Showing posts with label माध्यमवेध. Show all posts
Showing posts with label माध्यमवेध. Show all posts

Monday, June 01, 2026

पाभे की बात क्र. १०

पाभे की बात क्र. १०  

माझ्या प्रिय मित्रांनो, नमस्कार!

पाभे की बात मधून तुम्हा सर्वांना भेटून मला खूप आनंद होतो आहे. जगातल्या सगळ्या भागातून रिल्सच्या माध्यमांतून आपल्या देशाचे नागरीक त्यांचे कलागुण दाखवत आहेत आणि ते पाहून आपल्यालाही प्रेरणा मिळत आहे. 

मितरों,

आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे. यावेळी आपल्या देशातल्या काहीच ठिकाणी उन्हाळा जाणवत आहे. उन्हाळ्यात बिअर सारखे पेय नाही. बिअर वेगवेगळ्या प्रकारात मिळते. 

मितरों, बिअर फक्त प्यायची नसते... बिअर अनुभवायची असते!

का म्हणून?

 कारण बिअर प्यायला गेल्यावर माणूस शांत होतो. शांत माणूस रागवत नाही. राग नसला की भांडण होत नाही. भांडण नसला की घरात शांती. घरात शांती असली की देशात शांती!

पेट्रोल वाचवा म्हणून मागेच सांगितलं, सोनं विकत घेऊ नका म्हणून सांगितलं... पण बिअरबद्दल काहीच बोलल्या गेलं नाही. बिअर ही राष्ट्रीय शांती अभियान आहे!

एक बिअर प्यायला गेल्यावर:

  • तणाव कमी होतो
  • भूक वाढते (म्हणजे स्वदेशी खाद्यपदार्थ खाल्ले जातात)
  • मित्र वाढतात
  • आणि सर्वात महत्वाचं — राजकारण विसरलं जातं!

मितरों, म्हणूनच मी म्हणतो — बिअर = शांती जास्त बिअर = जास्त शांती

फक्त एक सावधगिरी — दोन बिअरनंतर “विकसित विकास” दिसू लागतो, पण तीननंतर “विकसित” शब्दही विसरून जाता!

मितरों,

परीक्षेचे पेपर वितरीत करण्यासाठी आपण आता एअर फोर्स चा वापर करणार आहोत. यामुळे वेगवान पद्धतीने पेपर दिल्या जातील. इंटरनेटच्या युगात असा प्रयोग इतर देशांनी केलेला आढळत नाही. पुढे पुढे या अनुभवाचा उपयोग आपले दररोजचे वर्तमानपत्रे, पोस्ट ऑफीसातली पत्र इत्यादी देखील आपण एअर फोर्स कडून वितरीत करून घेणार आहोत. एअर फोर्स ला आपण कुरीअर पोहचवण्यासही सांगणार आहोत. यामुळे रिकामे असलेले सैन्या कामाला येईल. असेही एअर फोर्स रिकामे विमान उडवत असतात त्यामुळे इंधन नष्ट होते. या कुरीअर सर्वीस मुळे वाया जाणाऱ्या इंधनाचा उपयोग होणार आहे. 

मितरों,

गेल्या आठवड्यात National Testing Agony (NTA) यांचेकडून घेतल्या गेलेल्या एनसीईआरटी परीक्षेत सर्वर्स डाऊन झाले होते. त्यामुळे काही विद्यार्थीं नाराज झाले. पण काळजी करू नका. आता आपण ऑनलाईन परीक्षा बंद करणार आहोत. सर्व विद्यार्थी पेन आणि कागद वापरून परीक्षा देतील. कॉम्पूटरमुळे खर्च वाढत असल्याने हा कागदांचा पर्याय आपण स्विकारलेला आहे. निवडणूका मात्र बॅलेटपेपर, कागदांवर न होता ईव्हीएम मशीन वापरूनच होतील. कारण यंत्र कधीच चुकत नाही. 

मितरों,

ज्ञान वाटप अभियानांतर्गत, छप्पनगढ (गुजरात) मध्ये सुमारे ११०० ते १२०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ सुवर्णपट सापडले आहेत. आपला देश किती प्रगत आणि महान होता ते यातून दिसून येते. हे सुवर्णपट आपण फादरलॅंड या देशाला सप्रेम भेट देणार आहोत.

पुढील पाभे की बात मध्ये आणखी काही प्रेरक गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येईल.

खूप-खूप धन्यवाद. नमस्कार.

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात
 

 

Saturday, May 23, 2026

पाभे की बात नं ८

पाभे की बात नं ८

मितरों,  

आता इथेनॉलचा नवा जोर चाललाय! सरकार म्हणतंय – पेट्रोलात इथेनॉल मिक्स करा, जास्त करा, E30 पर्यंत करा, शेवटी E100 करा! म्हणजे १००% इथेनॉल. गडकरी साहेब म्हणतात, “पेट्रोल सोडा, इथेनॉल प्या... अरे म्हणजे गाडीत घाला!”  

मिटरों, मी तर लगेच माझ्या गाडीत E100 भरलं. आता गाडी चालते आहे, पण सुंगध येतोय ती देशी दारूची! शेजारचा पोलिस म्हणाला, “साहेब, हा ब्रेथ ॲनालायझर कशाला घेतलाय आम्ही? त्याचेशिवायही वास येतोय.”  

आता प्लॅन असा आहे –  
- पेट्रोल महाग? इथेनॉल घाला.  
- मायलेज कमी? म्हणजे कमी फिरा, पर्यावरण वाचवा.
- गाडी बिघडते आहे? गॅरेजमध्ये न्या. 
- गाडी बंद पडली? शेतकऱ्यांना धन्यवाद द्या, त्यांचा उसाचा रस चालवताय!  

मितरों, लवकरच गाड्या धान्यावर चालतील. फक्त एक सल्ला – E100 भरताना गाडीला “नॉन-व्हेज” स्टिकर लावा!

आणि हो, एक सांगायचे राहीले. इथेनॉल मिक्स करण्याचा धसका इराण, सौदी, रशीया, अमेरीका इत्यादी तेल पुरवठादार देशांनी घेतला आहे. आता त्यांचे हक्काचे गिर्हाईक गेले समजा. 

हा एक मास्टरस्ट्रोक आहे.  

भेपुपाकीबा त.  

#पाभे_की_बात

Friday, September 02, 2011

सुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत

(खुप दिवसांपासून माझे वरिष्ठ संपादक मला सुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत घेण्यास सांगत होते. गेल्या पंधरवड्यात एके दिवशी तिच्या सेक्रेटरी आहूजाशी फोनाफोनी करून तिची वेळ ठरवून घेतली. गेल्या आठवड्यात गोरेगावात फिल्मीस्तानमध्ये तिच्या आगामी पिच्चर 'तेरी आंखे काली काली - The Black End' याची शुटींग चालू होती. आम्हाला तिने तेथेच बोलावले. गेटवर आमचे नाव सांगीतले. स्टूडीओत अजून इतर चार पिच्चरचे शुटींग असल्याने बर्‍यापैकी गर्दी होती. आम्हास आतमध्ये सोडण्यात आले. स्पॉटवर गेलो तर करूणा कर्पूर अन वहिद कर्पूर यांच्या 'तेरे हाथमें अंगूठी हिरेकी' या गाण्याचे टेक चालू होते. एका कडव्याचे शुटींग झाल्यावर करूणाजी कपडे बदलायला मेकअप व्हॅन मध्ये आल्या तेव्हा त्यांच्याशी आम्ही बातचीत केली.)

मी: नमस्कार करूणाजी!

करूणा: नमस्ते.

मी: आठवते का? आपण 'जब वी हेट' च्या सेटवर मेटलो- आपलं- भेटलो होतो?

करूणाजी: अं...तशी मी फार विसराळू आहे. जर्दाळूही मी काजू समजून खाते कधी कधी. मग माझी आईच डायरीत पाहून सांगते की 'अगं निट चाव. आज तुला जर्दाळू दिलेत मुखशुद्धीसाठी' म्हणून. अं..... आता आठवलं... तुम्ही दै. रातकली मधून आलात ना? सेक्रेटरी आहूजा सांगत होता आज एक इंटरव्ह्यू आहे एका प्रेसवाल्याशी म्हणून.

मी: नाही हो करूणाजी. मी पा. भे. दगडफोडे 'रंगत आणि रंग' कडून आलोय.

करूणाजी: ओह सॉरी. मी विसराळू आहे सांगितलं ना! अस्सं होतं कधी कधी.

मी: काही हरकत नाही. अहो मी म्हणजे काय तुम्ही आहात काय सगळ्या लोकांनी नजरेत ठेवायला. मुलाखत सुरू करायची?

करूणाजी: ओ..येस...ऑफ कोर्स... माझ्या पुढच्या टेकमधला ड्रेसही अजून टाईट करायचा आहे. टेलरकडेच आहे तो. तोपर्यंत होवून जाईल आपले बोलणे.

मी: अच्छा. मला सांगा- 'तेरे हाथमें अंगूठी हिरेकी' या गाण्यात असे काय आहे वेगळे?

करूणाजी: 'तेरी आंखे काली काली - The Black End' या पिक्चरमध्ये वहिद अन मी शाळेपासून एकमेकांचे मित्र असतो. तो मला दहावीत असतांना मागणी घालतो फ्रेंडशीपची. त्यावेळी तो हिरेकी अंगूठी मला पहनवतो. अन मग आम्ही 'तेरे हाथमें अंगूठी हिरेकी' हे गाणं म्हणतो.

मी: अरे वा. शाळेत असतांनाच तुम्हाला हिरेकी अंगुठी मिळते तर.

करूणाजी: हो. यापुढे तर गाणं झाल्यावर आम्ही दोघं उटीला जातो. शालेय सहलीला. मजा करतो तेथे. एकुणच शाळा अन कॉलेजजिवनावर हा पिक्चर आहे.

मी: तुम्ही एका हॉलीवूड पिक्चरमध्येही काम करताय म्हणे?

करूणाजी: हो. तो एक नायजेरीय ड्रगस्मगलींवरचा पिक्चर आहे. थोडा सस्पेंस आहे. मी तेथील विमानतळावरची पोलीस ऑफिसर आहे. अन एका नायजेरीयन ड्रगसप्लाय टोळीचा मी पर्दाफाश करते असे कथानक आहे. बघाच तुम्ही. माझी भुमीका छोटीशीच आहे. मी टोळीतल्या एका सदस्याची कपडे काढून अंगझडती घेते अशी हटके भुमीका आहे.

मी: तुम्ही काही अ‍ॅडही करत आहात सध्या?

करूणाजी: मध्यंतरी मी बंद केले होते अ‍ॅड करणे. माझ्या हातात तेव्हा एकावेळी ८ पिक्चर होते. आता दोन पिक्चर आहेत मोठ्या बॅनरचे. वेळ नाही मिळत म्हणून अ‍ॅड न करणे चांगले दिसत नाही. मी एका शँपूची अन एका टुथब्रशची अ‍ॅड करते आहे.

मी: तुमची अ‍ॅड 'घरमेंही कपडे सिलाओ' या टॅगलाईनची शिलाईमशीनची अ‍ॅड खुपच गाजते आहे.

करूणाजी: खरे आहे. त्याची तर खुपच गंमत झाली. त्या शिलाईमशीनच्या अ‍ॅडच्यावेळी मला कपडेच नव्हते. म्हणजे तयार नव्हते. मग मीच शुटींगच्या वेळचे शिलाईमशीन वापरून माझ्या स्कर्टचा मॅक्रो स्कर्ट करून घेतला. म्हणजे स्कर्टवर टिपा टेलरनेच टाकल्या पण आयडीया माझीच होती.

मी: वा वा. छानच. म्हणजे तुम्ही ड्रेस डिझायनरपण झाल्यात तर.

करूणाजी: गंमतच आहे ती सगळी.

मी: तुम्ही एका पिक्चरसाठी वजनही वाढवता आहेत म्हणे?

करूणाजी: अहो, राज श्रीचे एक पिक्चर येते आहे- 'मेरे साथ सनम है - The True Love'. त्यात मी डबल रोल करते आहे. त्यात जुळ्या बहीणी दाखवल्या आहोत. एका रोलसाठी वजन कमी तर एकासाठी वजन जास्त अशी रिक्वायर्मेंट होती. वजन कमी असलेल्या बहीणीचं शुटींग संपलेले आहे. आता मी म्हणूनच वजन वाढवते आहे. त्यात मला माझे वजन ५० किलो करायचे आहे. कमी वजन असलेल्या बहिणीसाठी माझे एकुण वजन मी ३० किलो केले होते.

मी: त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागत असणार ना?

करूणाजी: हो तर. कमी वजनासाठी मी दोन दिवसांत १ चपाती खायचे. थोडा भात सकाळी. रात्री फक्त एक सफरचंद खायचे. माझी आई तर म्हणायची की, 'अग बाई दिड सफरचंद तरी खा'. त्या वेळी मी रोज दोन तास सकाळी व दोन तास सायंकाळी अ‍ॅरोबिक्स करायचे, सायकलींग करायचे.
आता वजन वाढवण्यासाठी मी जास्त खाते. रोज सकाळी एक चपाती व सायंकाळी थोडा भात हे माझे जेवण आहे.

मी: तुमची एखादी शुटींगमधली कडू आठवण सांगा ना.

करूणाजी: एकदा आम्ही नॉर्वेला शुटींग करत होतो. अचानक बर्फ पडू लागले. मग मी अन वहिद दोघेच एका हॉटेलमध्ये एका रुममध्ये राहीलो. माझ्या रूममध्ये कोणीतरी असण्याचा पहीलाच प्रसंग होता. हॉटेलमध्ये खायलाही काहीच नव्हते. मलातर चिकन अन सुप अन चायनीज कॉन्टींनेंटल व ईटालीयनच खावे लागले. अन एकच बेड शेअर करावा लागला. वहिद होता म्हणून मला खुप चांगले वाटले. तो खुपच जोक करतो. एकदम मजाकीया स्वभाव आहे त्याचा. तो नसता तर काय झाले असते असे वाटून मला रडू येते.

मी: तुम्हाला मुंबईत रहायला आवडते का? तुम्ही सध्या राहता कोठे?

करूणाजी: मुंबईत रहायला खुपच आवडते. पाली हिलवर माझा ५००० स्क्वेअरचा ब्लॉक घेतला आहे
नविन. तसा छोटाच आहे. पण आवडतो.

मी: तुमची आवडती कार कोणती?

करूणाजी: बिएम्डब्लू- नॅनो ही माझी आवडती कार आहे. मला वेगात पळणार्‍या गाड्या आवडतात.

मी: तुमची आवडती डीश कोणती?

करूणाजी: मला फ्राँझ खुप म्हणजे खुपच आवडतात.

मी: तुमचा ड्रेसचा आवडता रंग कोणता?

करूणाजी: मला लाल रंगाचा ड्रेस आवडतो.

मी: शुटींगमधली अविस्मरणीय आठवण सांगा ना.

करूणाजी: मागे एका पिक्चरमध्ये मी मेकअप न करता शुटींग केले होते.सतत एक तास, तीन मिनीटे मी मेकअप विना होते. तसेच एका पिक्चरमध्ये मी पुर्ण जेवण करण्याचा सीन खराखूरा केला होता. डमी न वापरता मी जेवणाची पुर्ण थाळी संपवली होती. तसे मी कधीच १ चपाती खात नाही. पण त्यावेळी मात्र मी पुर्ण २ चपात्या अन थोडा भात संपवला होता.

मी: तुमचा देवावर विश्वास आहे का?

करूणाजी: ऑफ कोर्स आहे. तसे मी शिवजींना मानते. झालंच तर पार्वतीदेवींनाही पुजते.

(तेवढ्यात स्पॉट बॉय शॉट रेडी आहे हे सांगायला आला)

मी: जाता जाता तुम्ही आमच्या वाचकांना काय सांगाल?

करूणाजी: मी काय सांगणार? अहो माझे पिक्चर बघा हेच की! तरीही सांगते की कुल वागा.

मी: एक विनंती करतो. दोन एक फोटो मिळाले तर घेवू का?

करूणाजी: ओह! एवढेच ना? घ्या की.
(मी मग तिनचार फोटो घेतो.)

मी: चला पुन्हा भेटू या! नमस्ते.

करूणाजी: नमस्ते!

करूणाजींची आवडः
जेवणात: ग्रीन पीज सुप
आवडता प्राणी: कुत्रा
आवडता पक्षी: मोर
आवडते शहरः दिल्ली

Tuesday, March 30, 2010

विहीर: खोल अन गुढ अंधारी, काळीकुट्ट, सगळ्यांना कवेत घेणारी

नुकतीच विहीर (थेटरात) 'पाहीली'.

'वळू' चीच बरीचशी टिम यात आहे. कथा दोन मावस भावांमधील आहे. पुण्याचा समिर (मदन देवधर) अन गावाकडचा नचिकेत (आलोक राजवाडे). सम्या आपल्या नचादादावर फार प्रेम करतो. प्रत्रांमधूनही संवाद साधत असतो. दोघेही संवेदनशील आहेत. सम्या त्याच्या आई, बहिणीबरोबर त्याच्या मावशीच्या लग्नासाठी नच्याच्या घरी, गावी येतात. वाड्यात खेळतात. विहीरीत पोहतात. सम्या पट्टीचा पोहणारा असतो तर नचादादा सांगड लावून पोहोतो.

नचादादा गुढ बोलतो. त्याचा जीव नेहमीच्या वातावरणात गुदमरतो. त्याला त्याच्या पलीकडे कोठेतरी दुर निघून जायचे असते. गायब, अद्रूष्य व्हायचे असते. तसे तो सम्याला बोलूनही दाखवतो. समिरला नचादादाला पुण्याला शिकायला आणायचे असते. तो त्याच्या आईला तसे सांगतो. नचादादालाही आग्रह करतो. नचादादा प्रतिसाद देत नाही. सम्याला त्याचा फार राग येतो. तो त्याच्याशी संवाद साधत नाही. पण मनातून त्याच्याशी नचादादाच बोलेल अन नचादादाला सम्याच त्याच्याशी बोलेल असे वाटते. सम्या पोहोण्याच्या स्पर्धेसाठी शहरात येतो. सम्या स्पर्धेहून परत येतेवेळी नचादादाचा विहीरीत मृत्यू झालेला असतो. त्याच्या मामाला त्याने (मामाने) नचादादाला सांगड ढिली बांधल्याची खंत जाणवते. सम्याला नचादादा गेल्याचे काही पटत नाही. तशातच त्याच्या मावशीचे लग्न लागते. तो कुटूंबासह पुण्यास येतो. तरीही वारंवार सम्या नचादादाचा विचार करतो. त्याचे अस्तित्व त्याला नेहमी जाणवत राहते. कुटूंबातील इतर जण कुणी गेल्यानंतर आपले नेहमीचे व्यवहार कसे करू शकतात याचे त्याला कोडे पडते.
नचादादाच्या परिक्षेचा निकाल लागल्यानंतर तो पेढे वाटून आनंदही व्यक्त करतो.
शेवटी एक दिवस तो नचादादाला शोधण्यासाठी घराबाहेर पडतो. त्याला नचादादाला केवळ एकदाका होईना भेटायचे असते. एकदोन दिवस भटकल्यानंतर त्याला एक मेंढपाळ (विठ्ठ्ल उमप) भेटतो. तो त्याला जीवनाचे तत्वज्ञान सांगतो. त्यानंतर सम्या पुन्हा गावी जातो. तो मनापासून नचादादाला हाक मारतो. त्याच वेळी नचादादा त्याला विहीरीच्या काठावर दिसतो. शेवटी हा सगळा भास असतो. सम्या पुन्हा नेहमीचे जगणे जगतो का हे त्याने प्रेक्षकांवर सोडलेले आहे.

बाकी चित्रपटातील तंत्राबद्दल, दिग्दर्शनाबद्दल, कलाकारांबद्दल बोलावे तितके थोडेच आहे.

असा हा चित्रपट पाहिल्यानंतर सम्याबद्दल खुपच कणव निर्माण झाली. एकीकडे त्याच्या भावनांशी आपण एकरूप होवू पाहतो तर त्याच वेळी अनेक अनुत्तरीत प्रश्न तो सोडून जातो.

मला चित्रपटातील काही बाबी समजल्या नाहीत. मेंढपाळ अन सम्यातले संवाद फारच कमी आहेत.
१) मेंढपाळाचं जीव असलेलं व हरवलेलं कोकरू त्याला कोणत्या शक्तीने परत मिळते? तिच शक्ती तो सम्याला कशी काय देतो? (या ठिकाणी मी जेथे चित्रपट पाहीला तेथे तो कापलेला वाटला. आत्ताच्या डिजीटल चित्रपट दाखविण्याच्या तंत्रात चित्रपट कापता येतो का?)
२)सम्याला विहीरीवर नचादादा परत भेटतो, ते दोघे परत फोहोतात. सम्याला तसा भास का होतो?
३)नचादादा पुर्ण चित्रपटभर हातात दांडकं घेवून का वावरतो?
४)पुर्ण चित्रपट समिर नचादादाचा असतांना गावातील घरातील काही दृष्यांमध्ये खुपच बारकाई का दाखविली? (जसे सम्याची आई दळण कांडतांनाचे संवाद) जे न दाखवले असते तरी चित्रपटात काही अडथळा नसता आला. मान्य आहे की बारकाईच्या द्रूष्यांत दिग्दर्शनाचे अंग आहे पण त्याचा कथेशी काही संबंध नसल्यासारखा वाटतो.
५) सम्या नच्याला शोधण्यासाठी २/३ दिवस फिरल्यानंतरही त्याच्या अंगावरची बंडी एकदम कोरी करकरीत कडक इस्त्रीची दिसते. नचादादाच्याही शर्टाची इस्त्री बर्‍याच द्रूष्यांत नजरेला टोचते.
६) विहीर च्या ऑफिशीयल संस्थळावर हे लिहीले आहे:
"Samir’s search leads him towards the experience of oneness where he can unite with Nachiket again!"
समिर एकटा पडूनही तो नचिकेत शी (किंवा त्याच्या भासमान अस्तित्वाशी) कसा एकरूप होतो? तो पुढील आयुष्य सरळ जगतो का?

काहीही असो. चित्रपट पाहून बाहेर आल्यावर हातात काही लागलं नाही तरीही जे हातात आलं नाही ते शोधण्यासाठी मेंदूने विचार जरूर केला. यातच हा चित्रपट करणार्‍यांचं यश आहे.(माझा पुण्यातील एक लांबचा भाऊ अगदी समिरसारखा दिसतो. न कळत त्याच्याशी रिलेट होत गेलो. गावी जाण्याची हुरहूर, बरोबरीचे भाऊ भेटण्याची ओढ अनुभवलेली असल्याने हा आपलाच चित्रपट आहे असे जाणवले.)

समिरच्या मनातील द्वंद, प्रश्न, संभ्रम आपले होवून जातात.

चित्रपट संपल्यानंतर बर्‍याच जणांच्या तोंडून "च्यायला, काय समजलं नाय बुवा" असे उद्गार एकण्यात आले. तशीच परिस्थीती माझीही होती. पण ते न कबूल करायची मध्यमवर्गीय मनस्थिती माझीच होती. एवढा अंतराष्ट्रीय स्तरावरचा गाजलेला हा चित्रपट आपल्याला समजला नाही आपला कमीपणा की हेच त्या चित्रपटाचे यश? खरेच विहीर फारच खोल अन गुढ आहे, अंधारी, काळीकुट्ट, खोल खोल, सगळ्यांना कवेत घेणारी.

विहीर:
दिग्दर्शक - उमेश कुलकर्णी, कथा-पटकथा - गिरीश कुलकर्णी, सती भावे
छायालेखन - सुधीर पलसाने, संकलन - नीरज वोरालिया, संगीत - मंगेश धाकडे
कलावंत - मदन देवधर, आलोक राजवाडे, रेणुका दप्तरदार, डॉ. मोहन आगाशे, ज्योती सुभाष, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, सुलभा देशपांडे आणि अन्य.

अवांतर: एबी कॉर्प निर्मित जरी ही विहीर असली तरी सगळी छाप ही मराठीच आहे. अमीताभ ने काही ढवळाढवळ केलेली दिसत नाही. (की केवळ मराठीच्या तथाकथित प्रेमापोटी झाले? काहीही असो. एक चांगली कलाकृतीची निर्मीती झाली हे नक्की. मराठीचा झेंडा असाच उत्तरोउत्तर उंच जावो अन विहीर सारखे विचार करायला लावणारे चित्रपट निर्माण होवो याच अपेक्षा.)

कुणास हा चित्रपट पुर्ण समजला असेल, किंवा काही वेगळा अर्थ जाणवत असेल तर सांगा.

Wednesday, October 28, 2009

वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९

वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९

* हि तारीख ०९ सप्टेंबर २००९ ला, उद्या येते आहे. हा वर्षाचा २५२ वा दिवस आहे. २५२ च्या आकड्यांतली बेरीज ९ येते आणि ०९/०९/०९ ची बेरीज = ९+९+९=२७=९ !
* ०९/०९/०९ ही तारीख १००१ वर्षातली तसेच शेवटची एकेरी तारीख आहे.
* हि तारीख सप्टेंबर च्या बुधवारी येते. ईंग्रजीत सप्टेंबर व बुधवार या स्पेलींगमध्ये (September व Wednesday) ९च अक्षरे आहेत.

आधार : अर्थातच, आंतरजाळ

Friday, March 20, 2009

पॅपिलॉन - काही अनुत्तरीत प्रश्न

पॅपिलॉन - हे हेनरी शॅरीयर (Henri Charrière नोव्हें. १६, १९०६ ते जुलै २९, १९७३) याचे टोपण नाव.
पॅपिलॉन हे त्याने लिहीलेली आत्मकथा आहे. तो फ्रान्स मध्ये गुन्हेगारांचा 'डॉन' होता. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला न केलेल्या खुनाबद्द्ल जन्मठेपेची शिक्षेसाठी त्याला फ्रेंन्च न्यू गियाना ला हलवीण्यात आले. त्याला आपल्या प्रेमळ बायको आणि वडीलांना सोडावे लागले.
तो भक्कम शरीर असलेला आणि प्रबळ ईचछाशक्ती असणारा होता. ऊगियाना ला त्याने सुटकेसाठी पळुन जाण्याचा प्रयत्न केले. काही दिवसांनी तो पकडला गेला. या सुटकेसाठी तो अनेक मैल समुद्र प्रवास केला. अनेक हाल सोसले.त्यास एके वेळी रेड-ईंन्डीयन टोळी ने आपलेसे केले होते. दोन रेड-ईंन्डीयन भगीनी त्यास नवरा मानू लागल्या. त्या त्यापासून गर्भवती झाल्या. तो काही आता कैदी नव्हता. तो तेथे आरामात राहीला असता. पण केवळ सुड घेण्यासाठी तो ती प्रेमळ टोळी सोडतो.
पुन्हा तो पोलीसांना सापडतो. असे त्याने एकूण ९ प्रयत्न केले. अखेर तो आपली सुटका करतो आणि तो व्हेनेझुएला येथे स्थिर होतो. त्याच्या दुसर्‍या आत्मकथेत तो असे सांगतो की (बनकॉ -Banco)- तो तेथे अनेक व्यवसाय करतो. पण शेवटी भूकंपात ते सर्व जाते.
जुलै २९, १९७३ मध्ये तो घश्याच्या कर्करोगाने तो मरतो. त्यास फ्रान्स मध्ये दफन केले जाते।
----------------------------------------------------------------------------------------
वरील लेखन हे काही माझे पुस्तक परीक्षण नाही. ते मला पडलेल्या प्रश्नांची पार्‍श्वभूमी आहे.
१) सर्वात प्रथम तो सुटतो तेव्हा त्यास दोन रेड-ईंन्डीयन भगीनी बायको म्हणुन मिळतात. त्यास अगदी निस्वाथ्री प्रेम मिळ्ते. तो अगदी स्वतंत्र झालेला असतो. तो सुध्दा त्यात मानसीक रित्या गुंततो. असे असतांना तो ते सगळे का सोडतो? केवळ सुड घेण्यासाठी ? आणि बाहेर पकडले जाण्याचे चान्स खूप असतांना ? (हे त्यालाही समजते.)
२) पुढे त्रिनीनाद मधे सुध्धा तो स्थिर होतो. एका भारतीय मुलीच्या तो खुप जवळ जातो. तीच्या बापाची पण त्यांनी लग्न करावे ही ईच्छा असते. तो तेथे सुध्दा स्थिरस्थावर होवु शकला असता. पण तो तेथे टिकत नाही.
३) तो त्याच्या बापाला / प्रिय बायको ला काहीच निरोप/ पत्र का लिहीत नाही ?
४) तो फ्रान्स ला सेट्ल होण्यासाठी का प्रयत्न का करत नाही?
५) एवढे करुन त्यास व्हेनेझुएला काही मानवलेले नाही.
६) त्यास त्याच्या आत्मकथेबद्द्ल आणि निघालेल्या चित्रपटाबद्द्ल (Papillon (1973) Directed by - Franklin J. Schaffner) खुप पैसा मिळाला. पण तो पैसा काही त्याचा उद्देश नव्हता.
७) तो ज्या कारणासाठी वारंवार पळुन जायचा, (वकील, न्यायाधीश, पोलिस यांचा सुड घेण्यासाठी ) ते त्याने खरे केले का?
८) तो ज्या हालाखीतून गेला त्यास तोड नाही. पण नंतरचे शांत जिवन तो आधीच (रेड-ईंन्डीयन टोळीत)जगू शकला असता असे मला वाटते.
९) तो नंतर कधीतरी रेड-ईंन्डीयन टोळीस , त्याच्या प्रेमळ बायका /त्याना त्यापासून झालेली मूले , त्याचा फ्रान्स मधील बाप आणि प्रेमळ बायको आणि (त्याचीमूलगी ??) यांना कधीतरी भेटतो का?
१०) तो खूप भाऊक असतो. तो ईतरांच्या भावनांचा आदर करीत असे. असे असतांना त्याने त्याच्यावर प्रेम करणार्‍या बाप, प्रेमळ बायको, प्रेमळ रेड-ईंन्डीयन बायका, त्यांची मूले, मित्र, (किंवा at worst भारतीय मुलगी) यांवर अन्याय करत नाही का? हे सर्व आपणावर प्रेम करतात हे माहीत असूनसुध्धा?
जाणकार यावर प्रकाश टाकतील तर त्यांना आधीच धन्यवाद!