Monday, September 5, 2011

मरणाची अवस्था

विषय तसा बोजड, सर्वसामान्यांना न आवडणारा आहे.

या पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक सजीव कधीना कधी मरतोच. त्याच्या मरण्याच्या तर्‍हा, कारणे वेगवेगळी असू शकतात. पण होणारा मृत्यू एक शाश्वत घटना असते.

एकांतात मनात मृत्यूविषयी विचार कधीकधी येतात. रातीच्या वेळी अर्धवट झोपेत कधीकधी मरतांनाची स्थितीची कल्पना येवू शकते. माझा झोपेत श्वास अडकतो. झोपेत चुकून छातीवर झोपल्या गेले तर हमखास असे होते. मोठ्याने ओरडून जागे व्हावे लागते. नेटवर पाहिले असता जीभ मागे जावून श्वासमार्गात अडथळा आणते असे काहीतरी आजाराचे स्वरूप आहे. अर्थात मला त्यावर उपाय काय असले काही येथे विचारायचे नाही.

तर येणारा मृत्यू, त्यावेळची मनाची अवस्था काही मृत्यूबाबतीत फारच भयानक असू शकते. एकतर मानवाला बुद्धी अन स्मृती यांची देणगी आहे. त्यामुळे आपण मर्त्य लोक त्याचा विचार करू शकतो. पशू पक्षी यांना मरणाच्यावेळी वेदना होत असतीलच पण संवेदना फारशा येत नसाव्यात किंवा बुद्धी अन स्मृती त्याच्या आड येत नसाव्यात.

म्हातारपणी आजारपणातून येणारा मृत्यू फारच वेदना देत असतो. खंगत खंगत मरणे, मरणाची वाट पाहत झिजून मरणे या अवस्था भयानक असतात. कायद्याने इच्छामरण नाही. तसे ते नसावेही या मताची मी आहे. एखाद्याला म्हातारपणी मृत्यूला कवटाळायचेच असेल पण शरीराचे शक्यते हाल न व्हावे, संवेदना न व्हाव्यात अन शांतपणे मृत्यूच्या अधीन व्हावे यासाठी काही उपाय निश्चीतच मानव संस्कृतीत आहेत. जैन लोकांमध्ये ती उपवासांची पद्धत आहे (नाव आठवत नाही). आपल्याकडेही संजीवन समाधी आहेच.

याबाबत अधीक माहीती काय आहे?

No comments: