नाही. बारकाईने बघीतले असता हा वाद निप्पाणी, बेळगाव, कारवार, हुब्बळी तसेच मध्यप्रदेशात बर्हाणपूर, खंडवा, गुजराथ मधला अहवा, डांग जिल्हा (जाणकार या प्रदेशां बाबत मत व्यक्त करा.) आदी भागातही होवू शकतो. वरील सर्व भागांत मराठी टक्का जास्त आहे. वरील भाग महाराष्ट्र 'स्वतंत्र' होत असतांना चुकीने इतर राज्यांत घातले गेले आहेत.
वरील ठिकाणच्या मराठी जनतेला महाराष्ट्रात आणून मराठी सीमा वाढवली पाहीजे, किमानपक्षी तेथील लोकांवर जो जो अन्याय तेथील राज्यांकडून-लोकांकडून होतो आहे तो थांबला पाहीजे असे बघितले गेले पाहीजे.
मनसेचे 'कडक' धोरण मराठी जनतेला फायद्याचे रहाणार आहे. मी तर यापुढे जावून असेही म्हणतो की जर मनसे ने सिमाभागात जर निवडणूका लढवल्या तर त्यांना जास्त फायदा होईल.
असो. या पुढील काळात ज्याची भूमी जास्त तो प्रदेश बलवान असेल असे घडेल. (हे प्रत्येक राष्ट्राबाबतीत होवू शकते व महाराष्ट्र हे एक राष्ट्रच आहे.) जास्त भुमी म्हणजे जास्त नैर्सगीक संपदा (रिसोर्स), जास्त फायदा हे साधे गणित आहे. मनसेने (किंवा कोणत्याही पक्षाने) सीमावाद संपवण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहीजे ही काळाची गरज आहे. अन्यथा प्र. के. अत्रेंचे नावपण घेण्यास आपण लायक नाहीत असे मला वाटते.
(डिस्केमर: इतर पक्षांबाबत काही ताशेरे येथे नाहीत पण उगाच वाद नको. इतर पक्षाच्या लोकांनी 'मनसे' ऐवजी त्यांच्या पक्षाचे नाव टाकावे व वाचल्यास हरकत नाही. 'मनसे' ही एक मानवी प्रवृत्ती आहे हे लक्षात घ्या.)
(शेवटी सीमावादातले लोकं मराठी आहेत ते महाराष्ट्रात आले पाहीजे. त्यासाठी पक्षविरहीत राजकारण व्हावे ही माझी ईच्छा. पण तसे होणे नाही. मनसेच्या नावातच 'महाराष्ट्र' आहे. म्हणून तो 'सीमावादाला' जवळचा आहे. असो.)
मनसे हा मराठी अस्मिता जपण्यासाठी तयार झालेला पक्ष आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत पक्ष या विचाराला ठिकून राहीलेला आहे. राजकिय पक्षाने काय करावे हा प्रश्न काही त्या त्या पक्षाचा खाजगी मामला होवू शकत नाही. तरीही काही काही लोकांना प्रत्येक राजकिय पक्षाने काय घ्येय्य घोरण अवलंबवावे त्या सुचना कराव्या वाटतात.
उदाहरणार्थ कुणाला भाववाढीच्या विरोधात कुणा पक्षाने काम करावे वाटते तर कुणाला एका धार्मिक जमातीला आधार द्यावा वाटतो. हे झाले ज्याचे त्याचे मत.
राजकिय पक्ष असे निर्ढावलेले आहेत की ते मतांसाठी, सत्तेसाठी वारा आले तसे पाठ फिरवतात. मनसे हा त्याला अपवाद ठरावा ही आपली ईच्छा आहे जेणे करून कमीतकमी मराठी मुद्याला योग्य न्याय मिळेल. (बघा- येथेही मी कमीतकमी अपेक्षा ठेवलेली आहे.) असो.
तर आजची बातमी. 'मराठी भाषकांच्या घरांवर कन्नडिगांकडून दगडफेक'
कन्नड लोकं नेहमी मराठी भाषकांची गळचेपी करत आलेले आहेत. महाराष्ट्र 'स्वतंत्र' झाल्यापासून असे होते आहे. सीमाभागात मराठी भाषीक जास्त आहेत हे कुणीही नाकारू शकत नाही. भाजपा-शिवसेनेची सत्ता असतांनासुद्धा या सीमाप्रश्नाबद्दल काही घडले नाही.
मनसे ह्या पक्षाने किरकोळ 'निष्फळ 'आंदोलने (उदा. सातबारा कोरा करा, जोडे मारा, कुलूप लावा, चपला घाला-चालू पडा, तोंडाला काळे फासा, बांगड्यांचा आहेर करा आदी.) न करता सीमाभागात जास्त लक्ष घालून या बाबत आपले धोरण सुस्पष्ट केले पाहीजे. पक्षाच्या ध्येय व धोरणात कोठेही या सीमाभागाबाबत उल्लेख नाही, किंवा राजसाहेब या सीमाभागातून वरीलप्रमाणे येणार्या बातम्यांबाबत बोलत नाही. याचा अर्थ त्यांचे याकडे लक्ष नाही असे नाही पण सीमाभागातल्या लोकांना धिर यावा म्हणून मनसेचे घोरण अधीक सुस्पष्ट हवे असे मला वाटते.
{मनसेचे "ध्येय आणि धोरण :- " मराठी संस्कृती विस्तार, मराठी भाषा विचार, मराठीमध्ये ज्ञानकक्षा रुंदावणे, भौतिक व सांस्कृतिक विकास करणे ह्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत.}
केवळ सीमावाद हा महाराष्ट्र कर्नाटक आहे असे नाही. बारकाईने बघीतले असता हा वाद निप्पाणी, बेळगाव, कारवार, हुब्बळी तसेच मध्यप्रदेशात बर्हाणपूर, खंडवा, गुजराथ मधला अहवा, डांग जिल्हा (जाणकार या प्रदेशां बाबत मत व्यक्त करा.) आदी भागातही होवू शकतो. वरील सर्व भागांत मराठी टक्का जास्त आहे. वरील भाग महाराष्ट्र 'स्वतंत्र' होत असतांना चुकीने इतर राज्यांत घातले गेले आहेत.
वरील ठिकाणच्या मराठी जनतेला महाराष्ट्रात आणून मराठी सीमा वाढवली पाहीजे, किमानपक्षी तेथील लोकांवर जो जो अन्याय तेथील राज्यांकडून-लोकांकडून होतो आहे तो थांबला पाहीजे असे बघितले गेले पाहीजे.
मनसेचे 'कडक' धोरण मराठी जनतेला फायद्याचे रहाणार आहे. मी तर यापुढे जावून असेही म्हणतो की जर मनसे ने सिमाभागात जर निवडणूका लढवल्या तर त्यांना जास्त फायदा होईल.
असो. या पुढील काळात ज्याची भूमी जास्त तो प्रदेश बलवान असेल असे घडेल. (हे प्रत्येक राष्ट्राबाबतीत होवू शकते व महाराष्ट्र हे एक राष्ट्रच आहे.) जास्त भुमी म्हणजे जास्त नैर्सगीक संपदा (रिसोर्स), जास्त फायदा हे साधे गणित आहे. मनसेने (किंवा कोणत्याही पक्षाने) सीमावाद संपवण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहीजे ही काळाची गरज आहे. अन्यथा प्र. के. अत्रेंचे नावपण घेण्यास आपण लायक नाहीत असे मला वाटते.
Friday, March 20, 2009
पॅपिलॉन - काही अनुत्तरीत प्रश्न
पॅपिलॉन - हे हेनरी शॅरीयर (Henri Charrière नोव्हें. १६, १९०६ ते जुलै २९, १९७३) याचे टोपण नाव.
पॅपिलॉन हे त्याने लिहीलेली आत्मकथा आहे. तो फ्रान्स मध्ये गुन्हेगारांचा 'डॉन' होता. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला न केलेल्या खुनाबद्द्ल जन्मठेपेची शिक्षेसाठी त्याला फ्रेंन्च न्यू गियाना ला हलवीण्यात आले. त्याला आपल्या प्रेमळ बायको आणि वडीलांना सोडावे लागले.
तो भक्कम शरीर असलेला आणि प्रबळ ईचछाशक्ती असणारा होता. ऊगियाना ला त्याने सुटकेसाठी पळुन जाण्याचा प्रयत्न केले. काही दिवसांनी तो पकडला गेला. या सुटकेसाठी तो अनेक मैल समुद्र प्रवास केला. अनेक हाल सोसले.त्यास एके वेळी रेड-ईंन्डीयन टोळी ने आपलेसे केले होते. दोन रेड-ईंन्डीयन भगीनी त्यास नवरा मानू लागल्या. त्या त्यापासून गर्भवती झाल्या. तो काही आता कैदी नव्हता. तो तेथे आरामात राहीला असता. पण केवळ सुड घेण्यासाठी तो ती प्रेमळ टोळी सोडतो.
पुन्हा तो पोलीसांना सापडतो. असे त्याने एकूण ९ प्रयत्न केले. अखेर तो आपली सुटका करतो आणि तो व्हेनेझुएला येथे स्थिर होतो. त्याच्या दुसर्या आत्मकथेत तो असे सांगतो की (बनकॉ -Banco)- तो तेथे अनेक व्यवसाय करतो. पण शेवटी भूकंपात ते सर्व जाते.
जुलै २९, १९७३ मध्ये तो घश्याच्या कर्करोगाने तो मरतो. त्यास फ्रान्स मध्ये दफन केले जाते।
----------------------------------------------------------------------------------------
वरील लेखन हे काही माझे पुस्तक परीक्षण नाही. ते मला पडलेल्या प्रश्नांची पार्श्वभूमी आहे.
१) सर्वात प्रथम तो सुटतो तेव्हा त्यास दोन रेड-ईंन्डीयन भगीनी बायको म्हणुन मिळतात. त्यास अगदी निस्वाथ्री प्रेम मिळ्ते. तो अगदी स्वतंत्र झालेला असतो. तो सुध्दा त्यात मानसीक रित्या गुंततो. असे असतांना तो ते सगळे का सोडतो? केवळ सुड घेण्यासाठी ? आणि बाहेर पकडले जाण्याचे चान्स खूप असतांना ? (हे त्यालाही समजते.)
२) पुढे त्रिनीनाद मधे सुध्धा तो स्थिर होतो. एका भारतीय मुलीच्या तो खुप जवळ जातो. तीच्या बापाची पण त्यांनी लग्न करावे ही ईच्छा असते. तो तेथे सुध्दा स्थिरस्थावर होवु शकला असता. पण तो तेथे टिकत नाही.
३) तो त्याच्या बापाला / प्रिय बायको ला काहीच निरोप/ पत्र का लिहीत नाही ?
४) तो फ्रान्स ला सेट्ल होण्यासाठी का प्रयत्न का करत नाही?
५) एवढे करुन त्यास व्हेनेझुएला काही मानवलेले नाही.
६) त्यास त्याच्या आत्मकथेबद्द्ल आणि निघालेल्या चित्रपटाबद्द्ल (Papillon (1973) Directed by - Franklin J. Schaffner) खुप पैसा मिळाला. पण तो पैसा काही त्याचा उद्देश नव्हता.
७) तो ज्या कारणासाठी वारंवार पळुन जायचा, (वकील, न्यायाधीश, पोलिस यांचा सुड घेण्यासाठी ) ते त्याने खरे केले का?
८) तो ज्या हालाखीतून गेला त्यास तोड नाही. पण नंतरचे शांत जिवन तो आधीच (रेड-ईंन्डीयन टोळीत)जगू शकला असता असे मला वाटते.
९) तो नंतर कधीतरी रेड-ईंन्डीयन टोळीस , त्याच्या प्रेमळ बायका /त्याना त्यापासून झालेली मूले , त्याचा फ्रान्स मधील बाप आणि प्रेमळ बायको आणि (त्याचीमूलगी ??) यांना कधीतरी भेटतो का?
१०) तो खूप भाऊक असतो. तो ईतरांच्या भावनांचा आदर करीत असे. असे असतांना त्याने त्याच्यावर प्रेम करणार्या बाप, प्रेमळ बायको, प्रेमळ रेड-ईंन्डीयन बायका, त्यांची मूले, मित्र, (किंवा at worst भारतीय मुलगी) यांवर अन्याय करत नाही का? हे सर्व आपणावर प्रेम करतात हे माहीत असूनसुध्धा?
जाणकार यावर प्रकाश टाकतील तर त्यांना आधीच धन्यवाद!
पॅपिलॉन हे त्याने लिहीलेली आत्मकथा आहे. तो फ्रान्स मध्ये गुन्हेगारांचा 'डॉन' होता. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला न केलेल्या खुनाबद्द्ल जन्मठेपेची शिक्षेसाठी त्याला फ्रेंन्च न्यू गियाना ला हलवीण्यात आले. त्याला आपल्या प्रेमळ बायको आणि वडीलांना सोडावे लागले.
तो भक्कम शरीर असलेला आणि प्रबळ ईचछाशक्ती असणारा होता. ऊगियाना ला त्याने सुटकेसाठी पळुन जाण्याचा प्रयत्न केले. काही दिवसांनी तो पकडला गेला. या सुटकेसाठी तो अनेक मैल समुद्र प्रवास केला. अनेक हाल सोसले.त्यास एके वेळी रेड-ईंन्डीयन टोळी ने आपलेसे केले होते. दोन रेड-ईंन्डीयन भगीनी त्यास नवरा मानू लागल्या. त्या त्यापासून गर्भवती झाल्या. तो काही आता कैदी नव्हता. तो तेथे आरामात राहीला असता. पण केवळ सुड घेण्यासाठी तो ती प्रेमळ टोळी सोडतो.
पुन्हा तो पोलीसांना सापडतो. असे त्याने एकूण ९ प्रयत्न केले. अखेर तो आपली सुटका करतो आणि तो व्हेनेझुएला येथे स्थिर होतो. त्याच्या दुसर्या आत्मकथेत तो असे सांगतो की (बनकॉ -Banco)- तो तेथे अनेक व्यवसाय करतो. पण शेवटी भूकंपात ते सर्व जाते.
जुलै २९, १९७३ मध्ये तो घश्याच्या कर्करोगाने तो मरतो. त्यास फ्रान्स मध्ये दफन केले जाते।
----------------------------------------------------------------------------------------
वरील लेखन हे काही माझे पुस्तक परीक्षण नाही. ते मला पडलेल्या प्रश्नांची पार्श्वभूमी आहे.
१) सर्वात प्रथम तो सुटतो तेव्हा त्यास दोन रेड-ईंन्डीयन भगीनी बायको म्हणुन मिळतात. त्यास अगदी निस्वाथ्री प्रेम मिळ्ते. तो अगदी स्वतंत्र झालेला असतो. तो सुध्दा त्यात मानसीक रित्या गुंततो. असे असतांना तो ते सगळे का सोडतो? केवळ सुड घेण्यासाठी ? आणि बाहेर पकडले जाण्याचे चान्स खूप असतांना ? (हे त्यालाही समजते.)
२) पुढे त्रिनीनाद मधे सुध्धा तो स्थिर होतो. एका भारतीय मुलीच्या तो खुप जवळ जातो. तीच्या बापाची पण त्यांनी लग्न करावे ही ईच्छा असते. तो तेथे सुध्दा स्थिरस्थावर होवु शकला असता. पण तो तेथे टिकत नाही.
३) तो त्याच्या बापाला / प्रिय बायको ला काहीच निरोप/ पत्र का लिहीत नाही ?
४) तो फ्रान्स ला सेट्ल होण्यासाठी का प्रयत्न का करत नाही?
५) एवढे करुन त्यास व्हेनेझुएला काही मानवलेले नाही.
६) त्यास त्याच्या आत्मकथेबद्द्ल आणि निघालेल्या चित्रपटाबद्द्ल (Papillon (1973) Directed by - Franklin J. Schaffner) खुप पैसा मिळाला. पण तो पैसा काही त्याचा उद्देश नव्हता.
७) तो ज्या कारणासाठी वारंवार पळुन जायचा, (वकील, न्यायाधीश, पोलिस यांचा सुड घेण्यासाठी ) ते त्याने खरे केले का?
८) तो ज्या हालाखीतून गेला त्यास तोड नाही. पण नंतरचे शांत जिवन तो आधीच (रेड-ईंन्डीयन टोळीत)जगू शकला असता असे मला वाटते.
९) तो नंतर कधीतरी रेड-ईंन्डीयन टोळीस , त्याच्या प्रेमळ बायका /त्याना त्यापासून झालेली मूले , त्याचा फ्रान्स मधील बाप आणि प्रेमळ बायको आणि (त्याचीमूलगी ??) यांना कधीतरी भेटतो का?
१०) तो खूप भाऊक असतो. तो ईतरांच्या भावनांचा आदर करीत असे. असे असतांना त्याने त्याच्यावर प्रेम करणार्या बाप, प्रेमळ बायको, प्रेमळ रेड-ईंन्डीयन बायका, त्यांची मूले, मित्र, (किंवा at worst भारतीय मुलगी) यांवर अन्याय करत नाही का? हे सर्व आपणावर प्रेम करतात हे माहीत असूनसुध्धा?
जाणकार यावर प्रकाश टाकतील तर त्यांना आधीच धन्यवाद!
Subscribe to:
Posts (Atom)