Showing posts with label Comedy Story. Show all posts
Showing posts with label Comedy Story. Show all posts

Monday, June 28, 2021

आमचीबी आंटी जन टेस

आमचीबी आंटी जन टेस

गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं.
त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला.

या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

तर मलाबी वाटलं की आपलीबी करून घ्यावी आंटी जन टेस. आंटी जन टेसला काय काय करावं आसं कोनाला तरी विचारावं आसं वाटत व्हतं. कारन, आंटीपर्यंत ठिक हाय पन जन म्हणजे जनता. आता ती आंटी आन मी, समद्या जनांसमोर काय आन कसं करनार आसा मला प्रेश्न पडला. कोनाला विचारायचीबी लय लाज वाटत व्हती. जनांसमोर काय झालं तर गावात त्वांड दाखवायला जागा नव्हती. सगळे सगे सोयरे गावातच. तसं झालं तर कायम तोंडाला पट्टी लावावी लागणार आशी भिती मनात आली. पन आंटी काय करनार, ती कशी आसंल, ती काय काय देईल, न देईल या विचारानं रात्रीची झोपबी येईना झाली.

संज्या आन राम्या तसं आंटी टेस करून आल्यालं व्हतं, पन त्यांना विचारावं म्हंजे आगीत हात घालन्यासारखं व्हतं. आन संज्या तर माझी हिरॉईन करीनाच्या शेजारीच राहतो. भाड्या मुद्दाम माझ्यासमोर तिचं खरं नाव करूना मोठ्यानं बोलत राहतो. माला सांगा, कोरूनाच्या काळात आसं चिडवनं बरं हाय का? ऊस जळलं त्याच्या वावरातला अशानं. कांदा करपलं उन्हाळ्यातला त्याचा.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

मनाचा हिय्या करून लालचंद मारवाड्याच्या दुकानातून मुद्दाम वीस किलो तांदूळ घेतांना या आंटी जन टेसची थोडी माहीती काढली. त्ये म्हनलं की, आधार कार्ड घेवून जा आन लायनीत थांब. नंबर आला की आंटी टेस व्हईल.

आता या आंटी जन टेसला आधार कार्ड नंबर देऊन लायनीत थांबायचं म्हनजे लई काळजी वाटू लागली. आंटीनं आधार नंबर कुनाला दिला आन त्ये आपल्या घरी पत्ता काढत आलं म्हणजे? आंटीनं काय काळाबाजार केला तर काय आशी चिंता मनाला लागून राहीली.

धडगत करून आरोग्य शेंटरला गाडी लावली. सकाळी गेलेलो. बाहेर धा बारा जनांची लाईन व्हती. वळखीचं कुनीच नव्हतं हे बरं होतं. मधी आसलेली आंटी जन, लोकांना कवा भेटल आसं वाटत व्हतं. एकानं आधार नंबर घेतला. नाव बीव लिहून घेतलं. एक आडूसा होता. तिथंच आंटी आसल, अन जन, लोकं तिथंच तिला भेटत आसतील आसं वाटलं. एवढ्या गर्दीत आंटीला भेटनं काय बराबर वाटंना. पन एकदा का व्हईना भेट झाली म्हंजे आपलं गाडं पुढं रेटता येईल आसा विचार मनात आला.

माझ्यावाला लंबर आला आन मी आडूशामागे गेलो. तवा आंटी बिंटी काय दिसली नाय.

तिथं दवाखान्यासारखं मांडलेलं व्हतं अन एक नर्स व्हती. मंग त्या पोरीनंच नाकात कायतरी खुपासलं. आन जा म्हनाली.

लय फसगत झाली राव. द्राक्षे काढणीला यावे आन पाऊस पडून सगळा माल बेचीराख व्हावा, अगदी पावडरी मारायलाबी येळ मिळू नये आसं झालं. आसं कुठं आसतंय व्हय?

आशी झाली आमच्यावाली आंटी जन टेस.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

- पाषाणभेद
२६/०४/२०२१

Saturday, January 18, 2020

हॉटेल शिवीभोजन थाळी

हॉटेल शिवीभोजन थाळी

मालक: हॅ हॅ हॅ.

मालक: सोन्या, नालायका बघ रे, गिर्‍हाईक आलं.
हॅ हॅ हॅ या या या.
बसा बसा बसा.

मालक: सोन्या रांडीच्या, पाच नंबरचे कळकटलेले टेबल आरशासारखे पुस, अन गिर्‍हाईकाला काय लागते ते पुस.
हॅ हॅ हॅ.

मालक: सोन्या नरसाळ्या, अरे माझा कडमड्या मोबाईल कुठे आहे? त्या पेताड भाजीवाल्याची भाजी आली नाही अजून. त्याच्या *डीत जास्त माज आलेला आहे. निट वेळेवर भाजी सप्लाय करत नाही तर मग मी थाळीत काय *ट देवू काय?

मालक: सापडला रे मोबाईल. माझ्याच *डीखाली होता रे तो सोन्या शिंदळीच्या. तु गिर्‍हाईकाला तुझे पाणी पाज. हॅ हॅ हॅ.

मालक: अरे तो ढिल्ला पोळीवाला आला नाही अजून सोन्या? कुठे उलथला काय माहित.
त्या आठवी नापास मंदने अजून पोळ्या दिल्या नाहीत. मग भो**च्या थाळीत काय फक्त भात देवू काय रे सोन्या गाढवीच्या?
गिर्‍हाईक देव आहे आपला. त्याला ताटकळत ठेवून ताटात काय ठेवू? आमचा हा? म्हणजे मेंदू?

मालक: अरे दळभद्री, अरे तो गॅस संपलाय किचनमध्ये बघ जरा. नाहितर तुला बसवेल गॅसच्या जागी. हॅ हॅ हॅ.

गिर्‍हाईक १: ओ मालक, किती वेळ लागेल अजून थाळी सजवायला?

मालक: तुम्ही थोडे थांबा हं गिर्‍हाईकदादा. ह्या भा**ऊ पाजी गॅसला आताच संपायला पाहिजे होते. माठ्या, सोन्या भामट्या बघ जरा. येथे येणारे मोठे भुक्कड असतात त्यांची सोय पहायला नको का घनचक्कर? ती कोण पाहणार? तुझा ठोल्या बाप की माझा उलथलेला चुलता?

गिर्‍हाईक २: ओ मालक येथे बघा. चमचा बघा किती घाण आहे? न धुतलेलाच दिलेला दिसतोय.

मालक: अरे तिच्यायला! अरे पोंग्या, बघ जरा तो चमचा, बदलून दे तिन नंबरला. हॅ हॅ हॅ, आजकाल चमचे जरा जास्तच झालेत हो. मधे मधे कडमडतात. त्यामुळे होते चुकून. बाजूला राहून जातो एखादा डुकरासारखा चमचा. आमच्या मोरीतले माणसे म्हणजे एकदम छपरी आहेत बघा. आताच त्या बोंगाड्यांना तासतो.

मालक: अरे ए सुक्काळीचे, जास्त बेवडा मारून आलेत काय आज सकाळी? दळभद्री साले, रोज कुत्र्यासारखे खातात फक्त. अन भांडी निट घासायला नको का तुम्हा नालायकांना? अरे गिर्‍हाईक आमच्या नावाने ओरडते ना बैलांनो.

नोकर: मालक नळाला पाणी आलेले नाही कालपासून. जे आहे त्यातच घकवतोय.

मालक: अरे ए बिनडोक टमरेल, भो**च्य, तु मला आज सांगतो? कालच सांगितले असते तर मागवला असता एखादा पाण्याचा टँकर.

वेटर: एक वडापाव, पंधरा रुपये घ्या मालक.

मालक: अहो, सुटे द्या साहेब पंधरा रुपये. *टभर बिलासाठी कुठे उगीचच पाचशेची नोट काढता.

वेटर: मालक पुढचे गिर्‍हाईक. पाच नंबर. शिवीभोजन थाळी. दहा रुपये घ्या.

गिर्‍हाईक १: हे घ्या दहा रुपये.

मालक: नाव सांगा.

गिर्‍हाईक १: नाव कशाला?

मालक: अहो थाळी घेतली तर नाव सांगावे लागेल. च्यामारी, *टभर पैसे मिळवायचे अन सगळ्या नोंदी ठेवायच्या असे फुकटे काम दिले आहे बघा सरकारने.
गिर्‍हाईक काय एकदम उपाशी असते. येते आपले हादडायला, हॅ हॅ हॅ, म्हणजे तुम्ही नाही हो. उगाच आपले हे.

गिर्‍हाईक १: बरं बरं राहूद्या ते.

मालक: काम काय करतात ते सांगा.

गिर्‍हाईक १: अहो ते कशाला आणखी.

मालक: असे कसे? अहो सगळी कुंडली द्यावी लागेल बघा एकदा का शिवीभोजन थाळी खाल्ली तर. अनुदानीत आहे ना. *टभर पैशात पोटभर खा. हॅ हॅ हॅ.

गिर्‍हाईक १: अच्छा.

मालक: आधार क्रमांक काय?

गिर्‍हाईक १: आता तो पण द्यायचा का?

मालक: मग! अहो आता तर तो येथे द्यावा लागतोय. काय सांगावे पुढे मागे तर सुलभातही द्यावा लागेल. आहात कोठे. आता उद्याच या. रात्री शिवीथाळीची अपेक्षा करू नका. उपाशी झोपा. या पुन्हा शिवीभोजनाचा लाभ घ्यायला.
हॅ हॅ हॅ.

मालक: सोन्या खुळ्या बधीर लेका, शिव्याथाळीचा आजचा कोटा संपला बघ. त्यातल्या त्यात या फुकट्या कामात बरे आहे की फक्त दिवसाच हि शिवीथाळी द्यावी लागते आहे. सोन्या फुकट्या दलिंदरा, अरे, बाहेर बोर्ड लाव शिवीथाळी संपली म्हणून.
हॅ हॅ हॅ.

Saturday, January 11, 2020

सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)

सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)

मला आंघोळ फार आवडते. अगदी आवडच आहे म्हणा ना! फार म्हणजे फारच. लहाणपणी मी बळजबरी पाण्याच्या लहान टबात बसत असे असे घरचे सांगतात. ते माझ्या अगदीच लहाणपणी असावे. शालेय वयातदेखील मी अगदी थंडीतही सकाळी आंघोळ करूनच शाळेत जात असे. आंघोळीच्या बाबतीतला चटपटीतपणा माझ्या अंगाअंगात मुरलेला आहे. गरम असू दे किंवा गार असू दे, कोणतेही पाणी मला आंघोळीसाठी अन शरीराला मानवते. गरम पाण्यासाठी आता अनेक सोई झालेल्या आहेत. इलेक्ट्रिक हीटर, गॅस हीटर, गॅसवर भांडे ठेवून गरम पाणी करणे किंवा गरम पाण्याचा बंब असो. कोणत्याही साधनांनी गरम पाणी आले म्हणजे झाले. ते नसलेच तर सरळ थंड पाण्याच्या नळाखाली बसायचे अन आंघोळ उरकायची. गरम पाण्यातल्या आंघोळीला मनाची तयारी करायची गरज नसते. मस्तपैकी नळाने किंवा वर उल्लेखलेल्या साधनांनी येणारे गरम पाणी बादलीत घ्यायचे अन सरळ आंघोळीला सुरूवात करायची. थंड पाण्याच्या आंघोळीला मात्र मनाची अन शरीराची तयारी असावी लागते. उन्हाळ्यात थंड पाणी चांगले वाटत जरी असले तरी सकाळी ते थंड पाणी अधीक थंडच असते. त्यामुळे अशा आंघोळीसाठी आधी पायापासून सुरूवात करावी लागते. थंड पाण्याने आंघोळ करायची असे मनाने ठरवले की आधी पायावर पाणी टाकून शरीर आंघोळीसाठी तयार होते. मग कमरेवर आणि मग छाती, खांदे, डोके असे वरचढ प्रमाणात मगाने पाणी अंगावर घ्यावे लागते. एकदा का एखाद दोन मग थंड पाणी अंगावर पडले की मग मात्र गरम पाण्याच्या तुलनेने हि आंघोळ अधीक वेगात होते. चटचट डोके, अंग धुतले जाते, शॅम्पू, साबण चोपडला अन धुतला जातो. टॉवेलने खसखसा अंग पुसलेदेखील जाते. अशा आंघोळीनंतर मात्र एकदम प्रसन्न अन उत्साही वाटते. हातात अगदी डोंगर फोडायचे काम दिले तरी ते होवून जाईल असा उत्साह अंगी संचारतो. थंड पाण्याच्या तुलनेत गरम पाण्याची आंघोळ एक बुळा प्रकार आहे असे माझे प्रामाणीक मत आहे.

एक आठवण सांगतो. कॉलेजला असतांना आमचे होस्टेल हे थोडे गावाबाहेर होते. गरम पाण्याची काही सोय नव्हती तेथे. मग बाकीचे विद्यार्थी गरम पाण्यासाठी हीटरचा रॉड वगैरे घेवून सोय करायचे. मी मात्र उन्हाळा असो की हिवाळा, सकाळी साडेपाचच्या दरम्यान दोन तिन किलोमिटर पळायला जायचो. जॉगींग वगैरे प्रकार नव्हता तेव्हा. मी एकटाच पळून यायचो आणि अंग घामाने थबथबून जायचे. मग मी सरळ गार पाण्याच्या नळाखाली बसायचो. ज्यांना मी पळून येवून आंघोळ करतो आहे हे माहीत नव्हते ते आश्चर्यचकीत व्हायचे. इतर मुलांनी ब्रश देखील केलेला नसतांना मी मात्र सगळ्यात पहिला आंघोळ करून कपडे धुवून तयार झालेलो असायचो. आता मात्र अंग गरम पाण्याला सोकावलेले आहे. पण गार पाण्याची सवय शरीराला अजूनदेखील आहे हे गेल्याच आठवड्यात मी मध्य प्रदेशात गेलो असतांना जाणवले. तेथे हॉटेलवर सकाळी गरम पाणी मिळेल हे सांगितलेले होते. पण सकाळी नळाला गरम पाणी येत नव्हते. मग शेजारच्या रूममधल्या कुटूंबाला गरम पाण्याबाबत विचारले तर तेथेही गरम पाणी येत नसल्याचे समजले. मग मी सरळ रूममध्ये येवून नळाखाली बादलीत पाणी घेतले अन माझी गार पाण्याची लिटमस टेस्ट घेतली अन मी त्यात तेवढ्या थंड वातावरणात उत्तीर्ण झालो.

असलीच थंड पाण्याची आंघोळ हि कधीकधी बळजबरी करावी लागते. त्यातील एक हमखास वेळ म्हणजे लग्नाच्या वर्‍हाडाबरोबर किंवा एखाद्या ठिकाणी काही कार्यक्रमानिमीत्त सामूदायीकरित्या मुक्कामी जाणे. तेथल्या मुक्कामी सकाळी गरम पाणी अभावानेच मिळते. "असेल नशीबात तर आंघोळ होईल गरम पाण्यात" अशी परिस्थीती असते. सगळ्याच ठिकाणी मुक्कामासाठी हॉटेल नसते. यजमान ठेप ठेवणारा जरी असेल तरी कार्यस्थळी पाहूण्यांची गर्दी असल्यामुळे गरम पाणी तरी किती जणांना पुरेल असाही सामाजीक विचार मनात येतो. काही होतकरू अन अनूभवी मंडळी सगळ्यात आधी उठून आंघोळीला रांगा लावतात अन बाथरूम अडवून बसतात. आपल्याच कुटूंबाची आंघोळ आधी व्हावी हा स्वार्थी विचार प्रत्येक कुटूंबधारक करत असतो. मग त्यात सख्खे नातेवाईकही बाद होतात. लग्नात तर हमखास बाथरूम अडवणूक होते. मी अन माझी बायको-नवरा-मुले यांची आंघोळ आधी कशी होईल यातच प्रत्येक वर्‍हाडी गुंततो. लग्नातल्या महिलांना एकमेकींचा रुसवा करण्यास आंघोळ हे एक कारण भेटते. 'माझ्या नणंदेने बघा मला आंघोळ देखील आधी करू दिली नाही, साबण तर दिलाच नाही' असले रुसवे कुटूंबात रंगतात. वरमायची आंघोळ हा देखील एक प्रकार असतो. त्यातही रुसवे फुगवे घडतात. एकदा का सगळ्यांच्या आंघोळी झाल्या तर मग या रुसव्याची भरपाई नाष्ट्याच्या आग्रहाने होते. काही अनूभवी मंडळी गावातल्या इतर नातेवाईकांकडेच मुक्काम ठोकतात किंवा किमानपक्षी आंघोळीलातरी तेथे जातात.

एखाद्या निरर्गरम्य ठिकाणी सहल म्हणा किंवा आजच्या जमान्यातले विकएंड पर्यटन म्हणा किंवा देवदर्शन कम भटकंतीच्या निमीत्ताने आजकाल गाड्या भरभरून लोक पर्यटन करत आहेत. प्रवासाच्या सोई वेगवान अन पाहीजे तेथे उपलब्ध झाल्याने आजकाल जो तो उठतो अन शुक्रवार संध्याकाळ ते सोमवार पहाटपर्यंतच्या विकांतात  पर्यटनाचाचा विचार करतो आहे. अशा पर्यटन स्थळी किंवा धार्मीक स्थळी आंघोळ हे एक कार्य असते. काही ठिकाणी धार्मीक पर्यटन हे केवळ आंघोळ करवून घेण्यासाठीही आपल्याकडे प्रचलीत आहे. नर्मदेतले स्नान, गोदावरी- नाशकातले रामकूंडातले किंवा कुंभमेळ्यातले स्नान, अलाहाबाद - प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील किंवा त्रिवेणी संगम आदी ठिकाणावरील स्नान हे धार्मीक स्नानात मोडते. भारतात कोणत्याही नदीत स्नान केले तर गंगेत स्नान केले असे म्हटले जाते एवढे स्नानाचे महत्व आहे. एखाद्या धबधब्याखाली जावून अंग भिजवणे, रेन डान्स असलेले किंवा वॉटर पार्क मधले भिजणे हे हौशी पर्यटनाखाली मोडते. अगदीच झाले तर कोणत्याही स्विमींग पूल मध्ये पोहोण्याआधी अंग धुवावे लागते. झालेच तर काही हौशी व्यक्ती समुद्रस्नान किंवा मड बाथ किंवा सूर्यस्नान, किंवा पावसातले स्नान देखील करतात. काही ठिकाणी चॉकलेटचे स्नान किंवा देवादिकांची मध, दूधाने घातलेली आंघोळ आदी देखील प्रकार प्रचलीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी किंवा रायगड येथील सुधागड येथील उन्हेरे येथे गरम पाण्याचे कुंड आहे. तेथे गंधक मिश्रीत पाण्याचे झरे वाहतात. तेथे केलेले स्नान हे वैद्यकीय दृष्ट्या त्वचारोगावर उपाय मानला जातो.
हॉस्पीटलातले रुग्णाला केलेले स्पंजींग देखील एक आंघोळीचाच प्रकार आहे.

दिवाळीतले अभ्यंगस्नान हा देखील एक वैविध्यपूर्ण प्रकार आपल्यात आहे. कार्तीक महिन्यातली थंडी अन त्या थंडीत सकाळी उठणे आणि उटणे, तेल लावून, मोती साबण लावून केलेले स्नान किती प्रसन्न असते. त्या आंघोळीला धार्मीकतेचा वारसा आहेच पण वैद्यकीयदृष्ट्याही अधिष्ठान आहे. बोचर्‍या थंडीत शरीराला तेलाने मर्दन केल्याने शरीरातील तेलाची कमतरता भरून निघते हा हेतू आपल्या पुर्वजांनी जाणला असावा आणि मग तशी आंघोळ करण्याची प्रथा पडली असावी. असले उटणे वगैरे लावून केलेली आंघोळ हि केवळ दिवाळीच्या एका दिवसापर्यंत मर्यादीत न राहता वर्षभर असावी असे मला वाटते. महिलावर्ग या उटण्याच्या आंघोळीला मुकतो हे मात्र खरे. महिलांवर कायमच अन्याय होत असल्याचे हे पाणीदार उदाहरण आहे. समस्त महिलावर्गाने आणि स्त्री मुक्तीवाल्यांनी केवळ महिलांसाठी असलेली एखादी आंघोळ शोधायला हरकत नाही. अर्थात भोगी, रथसप्तमी इत्यादी सणांना महिला नदीवर स्नान करण्यासाठी जातात. ती देखील एक मुहूर्ताची आंघोळच असते.

पुरानकाळापासून माणूस हा प्राणी आंघोळ करत असल्याचे पुरावे मिळतात. रोमन साम्राज्यातील किंवा हडप्पा, मोहोंजोदरो येथील स्नानगृहे, न्हाणीघर, तेथील पाणी वाहून नेण्याच्या जागा आदी पुरावे उत्खननात मिळालेले आहेत. प्रत्येक धर्मात स्नानाचे महत्व आहे. क्रिश्चन लोकांत बाप्तीस्मा घेण्याचे स्नान असो, मुस्लीमांतले शुक्रवारचे स्नान, आपल्या हिंदूमधले नद्यांमधले पवित्र स्नान, लग्नातले वधू वरांनी एकत्र केलेली सार्वजनीक आंघोळ, त्याच वधू वरांनी लग्नानंतर एकत्र केलेली खाजगीतली आंघोळ, लहान मुलांची आंघोळ, शेवटची आंघोळ, बादलीत पाणी घेवून केलेली आंघोळ, शॉवर खाली केलेली आंघोळ आदी अनेक प्रकार आंघोळीचे असतात. युरोप अमेरीकेत पूर्वी आंघोळीसाठी सार्वजनीक जागाही होत्या. तेथे सामुदायीकरित्या आंघोळ करत असत. हमाम में सब नंगे हि म्हण त्यातूनच उदयाला आली असावी. 

चित्रकारांनाही आंघोळ हा विषय चित्र काढण्यासाठी महत्वाचा वाटलेला आहे. अनेक चित्रकारांनी या आंघोळीच्या चित्रांमधे हात धुवून घेतलेला आहे. गोपीका नदीत स्नान करत आहेत अन श्रीकृष्ण त्यांचे कपडे चोरतो या विषयावर अनेक चित्र आहेत. जशी परिस्थीती आंघोळीच्या चित्रांमध्ये आहे तशीच परिस्थीती चित्रपटांमध्येही आहे. अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटातल्या नायिकांना चित्रपटात आंघोळीला बसवलेले आहे. ब्रम्हचारी चित्रपटातील यमुनाजळी खेळ खेळू यातील मिनाक्षी, राम तेली गंगा मैली मधली मंदाकीनी, किशन कन्हैया मधली राधा बीना है किशन अकेला म्हणणारी शिल्पा शिरोडकर कोण विसरेल? काही प्रसंगात तर नायीका भिजवण्यासाठी खास प्रसंग निर्माण केलेले आढळतील. पावसाचे कोणतेही वातावरण नसतांना चित्रपटात नायक नायीका पावसात भिजतात. ओढून ताणून ओलेत्या केलेल्या प्रसंगांना नायक नायीकांनी आक्षेप घेतलेला आढळत नाही. केवढे  हे आंघोळीविषयी प्रेम!

एकूणच परिपुर्ण आरोग्य आणि निकोप मनासाठी आंघोळ हे एक आद्य कर्त्यव्य आहे. ज्या दिवशी आंघोळ झाली नाही तो दिवस खराब जातो हे निश्चीत. मुंबईत  लोकलमधून प्रवास करून, घामाने न्हावून ( बघा, घामाने न्हाणे हे देखील आंघोळीतच गणले जाते!) घरी आल्यानंतर प्रथम आंघोळ होते. त्यानंतरच मंडळी कुटूंबाच्या प्रेमात न्हातात.   

दिवसाची सुरूवात आंघोळ करून प्रसन्न होते याचा अनूभव तुम्ही, आम्ही सर्वांनीच घेतलेला असेल. आंघोळीने शरीर धुतले जाते. त्वचेचे आजार आंघोळीने नष्ट होतात. आंघोळ केल्यानंतर प्रसन्न वाटते. उत्साह निर्माण होतो. पर्यायाने मनाचे आरोग्य राखले जाते.

ब्रह्ममुहूर्तावर हा लेख प्रकाशीत करून मी आजचे चंद्रग्रहण संपल्याच्या कारणास्तव एवढ्या थंडीत मस्त गरम पाण्याने आंघोळ करायला पळतो.

- पाषाणभेद
११/०१/२०२०

Saturday, September 28, 2019

व्हाटसअ‍ॅप चा एसएमएस मेसेज

तो: हॅलो.

ती: हं बोला.

तो: काय गं, झोप झाली का?

ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली.

तो: हं.

ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअ‍ॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे.

तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी त्या व्यतिरिक्त एक वेगळा अन महत्वाचा एसएमएस पाठवलेला होता तो वाचला का?

ती: तुमचा तोच व्हाटसअ‍ॅप चा मेसेज वाचला ना. म्हणून तर विचारले की तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही व्हाटसअ‍ॅप केले आहे ना तेच बोलत आहात ना?

तो: अग, एसएमएस चा मेसेज म्हणतोय मी. व्हाटसअ‍ॅपचा मेसेज नाही.

ती: तुम्ही ना माझे व्हाटसअ‍ॅपच काढतात जेव्हा पहावं तेव्हा. वाचला ना मेसेज व्हाटसअ‍ॅपवरचा.

तो: अग मी एसएमएस बद्दल बोलतोय. जुन्या मोबाईलमध्ये, पुर्वी व्हाटसअ‍ॅप होते का? महत्वाचे काय? एसएमएस का व्हाटसअ‍ॅप?

ती: एसएमएस नाही वाचला. वाचते.

तो: व्हाटसअ‍ॅप मध्ये किती तरी गृप्सचे मेसेजेस असतात. माझा मेसेज खाली गेलेला असू शकतो ना?

ती: हं

तो: पहिल्यांदा काय पाहशील मोबाईल उघडल्यावर?

ती: तुमचं ना नेहमीचंच आहे. झालं चालू लेक्चर. अहो, मी तुमची बहीण येणार असल्याचा मेसेज वाचला अन लगेच चहा बनवायला घेतला माझा. डोकं नका दुखवू आणखी.

तो: अगं मी एसएमएसवरचा मेसेज बोलतोय.

ती: तेच तर मी मेसेज वाचला तुमचा. उद्या बहीण येतेय तुमची तो.

तो: देवीच्या देवळात गेली अन तेथे गणपती दिसला तर पहिल्यांदा कुणाचे दर्शन घेशील?

ती: हां मला ज्याचे दर्शन घ्यायचे ते घेईल.

तो: अगं एसएमएस कुणाकडून आला ते लगेच समजते अन तो पटकन वाचता येतो. अन ते व्हाटसअ‍ॅप मेसेज सारखे पाचशे पाचशे येत नाहीत गं. तुझ्यासाठी महत्वाच्या होता एसएमएस म्हणून पाठवला होता.

ती: हं ठेवता का फोन, तरच वाचता येईल मला.

तो: वाच बाई एसएमएस वाच. व्हाटसअ‍ॅप, व्हाटसअ‍ॅप नको खेळू.

ती: हं...या घरी संध्याकाळी ऑफीसातून.

- पाभे

Friday, April 05, 2019

Akbar Birbal Story: Akbar Badshah lost mobile phone


Akbar Birbal Story: Akbar Badshah lost mobile phone



As usual Akbar Badshah was sitting in the court. All other courts were sitting on their seats. The court proceedings are on. How to implement a new tax system, whether to reduce the repo rate or not, to close the Aadhar card scheme and apply a new identity card, subsidized gas cylinders, Padmashri award to Taimur Kapoor or to actress Karuna Kapoor etc. many topics were discussed. All were knowing that this type of discussion will never end in one day so the discussion was going on in light mood, humorous manner.

Birbal was watching Emperor Akbar closely. The king was pleased when the court started. He had also shown interest in an unbiased discussion of court clauses. But after that discussion Akbar's choler was increased. He was also holding his hand in the pocket of his royal robe once or twice while he was seating on a throne.

After eating snacks and drinking a tea, Birbal did called himself a slave girl to give Paan and perfumed Tobaco to King Akbar. However, Akbar's head did not open. His usual jokes, courtesies were not enough.

At that time Akbar's emperor woke up loudly and he said, "Oh my, search my mobile". Later Akbar said in a voice that the court would listen to the court, that the his mobile was in his pocket when he was in the Queen's palace before coming to court. Then it was time to come to the court and he had to left from Queen’s Palace. Later, during the discussion in court, he put his hand in the pocket to see some messages in the mobile phone but not found it in the pocket. That means, Akbar's mobile had disappeared.

Seeing the fact that the Akbar Emperor's mobile disappeared, all the courts started running in search of King’s mobile phone. Akbar also got worried about his mobile when he thought that if the mobile phone was found in the hands of the Queen, then she would see the things in that mobile, and then he would be taken to the slap at night.

The Emperor's throne, the side-by-side tables, below the chairs, way to the courtroom, all area of court searched by servants for the mobile. The Chief Security Secretary ordered the closure of the main gate of the palace. No one was allowed to go outside the palace until the King's mobile was found. Rest of courtiers send SMS or Whats App to their home that they will return home late in the evening. Some people also thought that there must be a mobile theft who picked up Akbar’s mobile phone. Akbar's brother in law gave a ring on Akbar's mobile as he wanted to show his cleverness to Badshah, and the mobile was ringing there. That means, at least the mobile was not shut down.

All the courts came to the conclusion that Akbar had used his mobile phone in Queen’s palace lastly and after that it got disappeared. They all knew that there were special only faithful servants and Birbal who were allowed in the courtyard of the Queen's palace. Seeing the doubt suspicion needle is turning towards him, all the controls in the search of mobile have taken by Birbal in his hands.
He asked the King, "Sir, when did you handled the mobile lastly?"

Akbar jokingly said, "Handling means that it was always in my hand", Akbar further said, "But before I came to the court, I went to Palace of Queen." We both had few personal discussions, ate scented Paan, and same time mobile disturbed us by ringing an alarm and it was a time to come to the court. I closed alarm and put mobile on silent mode as I have to present myself in the court. And then quickly I was here. In the way to court, not sit anywhere. What is means that such mobile disappears while I walk? ", Akbar said a little scared.

"Sir, have you ever charged the mobile last? And was there any problem with the battery, I mean that the battery will end soon?" Birbal asked the next question.

"It's my mobile, too, it just the latest, that's why there is no battery issue, not just wanting to lose it. It should not go in wrong hands and you can block the SIM card by telling to a cellular phone, but what about the data it contains? Also it was not password protected as I used to give it to Queens hand sometimes to read jokes and messages." The king said to Birbal in private voice with care.

Akbar stopped his emotional sad stoty because Birbal was considered a little worried. Seeing that Birbal did not speak for a long time, the Emperor sighed, "Birbal, do anything for getting the mobile phone. If you do not get the mobile I will put you in jail."

Birbal was aware of the habit of saying 'you housed in prison' just a threat. Since it was three o'clock in the afternoon, Birbal was a little worried about his empty stomach while in mobile search.
To listen to what Birbal speaks, the whole court began to listen to him. There is a lot of boils in the heart of the King's brother in law.

Finally, Birbal said with determination, "Maharaj, all the officers, servants of the court and the slaves allow to go home. You also have to eat, I also have to my meal and after that I will give you your cell phone."

The officials in the court heard the excitement. The mobile crisis was temporarily avoided. The court was dismissed by thinking that later issue could be seen tomorrow. Akbar went to Emperor’s kitchen and Birbal went to his home to eat something.

Birbal was again present in the courtroom around five o'clock in the evening. Other courtiers also came the eager to see how mobile will search and stopped at long distance from court. Bibal came with the main electrician. What is the purpose of an electrician at the time of mobile search? Why would he charge mobile in the air? The Emperor thought for a while but he decided to see what would happen.

At the time of the sun's dawn, Birbal rushed to the Queen's palace with some trusted ladies’ servants and with an electrician. Off course the king Akbar was with them. Birbal, who came to the Queen's palace, persuaded the maid to shut the doors of the palace, windows and the curtains on it. All of them were looking breathlessly at Birbal what he was doing.

Now Birbal asked the main electrician to close the queen's room main switch. Darkness spreads in the Queen's palace after switching off the main switch. Akbar immediately took the queen's hand tightly. Birbal was standing next to the side. There was nothing visible in the dark. At that time Birbal picked up his own mobile from his pocket and dialed the number of Akbar's lost mobile phone. As soon as the first ring went, a light started to shine. The side of the queen’s royal bed was filled with light. After the completion of the whole ring from the mobile, Birbal took a quick look towards the royal bed and captured Akbar’s mobile phone near the cushion.

Now Birbal gave loud voices and asked the main electrician to turn the main switch. After the main switch switched on, Queen’s palace lit in the light. The queen standing beside the king stood aside and hesitated. Birbal laughs and handed Akbar's mobile phone to him.
Akbar took mobile from Birbal and removed Silent mode at first. He was happy seeing that mobile was not taken by somebody else and data inside it was safe enough.

Happy to find his missing mobile in such a way, Akbar announces the full year's talk time for Birbal’s mobile phone.


Thursday, July 13, 2017

वगनाट्यः वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही :: Comedy Folk Drama




वगनाट्यः वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही
Vagnatya: Vairi Bhedala Arthat Premala Seema Nahi
(Comedy Folk Drama in Marathi Language)

ISBN: 978-93-5267-770-2
Published By: Amigo POD Book Publisher India, Nashik, Maharashtra
amigopublisher@gmail.com
Mobile: 94OThreeO4378Two


















Monday, February 04, 2013

सिटीबसमधले नाट्य


सिटीबसमधले नाट्य

स्थळ: अर्थातच पुणे. सिटीबस मनपा ते कात्रज डेपो अशी खचाखच भरून जात असते. त्यात एक प्रवासी उभा असतो. कंडक्टर तिकीट, तिकीट ओरडत असतो. नाट्य सुरू.
प्रवासी:
आपलं हे एक द्या हो.
कंडक्टर (वैतागून): हे म्हणजे काय?
प्रवासी: अहो हे म्हणजे तिकीट द्या. एक कात्रज- सर्पोद्यान द्या.
कंडक्टर: काय नागाचा नाच बघायला चालला वाटतं?
प्रवासी: नाही हो. हे आपलं…
कंडक्टर: नुसतं हे आपलं काय? मग सर्पोद्यानात काय नागाला दुध पाजायला चाललात वाटतं?
प्रवासी: नाही नाही. तसं काही नाहीये.
कंडक्टर: मग ह्या पिशवीतल्या नागाला तेथेल्या पाळणाघरात सोडायला चालले वाटतं? नाही म्हणजे पिशवी बरीच मोठी दिसतेय. गारूडी दिसताय अगदी.
(तेवढ्यात बसमधल्या कुणाच्यातरी मोबाईलमध्ये गाण्याची रिंगटोन वाजते. कंडक्टर "मन डोले मेरा तन डोले मेरा दिलका गया खयाल..." या चालीवर नाचतो. आपला हा प्रवासीदेखील पुंगी वाजवायची नक्कल करत त्यात सहभागी होतो.)
कुणीतरी दुसरा प्रवासी ओरडतो: ए गपेए.
प्रवासी (भानावर येत): अहो नाही हो. मी गारूडी नाही वॉचमन आहे कात्रज दूध डेअरीमध्ये. ड्युटीवर चाललो होतो.
कंडक्टरः अच्छा. असं आहे काय! मग हे आधी नाही का सांगायचं? (बोटे विनोदी होईल अशा विशिष्ट पद्धतीने हलवत बोलतो) मग काढा. चला बाहेर काढा. (प्रवासी पिशवी घट्ट पकडतो.) सुट्टे साडेबारा रूपये बाहेर काढा.
प्रवासी: मी काय म्हणतो, काही कमीजास्त नाही का होणार?
कंडक्टरः होईल ना. अपंग आहे का तुम्ही? म्हणजे लुळे, थोटे, बहीरे, मुके, आंधळे (इतर प्रवाशांकडे पाहून): काळे, गोरे, मोरे, पोरे, सोरे पुढे सरकारे!
प्रवासी: अहो, मी चांगला सरळ उभा आहे, निट बोलतो अन ऐकतो आहे? मी कशाला अपंग असणार?
कंडक्टरः तुम्हीच विचारलं होतं ना की काही कमीजास्त नाही का होणार म्हणून? बसमध्ये अपंगांना सवलत असते हे माहीत आहे ना? चला काढा. पटकन काढा. साडेबारा रूपये काढा.
प्रवासी: तरीपण साडेबारा रूपये जरा जास्तच होतात हो. काहीतरी कमी नाहीच होणार का?
कंडक्टरः काय राव, तुम्ही काय मंडईत आहात काय भाजीपाला घ्यायला?
प्रवासी: तसं नाही हो. म्हणजे बघा, महागाई किती वाढलीये. दूध ६५ रूपये लिटर झालं आहे. (रडवेला होत) पेट्रोल डिझेल कितीतरी महाग झालंय. (आणखी रडक्या सुरात) शाळेची फी वाढलीये. टेलरची शिलाई वाढलीये. (आणखीनच रडवेला होत) कटींगचे दर वाढलेय. (अगदीच रडक्या सुरात) सांगा आता सामान्य माणसाने कसं जगायचं या असल्या महागाईत.
कंडक्टर (रडका अभिनय करत रडवेल्या सुरात): नका हो नका रडवू असं. मी पण तुमच्यासारखाच सामान्य आहे. तरीपण महागाई वाढल्यानेच तिकीटाचे पैसे कमी होणार नाही म्हणजे नाही.
प्रवासी: बरं राहीलं. मग असं केलं तर..
कंडक्टर (बोलणे तोडत): नुसते प्रश्न विचारू नका. पटकन पैसे काढा. अन कमी असतील तर जवळचे तिकीट देतो. अन नसतीलच तर बस थांबवतो. उतरून घ्या. बोला काय करू? तिकीट काढता की बस थांबवू?
प्रवासी: नाही हो. आताच मी कलेक्टर कचेरीत गेलो होतो कामाला. तेथून बसमध्ये बसतांना माझे पाकीटच मारले गेले. खिशात फक्त पाच रूपये राहीले बघा. त्यात काही जमतय का?
कंडक्टरः हे पहा, बसच कमीतकमी भाडं सात रूपये आहे. अन तुम्ही बारा वर्ष पुर्ण केलेले वाटत आहात. अपंग वैगेरेही नाहीत. म्हणजे सवलतीचे तिकीटही नाही. मी बस थांबवतो. तुम्ही येथेच उतरुन घ्या. (ड्रायव्हरला ओरडून सांगतो: ओ रामभाऊ, बस थांबवा हो!) काय कटकट आहे. खिशात पैसे नाहीत अन चालले सर्पोद्यानात.
प्रवासी (बसमधून उतरून): चला, आपल्याला थोडीच सर्पोद्यानात जायचे होते? अन ह्या मारलेल्या पाकीटात काय आहे बघू जरा. (चोरलेले पाकीट पाहतो. अन एक एक बिनकामाच्या वस्तू फेकून देत देत बोलतो) ही किराणामालाची यादी. (फेकतो) अगदीच मध्यमवर्गीय दिसतोय तो पुढे उभा होता तो. हं… हि एलआसीच्या हप्त्याची यादी. (फेकून देतो.) हे पाचशे रूपये. ही आपली कमाई. (बाकीचे पाकीट फेकून देत बोलतो) चला आजचा धंदा झाला अन फुकटात प्रवासही घडला.