Tuesday, June 02, 2026

🏟 पुण्याच्या भेटीचे वर्णन ✈

 🏟 पुण्याच्या भेटीचे वर्णन ✈

नुकतीच मी👩 भारतात आले होते. मला सुटी उशीरा मिळाल्याने एकटीने प्रवास केला. आमचे हे👨 आधीच पोहोचले होते. सध्याला हिंजवडीतल्या त्यांच्या कंपनीत🏛 ते वर्क💻 फॉम होम करत होते. हे काम संपवून आम्ही सगळे परत अमेरीकेत🏡 परतणार आहोत. 

पुण्यातल्या त्यांच्या पेठेतल्या घरी🏙 म्हणजे माझ्या सासरी मला जास्त राहण्याची सवय नाही. मी आपली माझ्या माहेरीच - कोरेगाव पार्कातल्या घरी🏙 उतरले. दोन दिवसांनंतर यांना अधीक महिन्याचे वाण🎁 घ्यायला बोलवले. वाण सामानात सगळ्या वस्तू जिथल्या तिथे केल्या. तयार अनारसे🥮🍥 तर अगदी घरच्यासारखे जाळीदार होते. जावयाचे वाण म्हणून अडीच तोळ्याची अंगठी💍, कपडे👔🧥👕👖 आणि रोख १० हजार💵💶 दिले. 

पुण्यात सध्या खूप उन☀🌡आहे. आमच्याकडे तिकडे उन जास्त⛅ लागत नाही म्हणून मला उन्हाची सवय💇‍♀️ नाही. गेल्या शनिवारी विमाननगरमधल्या फिनीक्स मॉल🏬 मध्ये मस्त शॉपींग🎁🎀🎟🎞🎫🎡🎠🛒👕🕶👓👗👛👜👝🛍👞👠👡👒केली. सध्या आंब्याचा🥭सिजन सुरू असल्याने आंब्याच्या🥭फ्लेवरचे आईसक्रीम🍨🍦 खाल्ले. कोकम सरबत, कैरीचे पन्हे, ताक इत्यादीचा आस्वाद घेतला. एक छानसा मुवी🎞🎟🎫🎟🎵🎶🎬🎥📽 बघितला. पेट्रोलसाठी⛽रांगा🚗🚓🚕🛺🚙🚌🚐🚑🚒🚚🚛🚜🚘🚔🚖🚍🛵🏍 वगैरे लागलेल्या दिसल्या नाहीत. 

दुसऱ्या दिवशी मैत्रीणींना👩👩‍🦰👩‍🦱🙋‍♀️ फोन📱 करून लक्ष्मी रोडला😍 फिरलो. साड्या🥻🥻🥻 घेतल्या. तुळशीबागेत खरेदी🎁🎀🧶🧵🛒👚👝🛍 केली. 

आता पुण्यात खूप ट्राफीक🏍🛵🏍🛵🚚🚒🚐🚌🚙🛺🛺🛺🛺🛺🛺🚗🚗🚗🚗लागते आहे. पूर्वीचे शांत😑😑 पुणे दिसले नाही. जेथे तेथे नवे रस्ते, उड्डाणपुलांचे बांधकाम🏟🏚🏠🏡⛪🏙🛕🛕🕌🕋🏢🏢🏢🏢🏣 अन रहदारी दिसली. 

पुढच्या आठवड्यातले विमानाचे✈तिकीट बुक झाले आहे. आता परतण्याचे वेध लागले आहे.   

- लेखिका: अरूंधती नेटवाडेकर (सहस्त्रधारकर), (क्वीन्स, न्युयॉर्क) @arundhati_n2007

Monday, June 01, 2026

जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे

जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे

वंदन करूया स्वतंत्र भुमातेचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||ध्रृ||
 
येथे लढल्या कितीक लढाया
भाले फेकले तलवारी परजल्या
अटकेपार झेंडे रोवूनी
शौर्य गाजले मराठी रक्ताचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||१||
 
वेरूळ अजिंठा कार्ला लेणी
दगडी सौंदर्य वसले या ठाणी
किल्ले शिवरायांचे भक्कम दुर्गम
जलदुर्गही रक्षण करीती देशाचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||२||
 
धोंडे केशव भाऊराव टिळक सावरकर
ताराराणी ताराबाई फुले शाहू आंबेडकर
रानडे दादासाहेब यशवंतराव
साने गोखले आण्णाभाऊ नाना पाटील
जिजाऊ अहिल्याबाई दुर्गाबाई सिंधूताई
असे धुरीण जन्मले कौतूक कितीक यांचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||३||
 
येथे आहे संतांची पावन परंपरा
ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष खरा
भक्तीच्या रंगात न्हाली ही धरती
गुंजती अभंग स्वर भक्तीमय सुरांचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||४||
 
सह्याद्री उभा हा कणखर अभिमानी
नद्या वाहती जणू अमृताचे पाणी
शेतात डोलती सोनरी पिके
वैभव खुलते या समृद्ध मातीचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||५||
 
पश्चिमेस सागरकिनारा, कोकण हिरवागार
पूर्वेला विदर्भभूमी समृद्धीचा भंडार
उत्तरेस खानदेशी कष्टाची असे कास
दक्षिणेस सह्याद्री उभा भूषण देशाचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||६||
 
कला संस्कृती यांचा गंध न्यारा
लावणी पोवाडा भारुडाचा झंकारा
ज्ञान-विज्ञानाच्या तेजाने उजळुनी
नाव झळकले मराठी जनांचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||७||
 
हरपले किती भूभाग सीमांच्या वाटेचे
जपले स्वप्न अजुनी एकीच्या लढ्याचे
मराठी मनांत धग संयुक्ततेची
पूर्ण होवो स्वप्न अखंड महाराष्ट्राचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||८||
 
एकीच्या बळावर पुढती जाऊ
महाराष्ट्र भूमीचा गौरव वाढवू
जय जय महाराष्ट्र नाद घुमू दे
वंदन करूया पवित्र मातृभूमीचे
जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||९||

पाभे की बात क्र. १०

पाभे की बात क्र. १०  

माझ्या प्रिय मित्रांनो, नमस्कार!

पाभे की बात मधून तुम्हा सर्वांना भेटून मला खूप आनंद होतो आहे. जगातल्या सगळ्या भागातून रिल्सच्या माध्यमांतून आपल्या देशाचे नागरीक त्यांचे कलागुण दाखवत आहेत आणि ते पाहून आपल्यालाही प्रेरणा मिळत आहे. 

मितरों,

आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे. यावेळी आपल्या देशातल्या काहीच ठिकाणी उन्हाळा जाणवत आहे. उन्हाळ्यात बिअर सारखे पेय नाही. बिअर वेगवेगळ्या प्रकारात मिळते. 

मितरों, बिअर फक्त प्यायची नसते... बिअर अनुभवायची असते!

का म्हणून?

 कारण बिअर प्यायला गेल्यावर माणूस शांत होतो. शांत माणूस रागवत नाही. राग नसला की भांडण होत नाही. भांडण नसला की घरात शांती. घरात शांती असली की देशात शांती!

पेट्रोल वाचवा म्हणून मागेच सांगितलं, सोनं विकत घेऊ नका म्हणून सांगितलं... पण बिअरबद्दल काहीच बोलल्या गेलं नाही. बिअर ही राष्ट्रीय शांती अभियान आहे!

एक बिअर प्यायला गेल्यावर:

  • तणाव कमी होतो
  • भूक वाढते (म्हणजे स्वदेशी खाद्यपदार्थ खाल्ले जातात)
  • मित्र वाढतात
  • आणि सर्वात महत्वाचं — राजकारण विसरलं जातं!

मितरों, म्हणूनच मी म्हणतो — बिअर = शांती जास्त बिअर = जास्त शांती

फक्त एक सावधगिरी — दोन बिअरनंतर “विकसित विकास” दिसू लागतो, पण तीननंतर “विकसित” शब्दही विसरून जाता!

मितरों,

परीक्षेचे पेपर वितरीत करण्यासाठी आपण आता एअर फोर्स चा वापर करणार आहोत. यामुळे वेगवान पद्धतीने पेपर दिल्या जातील. इंटरनेटच्या युगात असा प्रयोग इतर देशांनी केलेला आढळत नाही. पुढे पुढे या अनुभवाचा उपयोग आपले दररोजचे वर्तमानपत्रे, पोस्ट ऑफीसातली पत्र इत्यादी देखील आपण एअर फोर्स कडून वितरीत करून घेणार आहोत. एअर फोर्स ला आपण कुरीअर पोहचवण्यासही सांगणार आहोत. यामुळे रिकामे असलेले सैन्या कामाला येईल. असेही एअर फोर्स रिकामे विमान उडवत असतात त्यामुळे इंधन नष्ट होते. या कुरीअर सर्वीस मुळे वाया जाणाऱ्या इंधनाचा उपयोग होणार आहे. 

मितरों,

गेल्या आठवड्यात National Testing Agony (NTA) यांचेकडून घेतल्या गेलेल्या एनसीईआरटी परीक्षेत सर्वर्स डाऊन झाले होते. त्यामुळे काही विद्यार्थीं नाराज झाले. पण काळजी करू नका. आता आपण ऑनलाईन परीक्षा बंद करणार आहोत. सर्व विद्यार्थी पेन आणि कागद वापरून परीक्षा देतील. कॉम्पूटरमुळे खर्च वाढत असल्याने हा कागदांचा पर्याय आपण स्विकारलेला आहे. निवडणूका मात्र बॅलेटपेपर, कागदांवर न होता ईव्हीएम मशीन वापरूनच होतील. कारण यंत्र कधीच चुकत नाही. 

मितरों,

ज्ञान वाटप अभियानांतर्गत, छप्पनगढ (गुजरात) मध्ये सुमारे ११०० ते १२०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ सुवर्णपट सापडले आहेत. आपला देश किती प्रगत आणि महान होता ते यातून दिसून येते. हे सुवर्णपट आपण फादरलॅंड या देशाला सप्रेम भेट देणार आहोत.

पुढील पाभे की बात मध्ये आणखी काही प्रेरक गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येईल.

खूप-खूप धन्यवाद. नमस्कार.

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात
 

 

पाभे की बात क्र. ९

पाभे की बात क्र. ९

जनगणना २०२६-२७ साठी सरकारने साहित्य दिलंय ते बघितलं का?

टोपी लहान मुलांच्या डोक्याची, मोठ्या शिक्षकांच्या डोक्यावर बसत नाही. पिशवी पहिल्या दिवशीच चेन तुटते. शार्पनर पेन्सिलला टोक लावायच्या आतच तुटतो. पेन आणि मार्कर उठतच नाहीत.  एरीयाच्या झेरॉक्स एकच मिळेल. आपसात झेरॉक्स करून घ्या. कार्यक्षेत्र २० किमी दूर असेल. दोन क्षेत्र असेल तर त्यात ६, ८ किमी अंतर असेल. सगळं सामान अशा अतिशय उत्कृष्ट दर्जाचं.
----------------------------------------------------------------
मितरों,

“माझ्या प्रिय देशवासीयांनो,


आम्ही जाणूनबुजून हे साहित्य दिलं आहे. कारण आता काटकसर हा नवीन मंत्र आहे. टोपी छोटी दिली म्हणजे डोकं छोटं ठेवा, विचार छोटे करा. पिशवी कमकुवत दिली म्हणजे जास्त सामान नको, फक्त काम करा. पेन खराब दिला म्हणजे जास्त लिहू नका, फक्त नंबर लिहा.

२५० घरे असतील तेथे ५०० ते ६०० घरे दिली आहेत जेणे करून तुम्हाला उन्हात फिरण्याची सवय लागेल.

आम्ही जगातील सर्वात मोठी जनगणना करतोय, पण स्वस्तात! यालाच म्हणतात आत्मनिर्भर जनगणना.

मितरों, आता समजलं ना? मोठी योजना, छोटं साहित्य!”

भेपुपाकीबा त.


#पाभे_की_बात